शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

पाटोदा शहरात वीस दिवसांपासून निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:33 IST

पाटोदा : शहरात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून नगरपंचायतकडून नळाला पाणी न सोडल्यामुळे लोक पाण्यासाठी भटकंती करत आहेत. काही ...

पाटोदा : शहरात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून नगरपंचायतकडून नळाला पाणी न सोडल्यामुळे लोक पाण्यासाठी भटकंती करत आहेत. काही लोक विकत पाणी घेऊन आपली तहान भागवत आहेत. मुख्याधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन पाटोदा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा नसता महिलांचा नगरपंचायतवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष निला पोकळे यांनी दिला आहे.

पाटोदा शहराच्या क्रांतीनगर ,जयसिंग नगर तसेच शिवाजी नगर, माउली नगर आदी भागात गेल्या १५ ते २० दिवसांपासून नगरपंचायतकडून पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर अंतरावर भटकंती करावी लागत आहे. पाटोदा शहरातील अनेक विंधन विहिरी व तसेच विहिरींच्या पाण्याची पातळी खाली गेली असून अनेक विंधन विहिरी बंद पडल्या आहेत. त्यामुळे लोकांना दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते दोनशे- तीनशे रुपये देऊन आपली पाण्याची तहान भागवत आहेत. नगरपंचायतला अनेक वेळा लोकांनी पाणी संदर्भात विनवण्या केल्या मात्र दखल न घेतल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दोन दिवसात जर पाणी सोडले नाही तर शहरातील महिलांचा हंडा मोर्चा काढण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे.