शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

आठवडी बाजार बंदमुळे नागरीकांचे हाल, उलाढालीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST

धारूर : ग्रामीण भागातील लोकांना खरेदी-विक्रीसाठी आधार असलेले आठवडी बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केल्याने एकमेकांची गरज भागवणारे ...

धारूर : ग्रामीण भागातील लोकांना खरेदी-विक्रीसाठी आधार असलेले आठवडी बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केल्याने एकमेकांची गरज भागवणारे हे अर्थचक्र थांबल्याने अनेकांच्या उपजीविकेसोबतच कितीतरी प्रश्न उभे राहिले आहेत. अंबेवडगाव येथील आठवडी बाजाराच्या दिवशी नागरीक प्रतिक्रिया व्यक्त करत होते.

जनावरांच्या आठवडी बाजाराने जिल्हाभर ओळख दिली, लहान वस्तू पासून ते मोठ्या कुठल्याही वस्तू मिळण्याचे आठवडी बाजाराचे ठिकाण कधी बंद नसायचे मात्र वर्षभरात दुसऱ्यांदा कोरोनाच्या कारणामुळे बाजार बंद झाले. आंबेवडगाव बाजारातील उलाढाल लाखोंच्या घरात होती. शिवाय यावर अनेकांची उपजीविका तसेच शेतातील माल विकण्याचा सोपा पर्याय होता. भाजीपाला ,अन्नधान्य विकायचे आणि याच पैशातून दैनंदिन बाजारहाट ही साखळी ग्रामीण भागासाठी पूरक होती. मात्र दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आंबेवडगावचा बाजार मंगळवारी थांबला. सर्वत्र शुकशुकाट होता. कारखाने परत आल्याने बाजार फुलणार असतानाच ते बंद झाल्याने यावर अवलंबून असणाऱ्या अनेकांना धक्का बसला. कारण वर्षभरापासून या संकटाने व्यवसाय कोलमडले होते आता कुठे स्थिरस्थावर होत असताना पुन्हा एकदा संकट उभे राहिल्याने मोठे प्रश्न निर्माण झाले. खरेदी-विक्री करण्यासाठी सोपी बाजारपेठ असलेले आठवडी बाजार अनेकांना उपजीविका देणारे असल्याने ते पूर्ववत बंधने घालून सुरू करावीत अशी मागणी होत आहे.

आठवडी बाजारात शेतातील माल विकून त्यानंतर लागण्याऱ्या वस्तू खरेदी करणे शक्य असायचे बाजार बंद असल्याने विकायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पैसे हाती येणार नाहीत. त्यामुळे खरेदी करताना हात आखडता राहील.

- बालाजी नायकोडे शेतकरी,

वर्षभरापासून व्यवसायात मोठे नुकसान झाले आता कुठे परिस्थिती सुरळीत होत आहे असे वाटतानाच पुन्हा एकदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजार बंद केल्याने मोठी अडचण होणार आहे. कारखाने परतल्याने ग्राहक या काळात वाढतात नेमके याच वेळी बाजार बंद झाल्याने नुकसान होणार आहे. एक बैल जोडी एक लाखाला विकत होती .

- बाबाआप्पा घोळवे , व्यापारी ,

आंबेवडगाव

===Photopath===

090321\img-20210309-wa0106_14.jpg

===Caption===

धारूर तालुक्यातील अंबेवडगाव येथील  आठवडी बाजार मंदमुळे ग्रामीण अर्थचक्राला ब्रेक लागले आहे.