शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

सखोल तपास करा, सूत्रधाराला पकडा; शरद पवार यांची मस्साजोगप्रकरणी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 07:09 IST

बीड, परभणीत पीडितांच्या कुटुंबियांना दिली भेट

केज (जि. बीड) : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा यंत्रणेने खोलवर जाऊन तपास करावा व सर्व आरोपींसह, या घटनेमागील मुख्य सूत्रधाराला अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केली. मस्साजोग येथे देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. 

पवार म्हणाले, शासनाने तपासासाठी एसआयटी नेमून, न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. सर्व आरोपींना अटक करून, मुख्य सूत्रधारालाही अटक झाली पाहिजे. त्याच्या मोबाइलचे सीडीआर काढून तपास केला, तर या वस्तुस्थिती समोर येईल. 

मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी

सरपंच देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन यापुढे ही मुले बारामती येथील विद्यानिकेतन येथे त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण घेतील, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

'सोमनाथच्या मृत्यूची स्थिती सरकारपर्यंत पोहोचवू'

 परभणीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात भेट देऊन पाहणी केली. तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, शांततेत आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सूर्यवंशी यांना मारहाण करणे योग्य नव्हतेन त्यांच्या मृत्यू प्रकरणाची वस्तुस्थिती सरकारपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आमची आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील सोमनाथच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे विचारले असता, 'सत्ताधाऱ्यांनी भेटी देणे चांगले असले तरीही केवळ भेटी न देता दोषींवर कडक कारवाई करून चांगला संदेश द्यावा,' असे म्हणत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीवर टोला लगावला.

तपासात त्रुटी राहणार नाही याची खबरदारी घेऊ; अजित पवार यांचे मस्साजोगमध्ये आश्वासन

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणे ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या गुन्ह्यातून कोणाचीही सुटका होऊ नये यासाठीच सरकारने एसआयटी व न्यायालयीन अशी दोन प्रकारे चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. या तपासात कुठलीही त्रुटी राहणार नाही, याची खबरदारी राज्य सरकार घेत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. शनिवारी सायंकाळी मस्साजोग येथे ते बोलत होते. येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची पवार यांनी शनिवारी सायंकाळी भेट घेत सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी गावकरी व माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, "सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी आणि न्यायालयीन अशा दोन्हीही चौकशा केल्या जातील, अशी सभागृहात घोषणा केली आहे. या तपासात कुठलीही त्रुटी किंवा उणीव राहणार नाही, याची राज्य सरकार खबरदारी घेणार आहे. या गुन्ह्यातून कोणीही सुटणार नाही," असे आश्वासनही पवार यांनी गावकऱ्यांना दिले. दरम्यान, अजित पवार यांचा धावता दौरा तसेच चार आरोपी मोकाटच असल्यामुळे गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला. दोन दिवसांत आरोपीस अटक करा, अशी मागणीही गावकऱ्यांनी यावेळी केली

टॅग्स :BeedबीडSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस