शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

Corona Virus : संचारबंदी शिथिलतेची वेळ बदली ; सकाळी-सकाळी व्यापारी,नागरिकांची उडाली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 16:45 IST

सुरुवातीला 11 ते 3 यावेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती

ठळक मुद्देदुकानदाराकडून ग्राहकांना शिस्त लावण्याचा प्रयत्नअचानक वेळ बडल्याने व्यापारी व ग्राहकांची पळापळ 

माजलगाव : संचारबंदीची वेळ शनिवारी अचानक बदलल्याने व्यापाऱ्यांना  सकाळी सकाळी उठून आपली दुकाने उघडावी लागली तर ग्राहक सकाळीच साहित्य खरेदीच्या रांगेत उभा दिसून आले.  विशेष म्हणजे , व्यापारी देखील ग्राहकांना शिस्तीचे धडे देऊन रांगेत येण्याचा आग्रह करत आहेेेत. ग्राहक देखील शिस्तीचे पालन करताना दिसून येत होते.

मागील आठवड्यात संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी दुपारी 11 ते 3 या काळात संचारबंदी शिथिल करण्यात येत होती. परंतु या दरम्यान अनेक जण काहीच काम नसताना रस्त्याने फिरत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. रस्त्यावरील गर्दी कमी करावी या उद्देशाने प्रशासनाने शनिवारी रात्री अचानक निर्णय घेऊन रविवारपासून अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी सात ते साडे नऊ ही वेळ दिली. ही वेळ कळताच  9 -10 वाजता दुकानात उघडणारे व्यापारी धावत पळत सकाळी 7 वाजता बरोबर दुकान उघडून बसले होते. 

दुकानदाराप्रमाणेच ग्राहक देखील सकाळी सात वाजल्यापासून पिशव्या घेऊन फिरताना दिसत होते. सकाळची वेळ असल्यामुळे अनेक जण उठलेच नव्हते तर बिनकामाचे लोक इकडे फिरकलेच नाहीत. यामुळे किराणा साहित्य व भाजीपाला घेण्यासाठी मोजकेच लोक बाहेर पडले होते यामुळे रस्त्यावर देखील गर्दी जास्त दिसून आली नाही. काहीजण विनाकारण फिरणारे बाहेर येइपर्यंत सर्व व्यापार बंद दिसू लागले. व दहा वाजल्यापासून सर्व रस्ते सामसूम झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.      दरम्यान व्यापाऱ्यांनी ग्राहकांना ओट्याच्या खाली उभा करून दुरूनच त्यांना पाहिजे असलेले सामान दिले जात होते तर अनेक दुकानदारांनी दुकानाबाहेर हात धुण्यासाठी व्यवस्था केली होती. ग्राहक देखील या सर्व बाबींचे पालन करताना दिसत होते. हे सर्व सुरू असताना कोठेही छोटी-मोठी कुरबूर देखील पाहावयास मिळाली नाही. यावरून सर्व जण कोरोना विरोधात एकीने लढत असल्याचे चित्र सकाळी-सकाळी पाहावयास मिळाले.व्यापाऱ्यांना सकाळी-सकाळी येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने व सर्वांनी वेळेत दुकाना उघडुन त्या वेळेत स्वतःहून बंद देखील केल्या यामुळे प्रशासनाचा देखील ताण कमी झाला.आम्ही सर्व व्यापाऱ्यांना सोशल मीडियाद्वारे कोणतेही साहित्य जास्त दरात विक्री करू नये असे कळवले असून प्रत्येक दुकानदारांनी ग्राहकांना सेवा देताना शिस्तीत व लांब अंतर ठेवून व्यवहार केला. सकाळची वेळ असली तरी या काळात विनाकारण फिरणा-या लोकांचा त्रास कमी झाला.-- संजय सोळंके , तालुका अध्यक्ष किराणा  असोसिएशन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड