शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

जलयुक्त, शेततळ्याची कामे मुदतीत पूर्ण करा-सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:23 IST

जलयुक्त शिवार अभियानातील कामे तसेच मागेल त्याला शेततळे योजनेचे यंत्रणांना दिलेले कामाचे उद्दिष्ट दिलेली कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी संबधित अधिका-यांना दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जलयुक्त शिवार अभियानातील कामे तसेच मागेल त्याला शेततळे योजनेचे यंत्रणांना दिलेले कामाचे उद्दिष्ट दिलेली कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी संबधित अधिका-यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार अभियान व मागेल त्याला शेततळे योजनेच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, उपजिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे, उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विष्णू मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

२०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियानातंर्गत तीन टप्यात ७२२ गावांची निवड करण्यात आली असून टप्पा क्र. १ अंतर्गत निवड केलेल्या २७१ गावांमधील कामे पूर्ण झालेली आहेत. टप्पा क्र. २ मध्ये २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील २५६ गावांची निवड करण्यात आली असून गावातील कामांचा कालावधी २०१८ मार्च अखेर समाप्त होणार आहे. यामध्ये विविध यंत्रणाची एकूण ५०७३ कामे प्रस्तावित करण्यात आली असून जानेवारी २०१८ अखेर ३४४३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

याकामामध्ये बांधबंदिस्ती, खोल समतल चर, माती नाला बांध, पाझर तलाव, गांव तलाव, सिंचन तलाव दुरुस्ती, सिंमेट नाला बांध व माती नाला बांध दुरुस्ती, पुनरुज्जीवन, शेततळी, जलस्त्रोतातील गाळ काढणे इत्यादी कामांचा समावेश असून उर्वरित कामे मार्च- २०१८ अखेर पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांचे नियोजन व कालबध्द कार्यक्रमाबाबत तालुकानिहाय व क्षेत्रीय कर्मचारी निहाय जिल्हाधिकरी एम.डी. सिंह यांनी सविस्तर आढावा घेवून प्रलंबित कामे मार्च २०१८ अखेर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अंमलबजावणी यंत्रणांना केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी एम. डी सिंह यांनी टप्पा क्र. ३ मध्ये २०१७-१८ साठी जिल्ह्यातील एकूण १९५ गावांची निवड करण्यात आली असून विविध यंत्रणांची एकूण ३३८५ कामे आराखडयात प्रस्तावित करण्यात आली आहेत. एकूण आराखडा १३९.८१ कोटी रुपयाचा आहे. टप्पा क्र. तीन मध्ये बांधबंदिस्ती, खोल समतल चर इत्यादी क्षेत्र उपचाराची कामे ८९२६५ या क्षेत्रावर प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. तसेच माती नाला बांध, अर्दन स्ट्रक्चर, सिंमेट नाला बांध, पाझर तलाव, गाव तलाव, कोल्हापुरी बंधारा, सिंचन तलाव दुरुस्ती, सिंमेट नाला बांध व माती नाला बांध दुरुस्ती, पुनरुज्जीवन शेततळी, वनविभागामार्फत वनतळी, गुरे प्रतिबंधक चर जलस्त्रोतातील गाळ काढणे इत्यादी कामांचा समावेश आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करावे कामांची सविस्तर अंदाजपत्रके तयार करुन त्यास प्रशासकीय मान्यता घेऊन निविदा प्रक्रियेची कार्यवाही सुरु करावी अशा सूचना त्यांनी केल्या.

तसेच मागेल त्याला शेततळे कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात ६ हजार ५०० शेततळे उभारण्याचे उदिष्ट देण्यात आले आहे. एकूण १२ हजार ३१२ शेतकºयांनी आॅनलाईन पध्दतीने अर्ज सादर केले असून ७ हजार ९०३ शेतकºयांना कामे करण्यासाठी कार्यारंभ आदेश दिले आहेत. १५ फेब्रुवारी अखेर एकूण ३ हजार ७५४ शेततळयाची कामे पूर्ण झाली असून ५२६ कामे प्रगती पथावर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विष्णू मिसाळ यांनी दिली. या बैठकीस जिल्हा व तालुकास्तरीय समितीचे सदस्य, यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.