शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

गुरांना उपचार मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:26 IST

दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा सर्रास वापर बीड : शहरातील मुख्य बाजारपेठेसह भाजीमंडईत सर्रासपणे दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात असल्याचे ...

दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा सर्रास वापर

बीड : शहरातील मुख्य बाजारपेठेसह भाजीमंडईत सर्रासपणे दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात असल्याचे दिसत आहे. मात्र, बीड नगरपालिकेचे पथक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. लॉकडाऊन लागल्यापासून शहरात एकही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. सर्रासपणे दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात आहे.

डासांचे प्रमाण वाढले

माजलगाव : शहरात डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील अनेक भागांत स्वच्छता होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक दुकानदारास डासांच्या प्रादुर्भावाचा त्रास होत आहे. परिसरात डास प्रतिबंधक फवारणीची मागणी अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

बँकेत ग्राहकांची गर्दी

परळी : येथील एसबीआय बँकेच्या शाखेत ग्राहकांची गर्दी वाढली असून, कोरोना पार्श्वभूमीवर कसलीही काळजी घेतली जात नसल्याची तक्रार मनसेचे परळी तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी मंगळवारी केली आहे. याबाबत बँक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

रुग्णालयात गर्दी

अंबाजोगाई : हवामानातील बदलाने अंबाजोगाई शहर व परिसरात विषाणूजन्य आजाराची साथ पसरत आहे. या साथीमुळे लहान बालके, ज्येष्ठ नागरिकांना या साथीचा मोठा त्रास होत आहे. रुग्णालयात उपचारासाठी गर्दी वाढू लागली आहे.

उत्कृष्ट खेळाबद्दल सत्कार

बीड : ९ ते २५ जानेवारीदरम्यान चिली देशातील सँटियागो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनिअर गट महिला हॉकी स्पर्धेत महाराष्ट्रातील अक्षता ढेकळे , वैष्णवी पालखे, ऋतुजा पिसाळ यांनी चांगली कामगिरी केली. त्याबद्दल त्यांचा बीडचे जिल्हा क्रीडाधिकारी अरविंद विद्यागर, बीड जिल्हा हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. दिनकर थोरात यांनी सत्कार केला.

स्वच्छतागृहाची दुरवस्था

नेकनूर : येथील बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असून, यामुळे स्वच्छता करण्याची मागणी वेळोवेळी होत आहे. मात्र, आगाराचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

वन्यप्राण्यांचा त्रास

अंबाजोगाई : यावर्षीचा रबी हंगाम जोरदार सुरू आहे. परतीचा मोठा झालेला पाऊस यामुळे गहू, ज्वारी, हरभरा, करडई यांचा पेरा तर उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. उगवण चांगली झाल्याने या पिकांचा हरिण व रानडुकरे फडशा पाडत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.