शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

चला! नाव सांगा, मोजा वजन अन् उंची, घ्या थुंकीचा नमुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:36 IST

फोटो : 08बीईडीपी१३ - आयसीएमआरच्या पथकाकडून नागरिकांची तपासणी करतानाचे छायाचित्र. स्पॉट रिपोर्ट - मु.पो.आर्वी ता.शिरूर बीड : राज्यासह देशात ...

फोटो : 08बीईडीपी१३ - आयसीएमआरच्या पथकाकडून नागरिकांची तपासणी करतानाचे छायाचित्र.

स्पॉट रिपोर्ट - मु.पो.आर्वी ता.शिरूर

बीड : राज्यासह देशात क्षयरोगाचे प्रमाण किती आहे, हे शोधण्यासाठी आयसीएमआरकडून सर्वेक्षण केले जात आहे. महाराष्ट्रात यासाठी ५७ ठिकाणांची निवड केली आहे. तब्बल ५५ वर्षांनंतर असे सर्वेक्षण केले जात आहे. बीडमधील शिरूर तालुक्याच्या आर्वी गावात हे सर्वेक्षण सुरू असून, १५ वर्षांपुढील व्यक्तिंची तपासणी केली जात आहे. यात नाव, वजन, उंची मोजून थुंकीचा नमुना घेतला जात आहे. याच्या अहवालावरूनच भविष्यात उपाययोजना केल्या जाणार आहेत.

राज्यात साधारण १९६५ साली असे सर्वेक्षण झाले होते. आता आयसीएमआरने गतवर्षीपासून या संशोधनास सुरुवात केली. यासाठी राज्यातील ५७ ठिकाणांची निवड केली. या सर्वेक्षणाला सुरूवात झाली आणि लगेच कोरोना आला. त्यामुळे हे सर्वेक्षण थांबवून कोरोनाचे सर्वेक्षण झाले. आता कोरोनाचे तीनही टप्पे पूर्ण झाल्याने पुन्हा या सर्वेक्षणाला सुरूवात झाली आहे. बीडच्या शिरूर तालुक्यातील आर्वी गावात हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावरूनच एक नकाशा दिला असून, त्याद्वारे १५ वर्षांपुढील व्यक्तिंची तपासणी केली जात आहे. एका ठिकाणी किमान ८०० लोकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट या पथकाला देण्यात आलेले आहे. सात ते आठ दिवस एका गावात सर्वेक्षण केले जाणार आहे.

कसे होते सर्वेक्षण आणि तपासणी?

नकाशाप्रमाणे घरी भेट दिली जाते. १५ वर्षांपुढील व्यक्तिची नोंद घेऊन त्यांना कार्ड दिले जाते. ते कार्ड शिबिराच्या ठिकाणी दाखवून नोंद घेतली जाते. त्यानंतर वजन, उंची मोजून मधुमेह, रक्तदाब किंवा इतर आजार आहेत का, याची विचारणा करून मुलाखत घेतली जाते. तेथून थुंकी तपासणी करून एक्स रे काढला जातो. यात क्षयरोगाची लक्षणे दिसताच संबंधिताची निक्षय ॲपमध्ये नोंद घेतली जाते. त्यानंतर याच व्यक्तिची थुंकी तपासणीसाठी पुण्याच्या आयआरएल प्रयोगशाळेत पाठविली जात आहे. क्षयरोग निष्पन्न झालेल्यांवर तत्काळ उपचारही करण्यास सुरूवात केली जात आहे.

बीडमध्ये ही टीम २४ तास सोबत

आयसीएमआरच्या पथकासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल मुळे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक विजय कारगुडे, सीएचओ संतोष आरेकर, एएनएम, आशाताई, अंगणवाडी सेविका या पथकांसोबत २४ तास सोबत असतात. शांतीवनचे संचालक दीपक नागरगाेजे यांच्याकडूनही या पथकाला सहकार्य केले जात आहे.

राज्यात ३ पथकांत ६९ कर्मचारी

राज्यात हे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी ३ पथके आहेत. एका पथकात किमान २३ अधिकरी, कर्मचारी आहेत. यात वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ, परिचारिका आदींचा समावेश आहे. डॉ. ऋषिकेश आंधळकर हे पथक प्रमुख आहेत. या पथकासोबत सोयी सुविधा व यंत्र असलेली स्वतंत्र गाडीदेखील आहे.

कोट

आर्वी गावात आयसीएमआरच्या पथकाकडून क्षयरोग संशोधनाबाबत सर्वेक्षण सुरू आहे. याला भेट दिली असून, सर्व यंत्रणा त्यांना सहकार्य करीत आहे. नागरिकांची तपासणी करून सॅम्पल घेतले जात आहेत. जे बाधित आढळतात, त्यांची निक्षय ॲपवर नोंद करून उपचार केले जात आहे.

डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड