शहरं
Join us  
Trending Stories
1
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
11
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
12
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
13
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
14
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
15
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
16
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
17
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
18
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
19
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
20
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना, मोबाईलवेडाने उडविली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:22 IST

बीड : मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे विविध कारणांमुळे वाढलेली चिंता, नैराश्य आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे झोप उडाली ...

बीड : मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे विविध कारणांमुळे वाढलेली चिंता, नैराश्य आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे झोप उडाली असून, बदलत्या लाईफस्टाईलमुळे विविध आजार बळावत आहेत.

ताणतणाव, काळजी, भीतीमुळे किंवा अगदी उगाचच सतत मध्येच जाग येणे अशा समस्या वाढल्या आहेत. काहींना तर मुळातच झोप लागत नाही. व्यवस्थित झोप झाली नाही, तर त्याचे विपरित परिणाम आपल्या शरीराबरोबर मनावरसुद्धा दिसू लागतात. पुरेशी झोप झाली नाही, तर लक्ष सतत विचलित होऊन कामाच्या ठिकाणी त्रास होतो. झोप पूर्ण न झाल्याने भूक, कामाची व इतर शरीरधर्मांची वेळसुद्धा नियमितपणे पाळली जात नाही. ज्यामुळे पित्तासारखे आजार असणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

भारतीयांची जीवनशैली समाजप्रेमी व समूहप्रेमी आहे. मात्र कोरोनाकाळात अनेकांना घरातच राहावे लागल्याने एकटेपणा वाढला. अनेकांचा रोजगार हिरावला. आजाराची भीती आणि आजारामुळे चिंता वाढल्या. या आव्हानांना तोंड देताना आलेले नैराश्य तसेच कौटुंबिक ताणतणावामुळे शरीराला पुरेशी झोप मिळाली नसल्याने इतर आजार बळावत आहेत; तर दुसरीकडे मनोरंजनासाठी रात्रीपासून पहाटेपर्यंत टीव्ही पाहणे, मोबाईलच्या सतत वापरामुळे मुलांसह मोठेदेखील या सवयीचे अधीन झाले आहेत. तर कोरोनामुळे व्यसनाधीनताही वाढल्याचे तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे. झोपण्याची नियमित वेळ बिघडल्याने दैनंदिन वेळापत्रक बिघडल्याचे पाहायला मिळत आहे. तर अनेकांना मेंदू, हृदयरोग, यकृताच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असून, बिघडलेल्या मनस्थितीचे प्रमाण चिंताजनक आहे.

------------------

झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम

दोन किंवा मर्यादित वेळेपेक्षा जास्त टी.व्ही, मोबाईल, कॉम्प्युटरच्या वापरामुळे इंटरनेट ॲडिक्ट होणाऱ्यांचे प्रमाण वाढले.

झोप कमी झाल्यामुळे दुसऱ्यादिवशीचे नियोजन बिघडते. मेंदू, हृदय, यकृतासह शरीराच्या अवयवांना विश्रांती मिळत नाही. झोप कमी झाल्यास शरीराच्या प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो.

--------------

झोप का उडते

व्यायामाचा अभाव असल्याने थकवा येत नाही, त्यामुळे झोप उडते. विविध व्यसनांच्या आहारी गेल्याने झोप येत नाही. आजार किंवा दुखत असेल, तर झोप लागत नाही. मानसिक आजार, उदासीनता, नैराश्य तसेच विविध कारणांमुळे निर्माण झालेल्या चिंता, ताणतणावामुळे झोप उडते.

----------

टी. व्ही., मोबाईल व इतर गॅजेटसाठी वेळमर्यादेचे भान ठेवावे. दोन तासांपेक्षा जास्त वापर नसावा, वेळ निश्चित करावी. प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सद्यपरिस्थितीत आठ तास झोप आवश्यक आहे. झोप घेतल्यामुळे मेंदू, हृद्य, यकृतासह इतर अवयवांना आराम मिळतो. ताण कमी करण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. - डॉ. सुदाम मोगले, मनोविकार तज्ज्ञ, बीड.

-----------------

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेच्या गोळ्या नको

झोप येत नसल्याने अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थेट औषधी, गोळ्या घेतात, हे टाळणे आवश्यक आहे. गोळ्यांची शरीराला सवय लागते. पुढे चालून गोळीशिवाय झोप येत नाही, त्याचे शरीरावर विपरित परिणाम होतात.

-------------

चांगली झोप यावी म्हणून

ध्यानधारण करून मनाची एकाग्रता वाढवा, मंत्रोच्चार केल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, गरुडासन, अर्धचंद्रासन, शीर्षासन आदी योगासने करावीत. दररोज व्यायाम केल्यास वजन आटोक्यात राहते, ताण कमी होतो. आवडीचे संगीत ऐकावे, ज्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.

-----------

झोपण्यापूर्वी दोन तास आधी कोणताही स्क्रीन (मोबाइल, टीव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप) पाहायचा नाही. व्यायाम करावा. रोज सूर्यप्रकाश घेतला पाहिजे. झोपेच्या चार तास आधीपासून चहा, कॉफी, टाळले पाहिजे. कॅफिनयुक्त पदार्थ टाळावे. मेडिटेशन करावे. झोपेच्या ठिकाणी मंद प्रकाश आणि वातावरण अल्हाददायक असावे. - डॉ. अनुराग पांगरीकर, अध्यक्ष, आयएमए, बीड.

------------

नेमकी झोप किती हवी

नवजात बाळ - १४ ते १७ तास

एक ते पाच वर्षे - १० ते १४ तास

शाळेत जाणारी मुले - ९ ते ११ तास

२१ ते ४० - ८ ते १० तास

४१ ते ६०- ७ ते ९ तास

६१ पेक्षा जास्त - ७ ते ८ तास

----------