शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल हरभरा खरेदीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:56 IST

तुरीपाठोपाठ नाफेडने हरभरा खरेदी बंद केल्यामुळे नोंदणी केलेले २१ हजार ६४६ शेतकरी वंचित राहिले असून त्यांचा सुमारे १ लाख १५ क्विंटल हरभरा खरेदी झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त झाल्यानंतर अखेर केंद्र सरकारने मंगळवारी १३ जूनपर्यंत हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली. मात्र गोदामांचा अभाव आणि बारदाण्याची टंचाई लक्षात घेता सहा दिवसात संपूर्ण हरभरा खरेदी होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे सरकारला पुन्हा मुदतवाढ द्यावी लागणार आहे.

ठळक मुद्देबुधवारी खरेदी लटकली; सहा दिवसानंतर मुदतवाढ द्यावी लागणार

बीड : तुरीपाठोपाठ नाफेडने हरभरा खरेदी बंद केल्यामुळे नोंदणी केलेले २१ हजार ६४६ शेतकरी वंचित राहिले असून त्यांचा सुमारे १ लाख १५ क्विंटल हरभरा खरेदी झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त झाल्यानंतर अखेर केंद्र सरकारने मंगळवारी १३ जूनपर्यंत हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली. मात्र गोदामांचा अभाव आणि बारदाण्याची टंचाई लक्षात घेता सहा दिवसात संपूर्ण हरभरा खरेदी होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे सरकारला पुन्हा मुदतवाढ द्यावी लागणार आहे.

जिल्ह्यातील १५ केंद्रांवर १ मार्चपासून हरभरा खरेदी सुरु झाली होती. ३२ हजार ४४६ शेतक-यांनी हमीदराने हरभरा विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती. २९ मे पर्यंत १० हजार ८०० शेतकºयांचा १ लाख ५५ हजार ५३९ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. हरभरा खरेदी बंद केल्यामुळे नोंदणी केलेले २१ हजार ६४६ शेतकरी वंचित राहिले आहेत. या शेतकºयांकडे जवळपास १ लाख १५ हजार क्विंटल हरभरा पडून आहे.

शेतक-यांनी केलेल्या नोंदणीनुसार गेवराई तालुक्यात १० हजार क्विंटल, माजलगाव तालुक्यात २० हजार, पाटोद्यात ३ हजार, कडा येथे ४ हजार, केजमध्ये ६ हजार, धारुरमध्ये ७ हजार ६००, शिरुरमध्ये ५ हजार, परळीत ७ हजार ६००, वडवणीत ८ हजार, आष्टीत १५००, पारनेरमध्ये २ हजार, बर्दापूर येथे १० हजार, घाटनांदूरमध्ये ५ हजार, म. पाटोदा येथे २ हजार तर अंबाजोगाईत २५ हजार क्विंटल असा १ लाख १५ हजार क्विंटल हरभरा अद्याप खरेदी झालेला नाही.निर्णयातच गेला वेळ : आजपासून खरेदीशासनाचा हरभºयाला प्रतीक्विंटल ४ हजार ४०० रुपये हमीभाव आहे. त्यामुळे शेतकºयांचाही प्रतिसाद मिळाला. परंतु, पुरेसे गोदाम, बारदाण्याचा अपुरा पुरवठा यामुळे खरेदी प्रक्रिया रखडत गेली. त्यात मुदतवाढीचा निर्णय घेताना ८ ते १० दिवसांचा वेळ वाया गेला. पुढील ६ दिवसात खरेदी करताना विविध अडचणींचा सामना स्थानिक यंत्रणेला करावा लागणार आहे.बुधवारी याबाबत रितसर आदेश प्राप्त झाले. परंतु, बारदाना नसल्याने तसेच यंत्रणा सुरळीत करण्याच्या कामामुळे जिल्ह्यात कुठेही खरेदी सुरु करता आली नाही. त्यात पावसाळा सुरु झाल्याने खरेदी प्रक्रिया विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गोदामात माल गेल्यावरच पेमेंटबीड जिल्ह्यात खरेदी केलेल्या १ लाख ५५ हजार क्विंटलपैकी केवळ २० हजार क्विंटल हरभरा गोदामात पाठविता आला. उर्वरित खरेदी केलेला १ लाख ३५ हजार क्विंटल हरभरा केंद्रांवर पडून आहे. तो रितसर गोदामात गेल्याशिवाय शेतक-यांच्या पेमेंटचा प्रश्न कायम राहणार आहे.

माजलगावात मोड फुटले माजलगाव  येथील बाजार समितीच्या आवारातील शासकीय खरेदी केंद्रावर मंगळवारी पहाटे झालेल्या पावसाने शेतकºयांचा मापाविना पडून असलेला २० हजार क्विंटल हरभरा भिजला होता. शासनाने मुदतवाढ दिल्याने जिल्हा मार्केटिंग विभागाने हरभरा खरेदी करण्याचे आदेश दिले असले तरी बारदानाच उपलब्ध नसल्याने खरेदी बंद असून भिजलेला हरभरा तसाच पडून आहे. शासनाच्या वतीने शेतमाल हमीभावाने खरेदी करण्यासाठी बाजार समिती मार्फत शासकीय खरेदीकेंद्र सुरु करण्यात आले आहे.

(माजलगावात पावसामुळे हरभऱ्याच्या घुग-या)

टॅग्स :BeedबीडRainपाऊसMarathwadaमराठवाडा