शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

बस पेटली, पळा...पळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 00:00 IST

नांदेड येथून पुण्याच्या दिशेने निघालेली खाजगी प्रवासी बस जळून खाक झाल्याची घटना घडली. यावेळी चालकाने राखलेले प्रसंगावधान आणि क्लिनरने केलेली धडपड यामुळे बसमधील सर्व ३४ प्रवासी सुखरुप बचावले.

ठळक मुद्देचालक, क्लिनरचे प्रसंगावधान : चढ-उतारावर वारंवार ब्रेकमुळे लायनर होते गरम

नितीन कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्ककडा : नांदेड येथून पुण्याच्या दिशेने निघालेली खाजगी प्रवासी बस जळून खाक झाल्याची घटना घडली. यावेळी चालकाने राखलेले प्रसंगावधान आणि क्लिनरने केलेली धडपड यामुळे बसमधील सर्व ३४ प्रवासी सुखरुप बचावले. बस पेटली पळा... पळा... ओरडत प्रवासी बसबाहेर सुखरुप पडले. तर वारंवार ब्रेक मारावे लागल्याने लायनर गरम होऊन बसने पेट घेतल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. महिनाभरात अशा प्रकारचा तालुक्यातील हा दुसरा अपघात आहे.नांदेड येथील शर्मा ट्रॅव्हल्सची बस गुरु वारी रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी ३४ प्रवासी घेऊन निघाली होती. रात्री अकरा वाजता परळी येथे चहा नाष्टा करून पुढे डोंगरिकन्ही येथे काही वेळ थांबुन परत चहा पाणी करून ही बस पुण्याकडे निघाली. आष्टी तालुक्यातील बीड धामणगाव नगर रोडवरील सांगवी पाटण येथे शुक्र वारी पहाटे दोनच्या सुमारास बसने अचानक पेट घेतल्याचे लक्षात आले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. अशा परिस्थितीत चालकाने प्रसंगवधान राखले, त्यामुळे सर्व प्रवाशी सुखरूप बाहेर पडले.ही घटना घडताच जवळच गव्हाच्या शेताला पाणी देणारे समीर शेख यांनी तिकडे धाव घेत मित्रांना फोन करून कळविले. आग विझवण्यासाठी धनंजय भोसले, माऊली खिलारे , राजु भोसले, उध्दव खिलारे , सद्दाम शेख व परिसरातील लोकांनी प्रयत्न केले. या दुर्घटनेत प्रवाशांचे सोने, भ्रमणध्वनी, पिशव्या, सुटकेस असे तीन लाखाच्या घरात नुकसान झाले आहे. सोने मोबाईल, बॅग मधील साहित्य असे एकुण तीन लाखांच्या घरात नुकसान झाल्याचे बोलले जात होते.याच रस्त्यावर महिन्यात दुसरी घटनावीस दिवसा पुर्वी बीड धामणगाव- नगर रोडवर कापशी येथे नगर येथून चिंचपूरकडे जाणारा एका ट्रक अचानक आग लागून जळून खाक झाला होता. याच रोडवर शुक्रवारी पहाटे ही दुसरी घटना घडली. दोन्ही घटनेत जिवीत हानी घडली नसून वाहने मात्र पुर्णपणे जळाली आहेत. चढ उताराचा हा रस्ता असल्याने कमी जास्त प्रमाणात ब्रेक मारावे लागते. सारखे सारखे ब्रेक दाबावे लागत असल्याने लायनरवर दाब येतो. आणि याच दाबामुळे ते गरम झाल्याने अचानक आग लागून पेट घेऊन गाडी पुर्णपणे जळाली.गॅस संपल्याने आग आटोक्यात आणता आली नाहीलक्झरी बसमध्ये आगीच्या घटना घडल्या तर अग्निशमन यंत्राची व्यवस्था असते. पण चालक याची खात्री करत नाहीत.एवढ्या मोठ्या प्रमाणावर आग लागल्यानंतर ती विझवायला यंत्र हातात घेताच रिकामे असल्याने ती आग आटोक्यात येऊ शकली नाही.पाणी टाकूनही गाडी पुर्णपणे जळाली असल्याचे चालक अशोक बोराडे यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडBus Driverबसचालकfireआग