शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

‘निर्मल वारी, हरित वारी’तून पालखी सोहळ्याचा पर्यावरणाला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:06 IST

‘निर्मल वारी हरित वारी’ अभियानातून श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्यातून दिंडीमार्गावर झाडे लावून बिया रोवून पर्यावरणाला हातभार लावण्याचा आगळावेगळा प्रयत्न होत आहे.

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘निर्मल वारी हरित वारी’ अभियानातून श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्यातून दिंडीमार्गावर झाडे लावून बिया रोवून पर्यावरणाला हातभार लावण्याचा आगळावेगळा प्रयत्न होत आहे.

मुक्ताईनगर ते पंढरपुर पालखी मार्गावर वड, चिंच, पिंपळाची मोठी झाडे होती. वारी दरम्यान वारकरी या झाडांच्या सावलीत विसावा घेत, झाडांच्या पारंब्यांना झोका घ्यायचे. हे सगळं काळाच्या ओघात संपले. त्यामुळे यावर्षी पालखी सोहळ्यातून निर्मल वारी हरित वारी अभियान आम्ही राबविले आहे. मुक्ताईनगर येथून निघाल्यानंतर पालखी मार्गावरील ग्रामपंचायत, सामाजिक संस्थांच्या मदतीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम होती घेतला आहे. बाभुळ, चिंच, पिंपळ, वडाची दिडशे झाडे लावली तसेच सर्वच ठिकाणी या झाडांचे बी पेरत आलो आहोत. या झाडांना ‘मुक्ताई वृक्ष’ असे नाव देऊन संगोपनाचे आवाहन केले आहे.आमची पालखी छोटी, पण प्रश्न मोठे३०९ वर्षांची परंपरा असलेल्या संत मुक्ताबाई पालखीचे आणि बीडचे ऋणानुबंध घट्ट आहेत. निजामाच्या काळातही आषाढी वारीला कोणताही त्रास होता कामा नये, असे फर्मान निजाम सरकारचे होते. आता मात्र पालखी सोहळ्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत पालखी प्रमुख रविंद्र महाराज हरणे यांनी व्यक्त केली. आषाढी वारीनिमित्त निघणारे सात मानाचे पालखी सोहळे आहेत. दोन मोठ्या पालखी सोहळ्यांकडे ज्या प्रमाणात लक्ष दिले जाते त्याप्रमाणे छोट्या पालखी सोहळ्यांकडेही सरकार, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, राहण्याची व्यवस्था, मोबाईल टॉयलेट आदी मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :BeedबीडPandharpur Wariपंढरपूर वारीMarathwadaमराठवाडाenvironmentवातावरण