शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढविण्यासाठी राज्य सरकारला केंद्राची साथ: शिवराज सिंह चौहान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 20:04 IST

राहुल गांधी व शरद पवार यांनी फक्त बोलण्याचे काम केले, जनतेला काही दिले नाही; शिवराज सिंह चौहान यांची टीका

- संजय खाकरेपरळी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढविण्यासाठी महायुतीच्या राज्यातील सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार मदत करेल, अशी घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी येथील कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आज बुधवारी केली.  कापूस सोयाबीन, कांदा आणि उसाला योग्य भाव देण्यासाठी भारत सरकार कटीबद्ध राहील अशी ग्वाही देखील केंद्रीय कृषीमंत्री चौहान यांनी यावेळी दिली. 

यावेळी महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांचे केंद्रीय मंत्री चौहान यांनी कौतुक केले. तसेच राहुल गांधी व शरद पवार यांनी फक्त बोलण्याचे काम केले, जनतेला काही दिले नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आवाज दिला आणि मी या कार्यक्रमाला आलो असा उल्लेख केंद्रीय कृषीमंत्र्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून महिलाना आर्थिक सशक्त करण्याबरोबरच त्यांना सन्मान केला असल्याचेही ते म्हणाले. 

परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हफ्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे वआ.पंकजाताई मुंडे ,पाशा पटेल  इतर मान्यवरांच्या हस्ते रिमोटने वितरित करण्यात आला. तसेच राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या पोर्टलचेही अनावरण करण्यात आले . 

२१ ऑगस्ट रोजी परळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपामध्ये या कृषी महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कृषी प्रदर्शनाच्या भव्य सभामंडपास शेतकरी नेते स्व.पंडित अण्णा मुंडे यांचे नाव देण्यात आले आहे. उद्घाटन समारंभाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य रॅली द्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून पाच दिवसीय भव्य असे कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन, धान्य महोत्सवच, र्चासत्रे व संवाद, विविध आधुनिक अवजारांची प्रात्यक्षिके, रानभाज्या महोत्सव, यशस्वी शेतकऱ्यांचा सन्मान व त्यांच्या यशोगाथा, त्याचबरोबर महिला बचत गटांनी बनवलेल्या विविध उत्पादनांची विक्री, शेतीतील वेगवेगळ्या उत्पादनांची उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके, यांसह शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या असंख्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानEknath Shindeएकनाथ शिंदेBeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी