शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

गोवर-पेन्टा लस दिल्यानंतर दुस-या दिवशी बाळाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 19:52 IST

परळी शहरातील वडसावित्रीनगरातील एका ९ महिन्यांच्या बाळाचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. गोवर-पेन्टा लस दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

बीड : परळी शहरातील वडसावित्रीनगरातील एका ९ महिन्यांच्या बाळाचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. गोवर-पेन्टा लस दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बाळाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, मृत्यूचे कारण शोधण्यासाठी प्रसंगी फॉरेन्सिक लॅबला नमुने पाठविले जाणार आहेत.शहरातील वडसावित्रीनगर भागातील निकिता नंदू जाधव या ९ महिन्यांच्या बाळाचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. ९ महिने आणि दीड वर्षे झालेल्या बालकांना आरोग्य विभागाच्या वतीने गोवर- पेन्टा लस दिली जाते. आरोग्यसेविका आणि आशा स्वयंसेविकांनी वडसावित्रीनगर भागातील अंगणवाडीत शनिवारी संबंधित बालकांना लस दिली होती. रविवारी निकिता हिला ताप आला, अंगावर लाल फोड आले, तिचा मृत्यू हा लस दिल्याने झाला, असा आरोप करीत नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.पोलिसांनी त्यांची समजूत काढत शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित जबाबदार व्यक्तींविरुद्ध कारवाई करता येईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी बाळाचे प्रेत अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात नेले. या परिसरातील लक्ष्मी गवळी नामक दीड वर्षाच्या मुलीला लस दिल्यानंतर ताप आला होता, तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. तसेच या भागातील ७ बालकांना लस दिलेली आहे, त्यांना मात्र कुठलाही त्रास दिसून आलेला नाही. नातेवाईकांनी केलेला आरोप आणि रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांनी मांडलेली बाजू पाहता शवविच्छेदन अहवालानंतर निकिताच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. वेळ पडल्यास फॉरेन्सिक लॅबला नमुने पाठविले जाणार आहेत. त्या अहवालावरच पुढील दिशा ठरणार आहे.निकिता जाधव नामक नऊ महिन्याच्या बाळास गोवर-पेन्टा डोस शनिवारी देण्यात आला होता. तिला दिवसभर त्रास नव्हता. सकाळी देखील त्रास नव्हता. मात्र दूध पिऊन बाळ झोपल्यानंतर साडेनऊच्या सुमारास पालकांनी बाळाला रुग्णालयात आणले ते मृतावस्थेत होते. डोस दिल्यानंतर ३ ते ४ तासात रिअ‍ॅक्शन येते. इतर सात बाळांनाही असाच डोस देण्यात आला होता. त्यांना मात्र कोणताही त्रास झालेला नाही. त्यामुळे निकिताचा मृत्यू लसीकरणामुळे झाला असे प्रथमदर्शनी वाटत नाही.- डॉ. संजय गित्ते, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय परळी

टॅग्स :Deathमृत्यू