शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

तारीख पे तारीख! रावसाहेब दानवेंनी घोषणा केली, पण ७ मेला बीड जिल्ह्यात रेल्वे धावलीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 18:47 IST

नगर-आष्टी लोहमार्गावर धावणार होती ७ मेला रेल्वे; पुढच्या तारखेची अधिकृत माहिती रेल्वे लोहमार्ग ,जिल्हा प्रशासनाकडून मिळेना

- नितीन कांबळे कडा (बीड): गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असलेली नगर-बीड-परळी रेल्वेचे काम आता आष्टीपर्यंत पूर्ण झाले आहे. यावर तीन वेळा रेल्वे इंजिनची चाचणी झाली. एवढेच नाहीतर हायस्पीड रेल्वेची चाचणी झाली. मात्र, त्यानंतर ७ मे ला रेल्वे नियमित धावणार असल्याची केवळ घोषणाच ठरली आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई येथील एका कार्यक्रमात अहमदनगर ते आष्टी रेल्वे ७ मे ला धावणार असल्याचे जाहीर केले होते.

मुंबई येथे २९ एप्रिल रोजी नगर-आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावरील रेल्वे मार्ग ७ मेला सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर केले होते. रेल्वे राज्यमंत्र्यानी अधिकृत घोषणा करून देखील रेल्वे धावली नसल्याने बीडकरांची निराशा झाली आहे. रेल्वे नेमकी कोणत्या दिवशी धावणार याची अधिकृत माहिती ना जिल्हा प्रशासनाकडून दिली जातेय ना रेल्वे लोहमार्ग अधिकाऱ्यांकडून. त्यामुळे बीडकरांची स्वप्नपूर्ती कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

अनेक वेळा रेल्वे धावणार असल्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आता नवीन तारीख कोणती असेल याबाबत रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप या मार्गावर रेल्वे धावण्यासंदर्भात कसलेच नियोजन नसल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर दिली. 

टॅग्स :Beedबीडrailwayरेल्वेraosaheb danveरावसाहेब दानवेtourismपर्यटन