शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल हरभरा खरेदीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:56 IST

तुरीपाठोपाठ नाफेडने हरभरा खरेदी बंद केल्यामुळे नोंदणी केलेले २१ हजार ६४६ शेतकरी वंचित राहिले असून त्यांचा सुमारे १ लाख १५ क्विंटल हरभरा खरेदी झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त झाल्यानंतर अखेर केंद्र सरकारने मंगळवारी १३ जूनपर्यंत हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली. मात्र गोदामांचा अभाव आणि बारदाण्याची टंचाई लक्षात घेता सहा दिवसात संपूर्ण हरभरा खरेदी होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे सरकारला पुन्हा मुदतवाढ द्यावी लागणार आहे.

ठळक मुद्देबुधवारी खरेदी लटकली; सहा दिवसानंतर मुदतवाढ द्यावी लागणार

बीड : तुरीपाठोपाठ नाफेडने हरभरा खरेदी बंद केल्यामुळे नोंदणी केलेले २१ हजार ६४६ शेतकरी वंचित राहिले असून त्यांचा सुमारे १ लाख १५ क्विंटल हरभरा खरेदी झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त झाल्यानंतर अखेर केंद्र सरकारने मंगळवारी १३ जूनपर्यंत हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली. मात्र गोदामांचा अभाव आणि बारदाण्याची टंचाई लक्षात घेता सहा दिवसात संपूर्ण हरभरा खरेदी होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे सरकारला पुन्हा मुदतवाढ द्यावी लागणार आहे.

जिल्ह्यातील १५ केंद्रांवर १ मार्चपासून हरभरा खरेदी सुरु झाली होती. ३२ हजार ४४६ शेतक-यांनी हमीदराने हरभरा विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती. २९ मे पर्यंत १० हजार ८०० शेतकºयांचा १ लाख ५५ हजार ५३९ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. हरभरा खरेदी बंद केल्यामुळे नोंदणी केलेले २१ हजार ६४६ शेतकरी वंचित राहिले आहेत. या शेतकºयांकडे जवळपास १ लाख १५ हजार क्विंटल हरभरा पडून आहे.

शेतक-यांनी केलेल्या नोंदणीनुसार गेवराई तालुक्यात १० हजार क्विंटल, माजलगाव तालुक्यात २० हजार, पाटोद्यात ३ हजार, कडा येथे ४ हजार, केजमध्ये ६ हजार, धारुरमध्ये ७ हजार ६००, शिरुरमध्ये ५ हजार, परळीत ७ हजार ६००, वडवणीत ८ हजार, आष्टीत १५००, पारनेरमध्ये २ हजार, बर्दापूर येथे १० हजार, घाटनांदूरमध्ये ५ हजार, म. पाटोदा येथे २ हजार तर अंबाजोगाईत २५ हजार क्विंटल असा १ लाख १५ हजार क्विंटल हरभरा अद्याप खरेदी झालेला नाही.निर्णयातच गेला वेळ : आजपासून खरेदीशासनाचा हरभºयाला प्रतीक्विंटल ४ हजार ४०० रुपये हमीभाव आहे. त्यामुळे शेतकºयांचाही प्रतिसाद मिळाला. परंतु, पुरेसे गोदाम, बारदाण्याचा अपुरा पुरवठा यामुळे खरेदी प्रक्रिया रखडत गेली. त्यात मुदतवाढीचा निर्णय घेताना ८ ते १० दिवसांचा वेळ वाया गेला. पुढील ६ दिवसात खरेदी करताना विविध अडचणींचा सामना स्थानिक यंत्रणेला करावा लागणार आहे.बुधवारी याबाबत रितसर आदेश प्राप्त झाले. परंतु, बारदाना नसल्याने तसेच यंत्रणा सुरळीत करण्याच्या कामामुळे जिल्ह्यात कुठेही खरेदी सुरु करता आली नाही. त्यात पावसाळा सुरु झाल्याने खरेदी प्रक्रिया विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गोदामात माल गेल्यावरच पेमेंटबीड जिल्ह्यात खरेदी केलेल्या १ लाख ५५ हजार क्विंटलपैकी केवळ २० हजार क्विंटल हरभरा गोदामात पाठविता आला. उर्वरित खरेदी केलेला १ लाख ३५ हजार क्विंटल हरभरा केंद्रांवर पडून आहे. तो रितसर गोदामात गेल्याशिवाय शेतक-यांच्या पेमेंटचा प्रश्न कायम राहणार आहे.

माजलगावात मोड फुटले माजलगाव  येथील बाजार समितीच्या आवारातील शासकीय खरेदी केंद्रावर मंगळवारी पहाटे झालेल्या पावसाने शेतकºयांचा मापाविना पडून असलेला २० हजार क्विंटल हरभरा भिजला होता. शासनाने मुदतवाढ दिल्याने जिल्हा मार्केटिंग विभागाने हरभरा खरेदी करण्याचे आदेश दिले असले तरी बारदानाच उपलब्ध नसल्याने खरेदी बंद असून भिजलेला हरभरा तसाच पडून आहे. शासनाच्या वतीने शेतमाल हमीभावाने खरेदी करण्यासाठी बाजार समिती मार्फत शासकीय खरेदीकेंद्र सुरु करण्यात आले आहे.

(माजलगावात पावसामुळे हरभऱ्याच्या घुग-या)

टॅग्स :BeedबीडRainपाऊसMarathwadaमराठवाडा