शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

त्यांना घरी तर, आम्हाला शाळेत का ठेवले ? नित्रुड येथील ११ बाधितांनी शाळा सोडून घर गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 20:14 IST

बाहेरून आलेल्या नातेवाईकांना सरपंचाने घरीच क्वारंटाईन केल्याचे कळताच शाळेतील अनेक जण आले घरी

ठळक मुद्देकाहीजणांना थेट घरीच होमक्वारंटाईन करण्याचा प्रकार

- पुरूषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चाललेला असताना गुरुवारी पुन्हा १२ रुग्ण पॉझिटीव्ह निघाले असून यातील  ११ रुग्ण नित्रुड तर, एकजण सुर्डी येथील आहे. नित्रुडचे सर्वजण मुंबईहुन आलेले असून सुरवातीला त्यांना जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आले होते; परंतु सरपंचाच्या नातेवाईकांना घरी ठेवण्यात आल्याने शाळेत ठेवण्यात आलेले घरी निघुन गेले.त्यानंतर ते अनेकांच्या संपर्कात आल्याचे बोलले जात आहे.

चार दिवसापूर्वी जिल्ह्यासह तालुक्यात एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण नव्हता परंतु; हिवरा येथील मुंबईहून आलेला एकजण तर, दोन दिवसानंतर बाजूलाच असलेल्या कवडगावथडी येथील मुंबईहूनच आलेले दोघेजणांना कोरोनाची लागन झाल्याचे रिपोर्ट आले होते. यामुळे माजलगाव तालुका चांगलाच हादरला आहे. त्यानंतर गुरुवारी तालुक्यातील तब्बल १२ रुग्णांचे रिपोर्ट हे पॉझिटीव्ह आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. यात सुर्डी (न.) येथील एकजण तर, नित्रुड येथील तब्बल ११ रुग्णांचा समावेश आहे. नित्रुड येथील एकाच कुटुंबातील ११ पॉझिटीव्ह हे मुंबईतील तुर्भे उपनगरातून  १५ मे रोजी रात्री ११ वाजता एका खाजगी वाहनातून विनापरवाना आलेले होते.

सुरवातीला सर्व नागरिकांना नित्रुड प्रशासनाने जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते; परंतु सरपंचाचे नातेवाईक मुंबईतुन आलेला एक तर सोलापूर येथून आलेल्या दोन जनांना ग्रामपंचायत प्रशासनाने होमक्वारंटाईन करून घरी ठेवल्याची माहिती या ११ लोकांना कळाली. यामुळे त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांना घरी तर, आम्हाला शाळेत का ठेवले ? आम्हालाही घरीच जायचे असे म्हणत ते थेट घरी निघून गेल्याची माहिती नित्रुड येथील नागरिकांनी दिली. त्यानंतर त्यांच्यावर कोणाचाच अंकुश न राहिल्याने ते गावासह इतर गावांच्याही लोकांच्या संपर्कात आल्याचीही माहिती पुढे येत आहे. गुरुवारी त्या ११ जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. जो तो काळजी करू लागला असून आणखी कोण कोण संपर्कात आले याची चर्चा परिसरात होऊ लागली आहे. तालुक्यात आतापर्यंत पॉझिटीव्ह निघालेले १५ जन हे सर्व मुंबईहूनच आलेले होते. यामुळे तालुक्यात मुंबई, पुण्यासारख्या शहरातून आलेल्या नागरिकांवर स्थानिकांच्या नजरा खिळल्या असून त्यांना प्रतिबंध केल्यास स्थानिकांशी हुज्जत घालण्याचे प्रकार घडत आहेत.

गावागावात होऊ लागले राजकीय हेवेदावेआठ दिवसापूर्वी तालुक्यातील ग्रामीण भागात मुंबई, पुणे, औरंगाबाद यासारख्या शहरातून मोठ्याप्रमाणात नागरिकांची आवक झाली आहे. स्थानिक पातळीवरच्या राजकीय हेवेदाव्यामुळे यातील काही जणांना स्वतंत्र क्वारंटाईन कक्षात तर, काहीजणांना थेट घरीच होमक्वारंटाईन करण्याच प्रकार होत आहे. यामुळे सर्वजण घरीच जाण्याची घाई करीत असल्याने रुग्णसंख्या वाढण्याला कारणीभूत ठरत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड