शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

गुरांना उपचार मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:26 IST

दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा सर्रास वापर बीड : शहरातील मुख्य बाजारपेठेसह भाजीमंडईत सर्रासपणे दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात असल्याचे ...

दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा सर्रास वापर

बीड : शहरातील मुख्य बाजारपेठेसह भाजीमंडईत सर्रासपणे दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात असल्याचे दिसत आहे. मात्र, बीड नगरपालिकेचे पथक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. लॉकडाऊन लागल्यापासून शहरात एकही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. सर्रासपणे दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात आहे.

डासांचे प्रमाण वाढले

माजलगाव : शहरात डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील अनेक भागांत स्वच्छता होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक दुकानदारास डासांच्या प्रादुर्भावाचा त्रास होत आहे. परिसरात डास प्रतिबंधक फवारणीची मागणी अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

बँकेत ग्राहकांची गर्दी

परळी : येथील एसबीआय बँकेच्या शाखेत ग्राहकांची गर्दी वाढली असून, कोरोना पार्श्वभूमीवर कसलीही काळजी घेतली जात नसल्याची तक्रार मनसेचे परळी तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी मंगळवारी केली आहे. याबाबत बँक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

रुग्णालयात गर्दी

अंबाजोगाई : हवामानातील बदलाने अंबाजोगाई शहर व परिसरात विषाणूजन्य आजाराची साथ पसरत आहे. या साथीमुळे लहान बालके, ज्येष्ठ नागरिकांना या साथीचा मोठा त्रास होत आहे. रुग्णालयात उपचारासाठी गर्दी वाढू लागली आहे.

उत्कृष्ट खेळाबद्दल सत्कार

बीड : ९ ते २५ जानेवारीदरम्यान चिली देशातील सँटियागो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनिअर गट महिला हॉकी स्पर्धेत महाराष्ट्रातील अक्षता ढेकळे , वैष्णवी पालखे, ऋतुजा पिसाळ यांनी चांगली कामगिरी केली. त्याबद्दल त्यांचा बीडचे जिल्हा क्रीडाधिकारी अरविंद विद्यागर, बीड जिल्हा हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. दिनकर थोरात यांनी सत्कार केला.

स्वच्छतागृहाची दुरवस्था

नेकनूर : येथील बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असून, यामुळे स्वच्छता करण्याची मागणी वेळोवेळी होत आहे. मात्र, आगाराचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

वन्यप्राण्यांचा त्रास

अंबाजोगाई : यावर्षीचा रबी हंगाम जोरदार सुरू आहे. परतीचा मोठा झालेला पाऊस यामुळे गहू, ज्वारी, हरभरा, करडई यांचा पेरा तर उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. उगवण चांगली झाल्याने या पिकांचा हरिण व रानडुकरे फडशा पाडत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.