शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
4
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
5
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
7
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
8
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
9
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
10
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
11
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
12
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
13
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
14
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
15
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
16
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
17
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
18
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
19
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
20
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?

गुरांना उपचार मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:26 IST

दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा सर्रास वापर बीड : शहरातील मुख्य बाजारपेठेसह भाजीमंडईत सर्रासपणे दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात असल्याचे ...

दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा सर्रास वापर

बीड : शहरातील मुख्य बाजारपेठेसह भाजीमंडईत सर्रासपणे दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात असल्याचे दिसत आहे. मात्र, बीड नगरपालिकेचे पथक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. लॉकडाऊन लागल्यापासून शहरात एकही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. सर्रासपणे दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात आहे.

डासांचे प्रमाण वाढले

माजलगाव : शहरात डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील अनेक भागांत स्वच्छता होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक दुकानदारास डासांच्या प्रादुर्भावाचा त्रास होत आहे. परिसरात डास प्रतिबंधक फवारणीची मागणी अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

बँकेत ग्राहकांची गर्दी

परळी : येथील एसबीआय बँकेच्या शाखेत ग्राहकांची गर्दी वाढली असून, कोरोना पार्श्वभूमीवर कसलीही काळजी घेतली जात नसल्याची तक्रार मनसेचे परळी तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी मंगळवारी केली आहे. याबाबत बँक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

रुग्णालयात गर्दी

अंबाजोगाई : हवामानातील बदलाने अंबाजोगाई शहर व परिसरात विषाणूजन्य आजाराची साथ पसरत आहे. या साथीमुळे लहान बालके, ज्येष्ठ नागरिकांना या साथीचा मोठा त्रास होत आहे. रुग्णालयात उपचारासाठी गर्दी वाढू लागली आहे.

उत्कृष्ट खेळाबद्दल सत्कार

बीड : ९ ते २५ जानेवारीदरम्यान चिली देशातील सँटियागो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनिअर गट महिला हॉकी स्पर्धेत महाराष्ट्रातील अक्षता ढेकळे , वैष्णवी पालखे, ऋतुजा पिसाळ यांनी चांगली कामगिरी केली. त्याबद्दल त्यांचा बीडचे जिल्हा क्रीडाधिकारी अरविंद विद्यागर, बीड जिल्हा हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. दिनकर थोरात यांनी सत्कार केला.

स्वच्छतागृहाची दुरवस्था

नेकनूर : येथील बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असून, यामुळे स्वच्छता करण्याची मागणी वेळोवेळी होत आहे. मात्र, आगाराचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

वन्यप्राण्यांचा त्रास

अंबाजोगाई : यावर्षीचा रबी हंगाम जोरदार सुरू आहे. परतीचा मोठा झालेला पाऊस यामुळे गहू, ज्वारी, हरभरा, करडई यांचा पेरा तर उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. उगवण चांगली झाल्याने या पिकांचा हरिण व रानडुकरे फडशा पाडत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.