शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

बीडमध्ये लोकसभाप्रमाणेच विधानसभातही जातीय राजकारण; मराठा-ओबीसी यांच्यात धुसफूस

By सोमनाथ खताळ | Updated: November 18, 2024 12:05 IST

प्रत्येकच उमेदवारांनी मतविभाजनाचा धसका घेतल्याचे दिसत आहे.

बीड : लोकसभा २०२४ च्या निवडणूकीत जिल्ह्यात जातीय राजकारण झाले. आता विधानसभा निवडणूकीतही पुन्हा तीच परिस्थिती पहायला मिळत आहे. उमेदवारांसह कार्यकर्ते हे मराठा-ओबीसी अशी गणीते जुळवून मतांचे राजकारण करत आहेत. सोशल मिडीयावरूनही सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून वातावरण तापू लागले आहे. लोकसभेत मतदान प्रक्रियेनंतर मराठा-वंजारा असे वाद झाले होते. आता विधानसभानंतर याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याचे आव्हान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसमोर असणार आहे.

जिल्ह्यात परळी, आष्टी, केज, माजलगाव, आष्टी आणि बीड असे सहा मतदार संघातून १३९ उमेदवार विधानसभा निवडणूक मैदानात आहेत. यामध्ये ८१ अपक्ष उमेदवार आहेत. लोकसभेला मराठा-ओबीसी अशी थेट लढत झाली होती. परंतू विधानसभेतील चित्र वेगळे आहे. प्रत्येक मतदार संघात, मराठा उमेदवार मैदानात आहेत. गेवराई मतदार संघात बदामराव पंडित, विजयसिंह पंडित, लक्ष्मण पवार हे प्रमुख उमेदवार मराठा आहेत. येथे प्रियंक खेडकर आणि मयुरी खेडकर ओबीसी म्हणून मैदानात आहेत. माजलगावात प्रकाश सोळंके, मोहन जगताप, रमेश आडसकर हे प्रमुख उमेदवार मराठा आहेत. माधव निर्मळ आणि बाबरी मुंडे हे ओबीसी म्हणून मैदानात आहेत. बीडमध्येही संदीप क्षीरसागर आणि डॉ.योगेश क्षीरसागर हे ओबीसी उमेदवार असून अनिल जगताप, कुंडलिक खांडे, डॉ.ज्योती मेटे हे मराठा उमेदवार मैदानात आहेत. आष्टीत सुरेश धस, बाळासाहेब आजबे हे मराठा असून भिमराव धोंडे ओबीसी तर महेबुब शेख अल्पसंख्यांक आहेत. परळीत धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख यांच्यात लढत होत असून येथे थेट मराठा-ओबीसी लढत आहे. केज मतदार संघ राखीव आहे.

मतविभाजनाचा घेतला धसकाप्रत्येक मतदार संघात मराठा-ओबीसी उमेदवार आहेत. त्यांच्याकडून मराठा उमेदवारांकडून मराठा तर ओबीसींकडून ओबीसी मतांची गणीते जुळविली जात आहेत. प्रत्येकच उमेदवारांनी मतविभाजनाचा धसका घेतल्याचे दिसत आहे.

सभा, बैठकांमध्ये काढली जातेय जातसध्या उमेदवारांकडून माेठ्या नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. यामध्ये प्रत्येकजण आम्ही सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन जात असल्याचे सांगत आहे. याच जातीच्या मुद्यावरून अनेक भाषणे गाजली आहेत. मोठ्या सभा सोडाच, पण साधी बैठक, गाठभेट दौऱ्यातही जातीचा विषय निघत आहे.

सोशल मिडीयावर वातावरण गरमलोकसभा मतदानानंतर सोशल मिडीयावर पोस्ट टाकल्यानेच केज तालुक्यातील नांदुरघाट येथे मराठा-वंजारा असा वाद झाला होता. याचे पडसाद राज्यभर उमटले होते. आता विधानसभातही सध्या तशीच परिस्थिती पहायला मिळत आहे. सोशल मिडीयावर मराठा-ओबीसी कार्यकर्त्यांकडून वादग्रस्त पोस्ट टाकल्या जात आहेत. यामुळे पुन्हा जिल्ह्यातील सलोख्याचे वातावरण बिघडू शकते. पोलिसांकडून नजर असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात कारवाया केल्या जात नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकbeed-acबीडmajalgaon-acमाजलगांवgeorai-acगेवराईashti-acआष्टीkaij-acकेज