शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळेच बीड कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 11:55 IST

आरोग्य, पोलीस यांच्याबरोबरच महसूल, जिल्हा परिषद, नगरपालिका, शिक्षण, बँक, महावितरण, बीएसएनएल, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा, पत्रकार अशा सर्वांनीच कोरोनावर मात करण्यासाठी दिवसरात्र एक केलेली आहे.

ठळक मुद्दे३३ हजार ऊसतोड मजुरांची तपासणीआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

बीड : बीड जिल्हा सध्या कोरोनामुक्त आहे. जिल्हा प्रशासनाने सुरुवातीपासूनच केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळेच बीडचा शून्य कायम राहिला आहे. सीमाबंदी, नियंत्रणकक्ष, विशेष पथके, चेकपोस्ट तपासणी अन् गावपातळीवरील सर्वेक्षणाचा मोठा फायदा झाला आहे. प्रशासनाच्या उपाययोजनांना नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे कोरोना सीमेवरच रोखण्यात यश आले आहे.

जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्थ असलेल्या यंत्रणेची आहे. सुरुवातीपासूनच विदेश, परजिल्ह्यातून आलेल्या लोकांचे सर्वेक्षण करुन माहिती घेतले. त्यांच्याशी वारंवार संपर्क करुन लक्षणे असणाºयांची आरोग्य तपासणी केली. यासाठी विशेष पथके नियुक्त केली. जिल्हा व आरोग्य प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना सूचना केल्या जात होत्या. याचे पालन नागरिकांनी केले. जे लोक छुप्या मार्गाने आले होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे जरब बसली होती.  याचाच फायदा आतापर्यंत होत आलेला आहे. या उपाययोजनांमुळेच बीड जिल्हा सद्यस्थितीत कोरोनामुक्त आहे.काय केल्या उपाययोजना

२४ तास नियंत्रण कक्षजिल्ह्याच्या ठिकाणी २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन केला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश शिंदेसह १३ कर्मचारी येथे कार्यरत आहेत. आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचे संपर्क शोधणे, संशयित प्रवासी शोधणे, बाहेरुन आलेल्यांशी संपर्क साधून लक्षणे आहेत का याची माहिती घेणे ही सर्व माहिती अद्ययावत करण्याचे काम नियंत्रण कक्षातून करण्यात आले.

सीमेवरील चेकपोस्टवर तपासणीजिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. १४ ठिकाणी चेकपोस्ट तयार केल्या. त्या सुरु झाल्यापासून ७४ हजार ६६ लोकांच्या नोंदी घेतल्या. प्रत्येकाची नोंद व आरोग्य तपासणी करण्यात आली.

गावपातळीवर सर्वेक्षणप्रत्येक शहर व गावात आशा स्वयंसेवीकांमार्फत घरोघरी जाऊन दोनदा सर्वेक्षण करण्यात आले.  यात परदेशातून ११८, परजिल्ह्यातून १ लाख ९४ हजार ४१५ नागरिक आल्याचे उघड झाले. सर्वांना होम क्वारंटाईन करुन लक्षणांबाबत माहिती घेण्यात आली. यासाठी जिल्ह्यात तब्बल ४४० पथके नियुक्त करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक, आरोग्य अधिकारी यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती.

३३ हजार ऊसतोड मजुरांची तपासणीऊसतोडणीसाठी बाहेर गेलेल्या मजुरांना जिल्ह्यात आणले. २० चेकपोस्टवर त्यांची नोंद घेऊन आरोग्य तपासणी केली. २८ दिवसांसाठी क्वारंटाईन केले. १ मे पर्यंत ३३ हजार ४११ मजुरांनी जिल्ह्यात प्रवेश केला होता.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरव्हिडीओ कॉन्फरन्सिंग, ग्रुप कॉलिंग अशा माध्यमातून सूचना केल्या. विविध अ‍ॅपच्या माध्यमातून माहिती संकलित केली. लक्षणे असलेल्या रुग्णांची नोंद घेतली. होम क्वारंटाईन असलेल्यांवर नजर ठेवली. आरोग्य सेतू अ‍ॅपमार्फत स्वत:ची तपासणीही करुन घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. कॉन्टॅक्ट ट्रॅकिंग करण्यात आले.

दररोज १२ हजार लोकांची तपासणीआष्टी तालुक्यातील पिंपळा येथे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळताच परिसरातील ७ किलोमीटरमधील ११ गावे बंद केली. १०० घरांमागे १ प्रमाणे अशा ३० पथकांमार्फत नियमित २६२० घरांपर्यंत जाऊन त्यातील १२ हजार ३४५ व्यक्तींशी संवाद साधला. लक्षणे असणाºयांची तात्काळ तपासणी केली. १४ दिवस ही प्रक्रिया सुरु होती.

कोव्हीड योध्दा म्हणून यांचा सहभागआरोग्य, पोलीस यांच्याबरोबरच महसूल, जिल्हा परिषद, नगरपालिका, शिक्षण, बँक, महावितरण, बीएसएनएल, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा, पत्रकार अशा सर्वांनीच कोरोनावर मात करण्यासाठी दिवसरात्र एक केलेली आहे.

सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजन केल्यामुळे कोरोनाला सीमेवर रोखण्यात यश आले आहे. हा कोरोना जिल्ह्यात येऊ नये म्हणून प्रशासन तर प्रयत्न करीतच आहे, मात्र नागरिकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे.- डॉ. आर. बी. पवारजिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड