शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

कोरोनामुळे माणसातला माणूस जागा झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:31 IST

पाटोदा : माणसाची खरी ओळख ही संकटात होते. सुखात सर्वचजण आपले असतात , मात्र दु:खात व कठीण ...

पाटोदा : माणसाची खरी ओळख ही संकटात होते. सुखात सर्वचजण आपले असतात , मात्र दु:खात व कठीण प्रसंगात आपल्या सोबत कोण राहतो ? याची ओळख २०२० या सरत्या वर्षात कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे झाली. राज्यभरात विविध ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असताना वर्षभरातील सहा ते आठ महिने स्थलांतरित असलेल्या पाटोदा तालुक्यातील कष्टकरी जनतेमध्ये या रोगाचा उपद्रव तुलनेत तेवढा जाणवला नाही

कोरोना या महामारीने देशातील विविध राज्यांसह राज्यातील विविध जिल्ह्यातही कहर निर्माण केला होता. त्यामुळे मार्च २० डिसेंबर २० या काळात राज्यातील विविध जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू असताना बीड जिल्ह्यात मात्र उपद्रव कमीच राहिला.

जिल्ह्यातील पाटोदा हा ऊस तोडणी मजूर म्हणजे कष्टकरी व स्थलांतरितांचा तालुका म्हणून ओळख आहे. मार्च ते जून या काळात इतरत्र हाहाकार निर्माण झाला असताना पाटोदा तालुक्यात मात्र एकही रुग्ण नव्हता. अर्थात पुणे-मुंबई याठिकाणी रोजगारासाठी स्थलांतरित झालेले नागरिक आपापल्या गावी पोहोचल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला मात्र जिल्ह्यातील इतर तालुक्‍यांच्या तुलनेत कमीच. अर्थात या कोरोना काळात प्रत्येक व्यक्ती शेवटचा विचार करत असल्याने या काळात कोण आपला? कोण जवळचा? हेही स्पष्ट झाले

.

या कोरोना काळात ऊस तोडणीसाठी साखर कारखान्यावर गेलेले मजूर आपापल्या गावी परतत असताना पुणे जिल्ह्यातील एका टोलनाक्‍यावर रात्रीच्या वेळी आष्टी, पाटोदा, बीड येथील मजुरांना पोलिसांनी अडविण्यात आल्यानंतर या मजुरांच्या मदतीसाठी आमदार सुरेश धस रात्रीच्या वेळी धावून आले. त्यानंतर त्यांच्यावर जिल्हा बंदीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर याच कोरोनाच्या काळात ऊस तोडणी व वाहतूक दरात वाढ मिळावी यासाठी आमदार सुरेश धस यांनी राज्यभर दौरा करून ऊसतोड मजूर मुकादम व वाहतूकदार यांच्यासाठी राज्यभर लढा उभारल्याने वर्षभरात कोरोनाबरोबर आ. सुरेश धस चर्चेत राहिले.

कोरोना संसर्गाच्या काळात दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या पाटोदा तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच पाऊस चांगला झाल्याने खरिपाची पिके चांगली आली मात्र काढणीच्या वेळेस सततच्या पावसामुळे पिके वाया गेली. मात्र नुकसान झालेल्या पिकांची जिल्ह्यातील इतर तालुक्यात भरपाई मिळाली असताना व तहसील प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे या तालुक्‍यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली नाही तसेच खरिपाचा पीक विमाही मिळण्याची शक्यता बारगळली आहे.