शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

पीक विमा कंपनीला मोठा नफा, शेतकऱ्यांना मिळू शकतात हेक्टरी १० हजार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 12:38 IST

राज्य शासनाने मंजुरी दिली तर, मिळणार हेक्टरी १० हजारांची मदत

ठळक मुद्दे‘बीड पॅटर्न’अंतर्गत जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव 

- प्रभात बुडूख

बीड : पीक विम्यासाठीच्या ‘बीड पॅटर्न’ ची राज्यभरात चर्चा झालेली असतानाच आता या संदर्भातील विविध पत्रांच्या आधारे पीक विमा कंपनीला मागील हंगामात झालेल्या नफ्यातून सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केल्याची सूत्रांची माहिती आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केल्यास मागील वर्षी पीक विमा भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी १० हजाराची मदत मिळू शकते.

बीड जिल्ह्यात मागील वर्षी (२०२०-२१ ) तब्बल १७ लाख ९१ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. यापोटी शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा हिस्सा मिळून ७९८ कोटी पीक विमा कंपनीला भरला होता. मागील हंगामात कंपनीने केवळ १७ हजार शेतकऱ्यांना साडे तेरा कोटी नुकसान भरपाई वाटप केली. म्हणजे एका अर्थाने ७८५ कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. यातील २० टक्के म्हणजे १६० कोटीची रक्कम कंपनीला खर्चापोटी दिली तरी ६२५ कोटी शिल्लक राहणार आहे. ही रक्कम एका अर्थाने नफा असून, ती रक्कम शासनाकडे जमा होणार आहे. या रकमेतून ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी विमा भरला होता त्यांना सरसकट मदत केली जावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येत आहे. यासंदर्भात अधिकृतपणे बोलण्यास प्रशासनातील अधिकारी तयार नाहीत. मात्र असा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

असा आहे बीड पीक विमा पॅटर्नबीड जिल्ह्यात पीक विमा स्वीकारण्यास खाजगी कंपन्या तयार होत नसल्याने राज्य सरकारने विशेष असा ‘बीड पॅटर्न’ तयार केला होता. त्यानुसार विमा कंपनीला द्यावी लागणारी नुकसान भरपाई ११० टक्के पेक्षा अधिक असेल तर, वरची रक्कम राज्य सरकार देईल आणि सदर नुकसान भरपाई ८० टक्के पेक्षा कमी असेल तर, कंपनीला खर्चापोटी २० टक्के रक्कम देऊन उर्वरित रक्कम राज्य सरकार घेईल असा बीड पॅटर्न ठरविण्यात आला होता.

शासनाकडे ६२५.४ कोटी रुपये शिल्लकशेतकरी, राज्य व केंद्र सरकार मिळून विमा कंपनीकडे ७९८. ५८ कोटी रुपये भरणा केला होता. यापैकी २०२० खरीप हंगामात शेतकऱ्यांना १३ कोटी ४७ लाखाची मदत दिली आहे. त्यामुळे शिल्लक रक्कम ७८५. ११ कोटी इतकी असून, बीड पॅटर्ननुसार २० टक्के कंपनी नफा १५९. ७१ कोटी इतका झाला असून, शासनाकडे असलेली शिल्लक रक्कम ६२५.४ कोटी इतकी आहे.

‘लोकमत’ने फोडली होती वाचापीक विमा कंपनीकडे भरण्यात आलेली रक्कम ही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा आहे. त्यामुळे झालेला नफा हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरावा अशा स्वरूपाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.

टॅग्स :RainपाऊसCrop Insuranceपीक विमाagricultureशेती