शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

वीज नसल्याने पिके धोक्यात, संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 11:53 IST

शेतात सध्या गहू, ज्वारी, हरभरा, कांदा या पिकांना पाण्याची गरज आहे.

- नितीन कांबळेकडा (बीड) : टाकळी अमिया, सराटेवडगांव, निमगांव चोभा, रूई नालकोल, नांदा या गावांत गेल्या पाच दिवसांपासून अचानक विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. पिके धोक्यात आल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी या गावांतील संतप्त शेतकर्‍यांनी आज सकाळी टाकळी अमिया येथील ३३ केव्ही सबस्टेशन येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत निषेध व्यक्त केला.

आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील ३३ के.व्ही. सबस्टेशनमधून  परिसरातील गावांना विद्युत पुरवठा केला जातो. परंतु गेल्या पाच दिवसांपासून महावितरणने अचानक टाकळी अमिया, सराटेवडगांव, निमगांव चोभा, रूई नालकोल, नांदा या गावांतील विद्युत पुरवठा खंडित केला आहे. शेतात सध्या गहू, ज्वारी, हरभरा, कांदा या पिकांना पाण्याची गरज आहे. असे असताना वीज नसल्याने पिके धोक्यात आल्याचे पाहून  शेतकरी जेरीस आला आहे. यामुळे परिसरातील संप्तत शेतकऱ्यांनी आज सकाळी टाकळी अमिया येथील सबस्टेशनला घेराव घालत महावितरणच्या  अभियंत्याना धारेवर धरत निषेध व्यक्त केला. आंदोलनात ज्ञानेश्वर चौधरी, प्रा. राम बोडखे, डाॅ.शिवाजी शेंडगे, अमोल शितोळे, पिनु चौधरी,सावता ससाणे, मधुकर गिर्हे, अशोक चौधरी, अशोक एकशिंगे, श्रीरंग चौधरी, तात्यासाहेब नालकोल, आजिनाथ नालकोल, पांडुरंग धोंडे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी होते. 

थकीत बिलामुळे वीजपुरवठा खंडित याबाबत कडा येथील महावितरणचे सहायक अभियंता दत्तात्रय दसपुते यांनी सांगितले की, या परिसरात थकीत वीजबिलाचा आकडा मोठा आहे. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून सबस्टेशनमधून होणार विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. 

आमचंच खाता आमच्यावर उलटता आता मुबलक पाणी आहे, पेरण्या झाल्या, काही शिल्लक आहेत. पिकाला पाण्याची गरज असताना वीज बंद केली. साहेब आमचचं खाता आणि  आमच्यावर उलटता हे बर नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी शिवाजी भवर यांनी यावेळी दिली.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीBeedबीडmahavitaranमहावितरण