शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
2
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
3
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद BJP कडे ठेवले, २० वर्षांनंतर गृह खाते सोडले
4
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
5
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
6
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
7
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
8
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
9
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
10
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
11
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
12
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
13
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
14
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
15
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
18
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
19
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
20
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
Daily Top 2Weekly Top 5

लग्न सोहळ्यासाठी ५० लोकांची कोरोना चाचणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST

बीड : निर्बंध शिथिल होताच लग्न समारंभामध्ये कोरोनाचे नियम पायदळी तुडविले जात असल्याने जिल्हा प्रशासनाने कठोर पावले ...

बीड : निर्बंध शिथिल होताच लग्न समारंभामध्ये कोरोनाचे नियम पायदळी तुडविले जात असल्याने जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार विवाह आयोजन करणाऱ्या वर आणि वधू पक्षाकडील मंडळींना अँटिजन आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे. नियमांचे पालन होते की नाही, याची नगर परिषद, नगर पंचायत व पोलीस विभागाने खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी तसेच ५० लोकांची उपस्थिती मर्यादा घालून देण्यात आली आहे. तरीदेखील जिल्ह्यात सर्वत्र लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होत असल्याने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी नियमावली लागू केली आहे.

सर्वप्रथम विवाह आयोजक वधूपक्ष किंवा वरपक्षाने संबंधित मंगल कार्यालय, मॅरेज हॉल हॉटेलमध्ये आवश्यक तारखेची पूर्वनोंदणी करावी. मंगल कार्यालय, मॅरेज हॉल, हॉटेल मालकांनी एका दिवशी केवळ एकाच विवाहाला परवानगी द्यावी. तारीख निश्चित झाल्यानंतर स्थानिक पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक करण्यात आले आहे.

स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी प्राप्त होताच उपस्थित राहणाऱ्यांची यादी, माहिती व पोलीस प्रशासनाच्या परवानगीचे पत्र संबंधित मंगल कार्यालय, मॅरेज हॉल, हॉटेल मालकाचे नाव ग्रामपंचायत, नगर परिषद, नगर पंचायतीकडे दाखल करावे लागणार आहे. ग्रामसेवक अथवा मुख्याधिकारी यांनी नियोजित तारखेच्या वेळेत संबंधित ठिकाणी भेट देऊन कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत. कोरोना नियमांचा भंग होत असल्यास संबंधित विवाह समारंभ आयोजकांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलीस करणार खात्री

स्थानिक पोलीस प्रशासनाने परवानगी देताना उपस्थित सर्व ५० लोकांची नावे, पत्ता, संपर्क क्रमांकाची यादी मंगल कार्यालय चालकांनी आयोजकांकडून घ्यावी. तसेच त्यांनी उपस्थित सर्वांचे अँटिजन आणि आटीपीसीआर तपासणी करून अहवाल निगेटिव्ह असल्याबाबत खात्री करावी.

भोजनावळीवर राहणार नजर

लग्न समारंभ आयोजकांनी उपस्थित लोकांना विवाहस्थळी पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे. मास्क वापरणे बंधनकारक करावे. लग्नस्थळी अनावश्यक गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. लग्नाकरिता बैठक तसेच भोजन व्यवस्थेमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल, याची दक्षता आयोजकांना घ्यावी लागणार आहे. घरी लग्नाचे आयोजन केले असेल तर सर्वप्रथम पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.