शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

coronavirus : संकटकाळात माणुसकीची जोपासना; रस्त्यावरील मनोरुग्णांची मानवलोकने केली भोजनाची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 16:44 IST

संकटकाळात कोणी उपाशी राहू नये

- अविनाश मुडेगांवकर

अंबाजोगाई- "जगी ज्याशी कोणी नाही,त्यास देव आहे.निराधार आभाळाचा तोच भार आहे". या गीता च्या ओळी सार्थ ठरवणारे काम मानवलोक जनसहयोग करीत आहे.संचारबंदीत भूकबळी उदभवू नये याची दक्षता घेत जनसहयोग ने रस्त्यावरच्या मनोरुगनांची दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.       समाजातील उपेक्षितांना आधार देणाचे काम मानवलोक गेल्या ४०वर्षांपासून करीत आहे.जेष्ठ समाजसेवक डॉ द्वारकादास लोहिया यांच्या कार्याचा वारसा त्यांचे कुटुंबीय व संस्थेतील कार्यकर्ते पुढे अखंडीत चालवीत आहेत.शहर व परिसरात फिरणारे निराधार मनोरुग्ण,अपंग यांना कायमस्वरूपी जनसहयोग चा आधार आहे.त्यांची स्वछता,कपडे,उदरनिर्वाह यासाठी काम सुरूच असते.           सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी शहरात लागु आहे.प्रत्येकजण आपापल्या कुटुंबात व घरात बसून आहेत.अशा वेळी आपला जीव धोक्यात घालून रस्त्याच्या कडेला व शहरात इतरत्र राहणाऱ्या मनोरुणांना सर्वत्र असणाऱ्या बंद मुळे भीक ही उपलब्ध होत नाही.अशा स्थितीत त्यांची उपासमार होऊ नये म्हणून जनसहयोग चे कार्यकर्ते श्याम सरवदे,संजना आपेट,सावित्री सगरे,मारवाळ  यांनी या मनोरुग्णांना दोन वेळचे जेवण उपलब्ध करून देऊन त्यांची भूकबळी पासुन मुक्तता केली आहे.उदभवलेल्या प्रतिकुल स्थितीतही समाजातील उपेक्षितांसाठी माणुसकी दर्शवत मानवलोक जनसहयोग ने सामाजिक सदभाव जागृत ठेवला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीडsocial workerसमाजसेवक