शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

कोरोनामुळे माणसातला माणूस जागा झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:31 IST

पाटोदा : माणसाची खरी ओळख ही संकटात होते. सुखात सर्वचजण आपले असतात , मात्र दु:खात व कठीण ...

पाटोदा : माणसाची खरी ओळख ही संकटात होते. सुखात सर्वचजण आपले असतात , मात्र दु:खात व कठीण प्रसंगात आपल्या सोबत कोण राहतो ? याची ओळख २०२० या सरत्या वर्षात कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे झाली. राज्यभरात विविध ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असताना वर्षभरातील सहा ते आठ महिने स्थलांतरित असलेल्या पाटोदा तालुक्यातील कष्टकरी जनतेमध्ये या रोगाचा उपद्रव तुलनेत तेवढा जाणवला नाही

कोरोना या महामारीने देशातील विविध राज्यांसह राज्यातील विविध जिल्ह्यातही कहर निर्माण केला होता. त्यामुळे मार्च २० डिसेंबर २० या काळात राज्यातील विविध जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू असताना बीड जिल्ह्यात मात्र उपद्रव कमीच राहिला.

जिल्ह्यातील पाटोदा हा ऊस तोडणी मजूर म्हणजे कष्टकरी व स्थलांतरितांचा तालुका म्हणून ओळख आहे. मार्च ते जून या काळात इतरत्र हाहाकार निर्माण झाला असताना पाटोदा तालुक्यात मात्र एकही रुग्ण नव्हता. अर्थात पुणे-मुंबई याठिकाणी रोजगारासाठी स्थलांतरित झालेले नागरिक आपापल्या गावी पोहोचल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला मात्र जिल्ह्यातील इतर तालुक्‍यांच्या तुलनेत कमीच. अर्थात या कोरोना काळात प्रत्येक व्यक्ती शेवटचा विचार करत असल्याने या काळात कोण आपला? कोण जवळचा? हेही स्पष्ट झाले

.

या कोरोना काळात ऊस तोडणीसाठी साखर कारखान्यावर गेलेले मजूर आपापल्या गावी परतत असताना पुणे जिल्ह्यातील एका टोलनाक्‍यावर रात्रीच्या वेळी आष्टी, पाटोदा, बीड येथील मजुरांना पोलिसांनी अडविण्यात आल्यानंतर या मजुरांच्या मदतीसाठी आमदार सुरेश धस रात्रीच्या वेळी धावून आले. त्यानंतर त्यांच्यावर जिल्हा बंदीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर याच कोरोनाच्या काळात ऊस तोडणी व वाहतूक दरात वाढ मिळावी यासाठी आमदार सुरेश धस यांनी राज्यभर दौरा करून ऊसतोड मजूर मुकादम व वाहतूकदार यांच्यासाठी राज्यभर लढा उभारल्याने वर्षभरात कोरोनाबरोबर आ. सुरेश धस चर्चेत राहिले.

कोरोना संसर्गाच्या काळात दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या पाटोदा तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच पाऊस चांगला झाल्याने खरिपाची पिके चांगली आली मात्र काढणीच्या वेळेस सततच्या पावसामुळे पिके वाया गेली. मात्र नुकसान झालेल्या पिकांची जिल्ह्यातील इतर तालुक्यात भरपाई मिळाली असताना व तहसील प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे या तालुक्‍यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली नाही तसेच खरिपाचा पीक विमाही मिळण्याची शक्यता बारगळली आहे.