शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

आठवडी बाजार बंदमुळे नागरीकांचे हाल, उलाढालीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST

धारूर : ग्रामीण भागातील लोकांना खरेदी-विक्रीसाठी आधार असलेले आठवडी बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केल्याने एकमेकांची गरज भागवणारे ...

धारूर : ग्रामीण भागातील लोकांना खरेदी-विक्रीसाठी आधार असलेले आठवडी बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केल्याने एकमेकांची गरज भागवणारे हे अर्थचक्र थांबल्याने अनेकांच्या उपजीविकेसोबतच कितीतरी प्रश्न उभे राहिले आहेत. अंबेवडगाव येथील आठवडी बाजाराच्या दिवशी नागरीक प्रतिक्रिया व्यक्त करत होते.

जनावरांच्या आठवडी बाजाराने जिल्हाभर ओळख दिली, लहान वस्तू पासून ते मोठ्या कुठल्याही वस्तू मिळण्याचे आठवडी बाजाराचे ठिकाण कधी बंद नसायचे मात्र वर्षभरात दुसऱ्यांदा कोरोनाच्या कारणामुळे बाजार बंद झाले. आंबेवडगाव बाजारातील उलाढाल लाखोंच्या घरात होती. शिवाय यावर अनेकांची उपजीविका तसेच शेतातील माल विकण्याचा सोपा पर्याय होता. भाजीपाला ,अन्नधान्य विकायचे आणि याच पैशातून दैनंदिन बाजारहाट ही साखळी ग्रामीण भागासाठी पूरक होती. मात्र दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आंबेवडगावचा बाजार मंगळवारी थांबला. सर्वत्र शुकशुकाट होता. कारखाने परत आल्याने बाजार फुलणार असतानाच ते बंद झाल्याने यावर अवलंबून असणाऱ्या अनेकांना धक्का बसला. कारण वर्षभरापासून या संकटाने व्यवसाय कोलमडले होते आता कुठे स्थिरस्थावर होत असताना पुन्हा एकदा संकट उभे राहिल्याने मोठे प्रश्न निर्माण झाले. खरेदी-विक्री करण्यासाठी सोपी बाजारपेठ असलेले आठवडी बाजार अनेकांना उपजीविका देणारे असल्याने ते पूर्ववत बंधने घालून सुरू करावीत अशी मागणी होत आहे.

आठवडी बाजारात शेतातील माल विकून त्यानंतर लागण्याऱ्या वस्तू खरेदी करणे शक्य असायचे बाजार बंद असल्याने विकायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पैसे हाती येणार नाहीत. त्यामुळे खरेदी करताना हात आखडता राहील.

- बालाजी नायकोडे शेतकरी,

वर्षभरापासून व्यवसायात मोठे नुकसान झाले आता कुठे परिस्थिती सुरळीत होत आहे असे वाटतानाच पुन्हा एकदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजार बंद केल्याने मोठी अडचण होणार आहे. कारखाने परतल्याने ग्राहक या काळात वाढतात नेमके याच वेळी बाजार बंद झाल्याने नुकसान होणार आहे. एक बैल जोडी एक लाखाला विकत होती .

- बाबाआप्पा घोळवे , व्यापारी ,

आंबेवडगाव

===Photopath===

090321\img-20210309-wa0106_14.jpg

===Caption===

धारूर तालुक्यातील अंबेवडगाव येथील  आठवडी बाजार मंदमुळे ग्रामीण अर्थचक्राला ब्रेक लागले आहे.