शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

पतपेढी ऐवजी भूजल पेढी निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:31 IST

अंबाजोगाई : भूगर्भातील पाण्याचा होणारा अतिरेकी उपसा आणि निर्दयीपणे केलेली वृक्षांची कत्तल यामुळे पावसावर होणारा विपरीत परिणाम आणि त्यातून ...

अंबाजोगाई :

भूगर्भातील पाण्याचा होणारा अतिरेकी उपसा आणि निर्दयीपणे केलेली वृक्षांची कत्तल यामुळे पावसावर होणारा विपरीत परिणाम आणि त्यातून निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य,त्यामुळे मानव आज पाणीटंचाईला सामोरे जात आहे. हे आपणच अविवेकीपणाने ओढवून घेतलेले संकट आहे. निसर्ग मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे.परंतु,माणसाची हाव तो पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे पतपेढीपेक्षा भूजल पेढी निर्माण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जलमित्र तथा समाजचिंतक प्रसाद चिक्षे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले. येथील कृषी महाविद्यालयात रासेयोच्या वतीने जागतिक जल दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालय,अंबाजोगाईचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे हे होते तर व्यासपीठावर डॉ.अरुण कदम व जिमखाना उपाध्यक्ष डॉ. प्रताप नाळवंडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चिक्षे म्हणाले, पाणी हेच जीवन आहे, हे सर्वश्रुत आहे. परंतु विद्यार्थ्यांनी आपलं जीवन पाण्याप्रमाणे प्रवाहीपणे जगले पाहिजे. प्रसाद चिक्षे यांनी ते करत असलेल्या पाणी बचतीच्या कामाविषयीचे अनुभव कथन केले. प्रास्ताविक जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ.प्रताप नाळवंडीकर यांनी केले.सूत्रसंचालन डॉ. दीपक लोखंडे यांनी केले तर आभार प्रा. संजय राठोड यांनी मानले.

जलसाक्षर व्हा

पाणी ही नैसर्गिक संपत्ती असून त्याचे जतन व संवर्धन आवश्यक आहे. कृषीच्या विद्यार्थ्यांनी कृषी अक्षराबरोबरच जल साक्षर होऊन शेतकऱ्यांचे अन्नधान्य उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सहकार्य करावे. प्रक्षेत्रावर समतल चर विकसित करून जागेवर पाणी अडवून पूर्णतः जिरवावे. पाणी आणि वाणी समतोल वापरून वर्तमानाबरोबरच भविष्यकाळ ही सुनिश्चित करावा असे आवाहन अध्यक्षीय समारोपात डाॅ.बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.

===Photopath===

240321\24bed_3_24032021_14.jpg