शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

बहुतांश शेतकऱ्यांची पिके धोक्यात, तत्काळ पंचनामे करून २५ टक्के अग्रिम रक्कम द्यावी: धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 16:53 IST

हजारो हेक्टर शेती अक्षरशः सुकून गेली असून, माना टाकलेली, शेंगा वाळलेली सोयाबीन बघून वाईट वाटत आहे.

अंबाजोगाई -: बीड जिल्ह्यात मागील चार आठवड्यांपेक्षा अधिक काळात, पिके ऐन जोमात आल्यानंतर पावसाने मोठी उघडीप दिल्याने सोयाबीन, कापूस यासह बहुतांश पिके धोक्यात आली आहेत. हजारो हेक्टर शेती अक्षरशः सुकून गेली असून, माना टाकलेली, शेंगा वाळलेली सोयाबीन बघून वाईट वाटत आहे. ही परिस्थिती बीड जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मागील वर्षी दिले त्याप्रमाणे धोक्यात आलेल्या सर्व पिकांना विमा संरक्षित रकमेच्या किमान २५ टक्के अग्रिम विमा मंजूर करून वितरित करावा, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्य सरकार कडे केली आहे. 

धनंजय मुंडे यांनी आज अंबाजोगाई तालुक्यातील मुरकूटवाडी येथील सुकून गेलेल्या सोयाबीन पिकांची पाहणी केली. दोनही डोळ्यांनी अंध असलेल्या सुनील मुरकुटे यांच्या शेतातील सोयाबीन पाहणी करताना, सुकलेली सोयाबीन, ऐन बहरात वाळून गेलेल्या शेंगा अशी विदारक परिस्थिती पाहून चिंता व्यक्त केली. 

दोनही डोळ्यांनी अंध असलेल्या सुनील मुरकुटे यांच्या समोर संकटांचा डोंगर उभा असून, अशीच विदारक परिस्थिती जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची झाली आहे. या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असून राज्य शासनाने प्रशासनाला व संबंधित विमा कंपन्यांना आदेशित करून तातडीने धोक्यात आलेल्या सर्व पिकांचे पंचनामे करून मागील वर्षी प्रमाणे किमान २५ टक्के अग्रिम रक्कम मंजूर करून तातडीने वितरित करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकार कडे केली आहे. तसेच याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

यावेळी माजी आ. संजय दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. गोविंद फड, राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदारसंघ प्रमुख गोविंद देशमुख, शिवहार भताने गुरुजी, नागनाथ महाराज मुरकुटे, अय्युब भाई शेख, बबन मुंडे, सीताराम हाडबे, सायस मुरकुटे, चंद्रकांत गायकवाड, माऊली गायकवाड, राहुल गायकवाड, कैलास गायकवाड, बापू राऊत यांसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती