शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

दासू वैद्य यांची १० व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 18:41 IST

हे संमेलन येत्या ऑगस्टमध्ये घेण्यात येणार आहे.

अंबाजोगाई ( बीड ) : मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्यावतीने आयोजित '१० व्या अंबाजोगाई साहित्य संमेलना'च्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध, कवी, लेखक प्रा. दासू वैद्य यांची निवड करण्यात आली आहे. प्रा. वैद्य हे अंबाजोगाईचे सुपुत्र असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख आहेत. हे संमेलन येत्या ऑगस्टमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मसाप शाखा अंबाजोगाईचे अध्यक्ष दगडू लोमटे व सचिव गोरख शेंद्रे यांनी दिली आहे.

यापूर्वी प्रा. रंगनाथ तिवारी, शैला लोहिया, प्रा. रा. द. अरगडे, बलभीम तरकसे, प्राचार्य संतोष मुळावकर, मंदा देशमुख, डॉ. श्रीहरी नागरगोजे, गणपत व्यास व डॉ. कमलाकर कांबळे यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. हे १० वे संमेलन आहे. या संमेलनात अनिवासी अंबाजोगाईकर लेखक, कवी, कथाकार यांना आमंत्रित केले जाणार आहे.  

प्रा. दासू वैद्य यांचे शिक्षण अंबाजोगाई व औरंगाबाद येथे झाले आहे. शिक्षण घेत असताना त्यांनी कविता व ललित लेखन सुरू केले व विविध वृत्तपत्रात ते प्रसिद्ध झाले. मराठीत एम. ए., एम. फिल, नेट उत्तीर्ण झाले. त्यांनी नाट्य शास्र विषयात पदवी मिळविली आहे. त्यांनी जालना येथे बारवाले महाविद्यालयात मराठीचे दीर्घ काळ प्राध्यापक म्हणून  अध्यापन केले त्यानंतर औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे मराठी विभाग येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आता ते मराठी विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहात आहेत. तसेच नव्याने सुरू झालेल्या आद्यकवी मुकुंदराज अध्यासन केंद्राचे ते संचालक आहेत. 

शासनाच्या अनेक भाषाविषयक समित्यांवर त्यांनी काम केले आहे. साहित्य अकादमी, आकाशवाणी, साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र फाउंडेशन- अमेरिका, जनस्थान पुरस्कार निवड समिती, अशा अनेक मंडळावर त्यांना सन्मानाने काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी अनेक चित्रपट व मालिकांसाठी, जाहिरातीसाठी गाणी लिहिली, चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक येथील अनेक साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविली आहेत. तसेच त्यांच्या साहित्य कृतींना अनेक मानाचे, सन्मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. 

तूर्तास, तत्पूर्वी हे कविता संग्रह, आजूबाजूला, मेळा हे ललीतबंध, क-कवितेचा हा बाल कवितासंग्रह व भुर्रर्र हा बालकथा संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. तर बिनधास्त, सावरखेडा, भेट, आजचा दिवस माझा,  सोनियाचा उंबरा, गाभ्रीचा पाऊस, तुकाराम, खाली डोकं वरती पाय या चित्रपटासाठी गीत लेखन केले आहे. तसेच टिकल ते पॉलिटिकल, एक होता राजा, आपली माणस, रंग माझा वेगळा, पदरी आलं आभाळ, घर श्रीमंताच,  या मालिकांसाठी पटकथा व शीर्षकगीत लिहिली आहेत. लेक वाचवा अभियानासाठी त्यांनी गीत लिहिले. 

देशभर व महाराष्ट्रातील अनेक संमेलनात त्यांनी आपल्या कविता सादर केल्या आहेत. त्यांच्या या संपूर्ण साहित्य कृतींची व साहित्य सेवेची  दखल घेऊन मराठवाडा साहित्य परिषद शाखा अंबाजोगाई यांनी त्यांना १० व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यपदी यापूर्वीच प्राचार्य बी. आय. खडकभावी यांची निवड करण्यात आली आहे.

टॅग्स :literatureसाहित्यAurangabadऔरंगाबादBeedबीड