शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

Corona Virus : संचारबंदी शिथिलतेची वेळ बदली ; सकाळी-सकाळी व्यापारी,नागरिकांची उडाली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 16:45 IST

सुरुवातीला 11 ते 3 यावेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती

ठळक मुद्देदुकानदाराकडून ग्राहकांना शिस्त लावण्याचा प्रयत्नअचानक वेळ बडल्याने व्यापारी व ग्राहकांची पळापळ 

माजलगाव : संचारबंदीची वेळ शनिवारी अचानक बदलल्याने व्यापाऱ्यांना  सकाळी सकाळी उठून आपली दुकाने उघडावी लागली तर ग्राहक सकाळीच साहित्य खरेदीच्या रांगेत उभा दिसून आले.  विशेष म्हणजे , व्यापारी देखील ग्राहकांना शिस्तीचे धडे देऊन रांगेत येण्याचा आग्रह करत आहेेेत. ग्राहक देखील शिस्तीचे पालन करताना दिसून येत होते.

मागील आठवड्यात संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी दुपारी 11 ते 3 या काळात संचारबंदी शिथिल करण्यात येत होती. परंतु या दरम्यान अनेक जण काहीच काम नसताना रस्त्याने फिरत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. रस्त्यावरील गर्दी कमी करावी या उद्देशाने प्रशासनाने शनिवारी रात्री अचानक निर्णय घेऊन रविवारपासून अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी सात ते साडे नऊ ही वेळ दिली. ही वेळ कळताच  9 -10 वाजता दुकानात उघडणारे व्यापारी धावत पळत सकाळी 7 वाजता बरोबर दुकान उघडून बसले होते. 

दुकानदाराप्रमाणेच ग्राहक देखील सकाळी सात वाजल्यापासून पिशव्या घेऊन फिरताना दिसत होते. सकाळची वेळ असल्यामुळे अनेक जण उठलेच नव्हते तर बिनकामाचे लोक इकडे फिरकलेच नाहीत. यामुळे किराणा साहित्य व भाजीपाला घेण्यासाठी मोजकेच लोक बाहेर पडले होते यामुळे रस्त्यावर देखील गर्दी जास्त दिसून आली नाही. काहीजण विनाकारण फिरणारे बाहेर येइपर्यंत सर्व व्यापार बंद दिसू लागले. व दहा वाजल्यापासून सर्व रस्ते सामसूम झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.      दरम्यान व्यापाऱ्यांनी ग्राहकांना ओट्याच्या खाली उभा करून दुरूनच त्यांना पाहिजे असलेले सामान दिले जात होते तर अनेक दुकानदारांनी दुकानाबाहेर हात धुण्यासाठी व्यवस्था केली होती. ग्राहक देखील या सर्व बाबींचे पालन करताना दिसत होते. हे सर्व सुरू असताना कोठेही छोटी-मोठी कुरबूर देखील पाहावयास मिळाली नाही. यावरून सर्व जण कोरोना विरोधात एकीने लढत असल्याचे चित्र सकाळी-सकाळी पाहावयास मिळाले.व्यापाऱ्यांना सकाळी-सकाळी येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने व सर्वांनी वेळेत दुकाना उघडुन त्या वेळेत स्वतःहून बंद देखील केल्या यामुळे प्रशासनाचा देखील ताण कमी झाला.आम्ही सर्व व्यापाऱ्यांना सोशल मीडियाद्वारे कोणतेही साहित्य जास्त दरात विक्री करू नये असे कळवले असून प्रत्येक दुकानदारांनी ग्राहकांना सेवा देताना शिस्तीत व लांब अंतर ठेवून व्यवहार केला. सकाळची वेळ असली तरी या काळात विनाकारण फिरणा-या लोकांचा त्रास कमी झाला.-- संजय सोळंके , तालुका अध्यक्ष किराणा  असोसिएशन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड