शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

CoronaVirus : सीमेवर लढून सेवानिवृत्त झाले; घरी येताच पत्नीने क्वारंटाईन केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 20:18 IST

देशभक्तीची जान असलेले फौजी आणि कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या आशा स्वयंसेविकेच्या समजूतदारपणाला सर्वस्तरातून सलाम केला जात आहे.

ठळक मुद्देआशा स्वयंसेविकेच्या प्रामाणिकपणाला फौजी पतीचा ‘सॅल्यूट’

- सोमनाथ खताळबीड : देशाच्या रक्षणासाठी सिमेवर लढले. आता सेवानिवृत्त होऊन घरी परतले. इकडे कोरोना लढ्यात बाहेरून येणाऱ्या लोकांचे सर्वेक्षण करणाऱ्या आणि पत्नी असलेल्या आशा स्वयंसेविकेने त्यांना तात्काळ क्वारंटाईन करून शेतात पाठविले. देशभक्तीची जान असलेले फौजी आणि कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या आशा स्वयंसेविकेच्या समजूतदारपणाला सर्वस्तरातून सलाम केला जात आहे. पाटोदा तालुक्यातील माळेकरवाडी येथे मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे. 

आशाबाई टेकाळे (माळेकरवाडी ता.पाटोदा) या डोंगरकिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत काम करतात तर त्यांचे पती संजय माळेकर हे जबलपूर (मध्य प्रदेश) येथे फौजी होते. ३१ मार्च रोजी ते सेवानिवृत्त झाले. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांना घरी परतता आले नाही. त्यांनी कायदेशीर परवानगी घेत मंगळवारी दुपारी ते गावात परतले. इकडे आशाबाई या गावात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेत होत्या. ५७ लोकांची नोंद झाल्यावर ५८ वी नोंद ही पतीची घ्यावी लागली. नाते हे अतुट असले तरी कर्तव्यही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आशाबार्इंनी क्षणाचाही उशिर न करता त्यांना शेतात पाठवून क्वारंटाईन केले. हा सर्व प्रकार ग्रामस्थ पहात होते. 

दरम्यान, आशा स्वयंसेविकांच्या अशा प्रामाणिक कर्तव्यामुळेच विदेश अथवा बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची नोंद तत्परतेने झाली. त्यांची काळजी घेण्यात आरोग्य विभागाला सुकर झाले. ज्यांना लक्षणे जाणवली त्यांना तात्काळ आयसोलेशनमध्ये पाठविले. त्यामुळेच बीड जिल्ह्याचा कोरोनाचा शुन्य कायम राहिला आहे. त्यामुळे अशा आशा स्वयंसेविकांच्या कर्तव्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. आशा टेकाळे यांच्या कर्तव्याची माहिती समजताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे, डोंंगरकिन्हीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुर शिंदे, डॉ.सुमेधा भोंडवे यांनी त्यांचे स्वागत केले. 

शिस्तप्रिय, नियम अन् सुचनांचे पालनमी फौजी आहे. आम्हाला शिस्तीचे धडे दिले जातात. सध्या सर्व देशभरात कोरोनाचे संकट आहे. त्याला रोखण्यासाठी प्रशासनाने विविध नियम घालून देत सुचना केल्या आहेत. याच सुचनांचे पालन करीत मी क्वारंटाईन झालो. माझ्यामुळे कुटूंब व ग्रामस्थांना त्रास होणार नाही, याची आपण काळजी घेत असल्याचे त्यांनी आपल्याला सांगितल्याचे आशाबाई सांगतात. सुरक्षित आंतर ठेवूनच पुढील २८ दिवस त्यांची काळजी घेऊ, असेही आशाबाई म्हणाल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड