शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

छळामुळे सूननं संपवल जीवन; तीन दिवसांपासून गुंगारा देणारी सासू पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 16:12 IST

पोलिसांनी धामणगाव येथून सासूस ताब्यात घेतले.

- नितीन कांबळेकडा-सासरच्या जाचाला कंटाळून बेपत्ता झालेल्या २५ वर्षीय विवाहितेचा तीन दिवसांनंतर घराजवळील विहीरीत मृतदेह आढळून आल्यानंतर अंभोरा पोलिसांनी पतीसह सासरा आणि दीर यांना अटक केली होती. दरम्यान, तीन दिवसांपासून फरार असलेल्या सासूस पोलिसांनी आज सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान धामणगाव येथून अटक केली आहे. आशाबाई कल्याण राऊत  (४०) असे अटकेतील महिलेचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील साबलखेड येथील माहेर असलेल्या कोमलचा धामणगाव येथील श्रीकांत कल्याण राऊत याच्याशी विवाह झाला होता.काही वर्ष संसार सुखाचा चालला असताना कोमलला पती,सासरा,सासू,दीर मानसिक त्रास देऊन तिचा छळ करत होते. हा प्रकार सहन न झाल्याने २६ नोव्हेंबर रोजी ती बेपत्ता झाली होती.२९ नोव्हेंबर रोजी तिचा मृतदेह घरालगत असलेल्या राऊत कुटुंबाच्या मालकीच्या विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली. 

दरम्यान, मयत कोमलची आई लक्ष्मी जयराम गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पती श्रीकांत कल्याण राऊत, सासरा कल्याण विठ्ठल राऊत, सासू आशाबाई कल्याण राऊत, दीर निलेश कल्याण राऊत यांच्याविरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी पतीसह सासरा आणि दीर यांना राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली. तर सासू फरार होती.

अखेर आज सकाळी सासू आशाबाईस पोलिसांनी धामणगाव येथून ताब्यात घेतले.ही कामगिरी अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे,पोलिस उपनिरीक्षक रवि देशमाने, पोलीस अंमलदार शिवदास केदार, सुदाम पोकळे पोलिस नाईक सुवर्णा पालवे यांनी केली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवि देशमाने करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी