शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

बीडमध्ये लोकसभाप्रमाणेच विधानसभातही जातीय राजकारण; मराठा-ओबीसी यांच्यात धुसफूस

By सोमनाथ खताळ | Updated: November 18, 2024 12:05 IST

प्रत्येकच उमेदवारांनी मतविभाजनाचा धसका घेतल्याचे दिसत आहे.

बीड : लोकसभा २०२४ च्या निवडणूकीत जिल्ह्यात जातीय राजकारण झाले. आता विधानसभा निवडणूकीतही पुन्हा तीच परिस्थिती पहायला मिळत आहे. उमेदवारांसह कार्यकर्ते हे मराठा-ओबीसी अशी गणीते जुळवून मतांचे राजकारण करत आहेत. सोशल मिडीयावरूनही सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून वातावरण तापू लागले आहे. लोकसभेत मतदान प्रक्रियेनंतर मराठा-वंजारा असे वाद झाले होते. आता विधानसभानंतर याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याचे आव्हान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसमोर असणार आहे.

जिल्ह्यात परळी, आष्टी, केज, माजलगाव, आष्टी आणि बीड असे सहा मतदार संघातून १३९ उमेदवार विधानसभा निवडणूक मैदानात आहेत. यामध्ये ८१ अपक्ष उमेदवार आहेत. लोकसभेला मराठा-ओबीसी अशी थेट लढत झाली होती. परंतू विधानसभेतील चित्र वेगळे आहे. प्रत्येक मतदार संघात, मराठा उमेदवार मैदानात आहेत. गेवराई मतदार संघात बदामराव पंडित, विजयसिंह पंडित, लक्ष्मण पवार हे प्रमुख उमेदवार मराठा आहेत. येथे प्रियंक खेडकर आणि मयुरी खेडकर ओबीसी म्हणून मैदानात आहेत. माजलगावात प्रकाश सोळंके, मोहन जगताप, रमेश आडसकर हे प्रमुख उमेदवार मराठा आहेत. माधव निर्मळ आणि बाबरी मुंडे हे ओबीसी म्हणून मैदानात आहेत. बीडमध्येही संदीप क्षीरसागर आणि डॉ.योगेश क्षीरसागर हे ओबीसी उमेदवार असून अनिल जगताप, कुंडलिक खांडे, डॉ.ज्योती मेटे हे मराठा उमेदवार मैदानात आहेत. आष्टीत सुरेश धस, बाळासाहेब आजबे हे मराठा असून भिमराव धोंडे ओबीसी तर महेबुब शेख अल्पसंख्यांक आहेत. परळीत धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख यांच्यात लढत होत असून येथे थेट मराठा-ओबीसी लढत आहे. केज मतदार संघ राखीव आहे.

मतविभाजनाचा घेतला धसकाप्रत्येक मतदार संघात मराठा-ओबीसी उमेदवार आहेत. त्यांच्याकडून मराठा उमेदवारांकडून मराठा तर ओबीसींकडून ओबीसी मतांची गणीते जुळविली जात आहेत. प्रत्येकच उमेदवारांनी मतविभाजनाचा धसका घेतल्याचे दिसत आहे.

सभा, बैठकांमध्ये काढली जातेय जातसध्या उमेदवारांकडून माेठ्या नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. यामध्ये प्रत्येकजण आम्ही सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन जात असल्याचे सांगत आहे. याच जातीच्या मुद्यावरून अनेक भाषणे गाजली आहेत. मोठ्या सभा सोडाच, पण साधी बैठक, गाठभेट दौऱ्यातही जातीचा विषय निघत आहे.

सोशल मिडीयावर वातावरण गरमलोकसभा मतदानानंतर सोशल मिडीयावर पोस्ट टाकल्यानेच केज तालुक्यातील नांदुरघाट येथे मराठा-वंजारा असा वाद झाला होता. याचे पडसाद राज्यभर उमटले होते. आता विधानसभातही सध्या तशीच परिस्थिती पहायला मिळत आहे. सोशल मिडीयावर मराठा-ओबीसी कार्यकर्त्यांकडून वादग्रस्त पोस्ट टाकल्या जात आहेत. यामुळे पुन्हा जिल्ह्यातील सलोख्याचे वातावरण बिघडू शकते. पोलिसांकडून नजर असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात कारवाया केल्या जात नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकbeed-acबीडmajalgaon-acमाजलगांवgeorai-acगेवराईashti-acआष्टीkaij-acकेज