शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

जलयुक्त, शेततळ्याची कामे मुदतीत पूर्ण करा-सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:23 IST

जलयुक्त शिवार अभियानातील कामे तसेच मागेल त्याला शेततळे योजनेचे यंत्रणांना दिलेले कामाचे उद्दिष्ट दिलेली कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी संबधित अधिका-यांना दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जलयुक्त शिवार अभियानातील कामे तसेच मागेल त्याला शेततळे योजनेचे यंत्रणांना दिलेले कामाचे उद्दिष्ट दिलेली कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी संबधित अधिका-यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार अभियान व मागेल त्याला शेततळे योजनेच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, उपजिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे, उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विष्णू मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

२०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियानातंर्गत तीन टप्यात ७२२ गावांची निवड करण्यात आली असून टप्पा क्र. १ अंतर्गत निवड केलेल्या २७१ गावांमधील कामे पूर्ण झालेली आहेत. टप्पा क्र. २ मध्ये २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील २५६ गावांची निवड करण्यात आली असून गावातील कामांचा कालावधी २०१८ मार्च अखेर समाप्त होणार आहे. यामध्ये विविध यंत्रणाची एकूण ५०७३ कामे प्रस्तावित करण्यात आली असून जानेवारी २०१८ अखेर ३४४३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

याकामामध्ये बांधबंदिस्ती, खोल समतल चर, माती नाला बांध, पाझर तलाव, गांव तलाव, सिंचन तलाव दुरुस्ती, सिंमेट नाला बांध व माती नाला बांध दुरुस्ती, पुनरुज्जीवन, शेततळी, जलस्त्रोतातील गाळ काढणे इत्यादी कामांचा समावेश असून उर्वरित कामे मार्च- २०१८ अखेर पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांचे नियोजन व कालबध्द कार्यक्रमाबाबत तालुकानिहाय व क्षेत्रीय कर्मचारी निहाय जिल्हाधिकरी एम.डी. सिंह यांनी सविस्तर आढावा घेवून प्रलंबित कामे मार्च २०१८ अखेर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अंमलबजावणी यंत्रणांना केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी एम. डी सिंह यांनी टप्पा क्र. ३ मध्ये २०१७-१८ साठी जिल्ह्यातील एकूण १९५ गावांची निवड करण्यात आली असून विविध यंत्रणांची एकूण ३३८५ कामे आराखडयात प्रस्तावित करण्यात आली आहेत. एकूण आराखडा १३९.८१ कोटी रुपयाचा आहे. टप्पा क्र. तीन मध्ये बांधबंदिस्ती, खोल समतल चर इत्यादी क्षेत्र उपचाराची कामे ८९२६५ या क्षेत्रावर प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. तसेच माती नाला बांध, अर्दन स्ट्रक्चर, सिंमेट नाला बांध, पाझर तलाव, गाव तलाव, कोल्हापुरी बंधारा, सिंचन तलाव दुरुस्ती, सिंमेट नाला बांध व माती नाला बांध दुरुस्ती, पुनरुज्जीवन शेततळी, वनविभागामार्फत वनतळी, गुरे प्रतिबंधक चर जलस्त्रोतातील गाळ काढणे इत्यादी कामांचा समावेश आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करावे कामांची सविस्तर अंदाजपत्रके तयार करुन त्यास प्रशासकीय मान्यता घेऊन निविदा प्रक्रियेची कार्यवाही सुरु करावी अशा सूचना त्यांनी केल्या.

तसेच मागेल त्याला शेततळे कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात ६ हजार ५०० शेततळे उभारण्याचे उदिष्ट देण्यात आले आहे. एकूण १२ हजार ३१२ शेतकºयांनी आॅनलाईन पध्दतीने अर्ज सादर केले असून ७ हजार ९०३ शेतकºयांना कामे करण्यासाठी कार्यारंभ आदेश दिले आहेत. १५ फेब्रुवारी अखेर एकूण ३ हजार ७५४ शेततळयाची कामे पूर्ण झाली असून ५२६ कामे प्रगती पथावर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विष्णू मिसाळ यांनी दिली. या बैठकीस जिल्हा व तालुकास्तरीय समितीचे सदस्य, यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.