शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'कापूस खरेदीस दिरंगाई'; आंदोलना दरम्यान संतप्त शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 16:54 IST

कापसाच्या गंजीवर चढत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. 

धारूर :  शासकीय केंद्रावर आठवड्यातून केवळ एक दिवस कापूस खरेदी करण्यात येते असल्याने येथे कापसाच्या गाड्यांच्या रांगा लागलेल्या  आहेत. रांगेत थांबून आठ दिवसानंतर कापूस खरेदीस नंबर लागत असल्याने शेतकऱ्यात संतापाचे वातावरण आहे. याला वैतागून एका शेतकऱ्याने गुरुवारी कापसाच्या गंजीवर चढत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. 

धारूर तालूक्यात आठवड्यातील केवळ तीन दिवस शासकीय केंद्रावर कापूस खरेदी केली जाते. यामुळे शेतकऱ्यांची हेळसांड होत असून कापसाच्या मापासाठी किमान आठ दिवस केंद्राबाहेर वाट पहावी लागत आहे. येथील गुरू राघवेंद्र जिनिंगवर तीन दिवसांपासून उभ्या वाहनांतील काही वाहने बुधवारी राञी आता घेण्यात आली. यावेळी कापसाचे माप करण्यात आले मात्र वाहन  रिकामे करण्यात आले नाही. दरम्यान, जिंनीग बाहेर पन्नास पेक्षा जास्त वाहनांची रांग होती. यामुळे गुरूवारी सकाळी शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु केले. यातच एका शेतकऱ्यांना गंजीवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून इतर शेतकऱ्यांनी त्याची समजूत काढल्याने पुढील अनर्थ टळला. 

या प्रकाराची माहिती मिळताच तहसीलदार व्ही एस शेडोळकर, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, पोलीस निरीक्षक विश्वनाथ नाईकवाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दत्ता सोंळके हे संबंधीत जिंनीगवर पोहचले. पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तात्काळ कापूस खरेदी करण्यास भाग पाडले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, कापसाची आवक पाहून शासकिय केंद्रात नियमित खरेदी सुरु करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .

सुरळीत कापूस खरेदी साठी प्रयत्नशील धारूर व केज तालूक्यात शासकीय कापूस खरेदीची सहा केंद्र सुरू आहेत. ग्रेडर कमी असल्याने रोज एका केंद्रावर खरेदी करण्यात येते. शेतकऱ्यांची अडचण न होता सुरळीत खरेदी व्हावी यासाठी पणन महासंघ उपाययोजना करेल. - एस. एस. इंगळे, उप विभागीय व्यवस्थापक, पणन महासंघ  

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरीGovernmentसरकारBeedबीड