शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

बस पेटली, पळा...पळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 00:00 IST

नांदेड येथून पुण्याच्या दिशेने निघालेली खाजगी प्रवासी बस जळून खाक झाल्याची घटना घडली. यावेळी चालकाने राखलेले प्रसंगावधान आणि क्लिनरने केलेली धडपड यामुळे बसमधील सर्व ३४ प्रवासी सुखरुप बचावले.

ठळक मुद्देचालक, क्लिनरचे प्रसंगावधान : चढ-उतारावर वारंवार ब्रेकमुळे लायनर होते गरम

नितीन कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्ककडा : नांदेड येथून पुण्याच्या दिशेने निघालेली खाजगी प्रवासी बस जळून खाक झाल्याची घटना घडली. यावेळी चालकाने राखलेले प्रसंगावधान आणि क्लिनरने केलेली धडपड यामुळे बसमधील सर्व ३४ प्रवासी सुखरुप बचावले. बस पेटली पळा... पळा... ओरडत प्रवासी बसबाहेर सुखरुप पडले. तर वारंवार ब्रेक मारावे लागल्याने लायनर गरम होऊन बसने पेट घेतल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. महिनाभरात अशा प्रकारचा तालुक्यातील हा दुसरा अपघात आहे.नांदेड येथील शर्मा ट्रॅव्हल्सची बस गुरु वारी रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी ३४ प्रवासी घेऊन निघाली होती. रात्री अकरा वाजता परळी येथे चहा नाष्टा करून पुढे डोंगरिकन्ही येथे काही वेळ थांबुन परत चहा पाणी करून ही बस पुण्याकडे निघाली. आष्टी तालुक्यातील बीड धामणगाव नगर रोडवरील सांगवी पाटण येथे शुक्र वारी पहाटे दोनच्या सुमारास बसने अचानक पेट घेतल्याचे लक्षात आले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. अशा परिस्थितीत चालकाने प्रसंगवधान राखले, त्यामुळे सर्व प्रवाशी सुखरूप बाहेर पडले.ही घटना घडताच जवळच गव्हाच्या शेताला पाणी देणारे समीर शेख यांनी तिकडे धाव घेत मित्रांना फोन करून कळविले. आग विझवण्यासाठी धनंजय भोसले, माऊली खिलारे , राजु भोसले, उध्दव खिलारे , सद्दाम शेख व परिसरातील लोकांनी प्रयत्न केले. या दुर्घटनेत प्रवाशांचे सोने, भ्रमणध्वनी, पिशव्या, सुटकेस असे तीन लाखाच्या घरात नुकसान झाले आहे. सोने मोबाईल, बॅग मधील साहित्य असे एकुण तीन लाखांच्या घरात नुकसान झाल्याचे बोलले जात होते.याच रस्त्यावर महिन्यात दुसरी घटनावीस दिवसा पुर्वी बीड धामणगाव- नगर रोडवर कापशी येथे नगर येथून चिंचपूरकडे जाणारा एका ट्रक अचानक आग लागून जळून खाक झाला होता. याच रोडवर शुक्रवारी पहाटे ही दुसरी घटना घडली. दोन्ही घटनेत जिवीत हानी घडली नसून वाहने मात्र पुर्णपणे जळाली आहेत. चढ उताराचा हा रस्ता असल्याने कमी जास्त प्रमाणात ब्रेक मारावे लागते. सारखे सारखे ब्रेक दाबावे लागत असल्याने लायनरवर दाब येतो. आणि याच दाबामुळे ते गरम झाल्याने अचानक आग लागून पेट घेऊन गाडी पुर्णपणे जळाली.गॅस संपल्याने आग आटोक्यात आणता आली नाहीलक्झरी बसमध्ये आगीच्या घटना घडल्या तर अग्निशमन यंत्राची व्यवस्था असते. पण चालक याची खात्री करत नाहीत.एवढ्या मोठ्या प्रमाणावर आग लागल्यानंतर ती विझवायला यंत्र हातात घेताच रिकामे असल्याने ती आग आटोक्यात येऊ शकली नाही.पाणी टाकूनही गाडी पुर्णपणे जळाली असल्याचे चालक अशोक बोराडे यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडBus Driverबसचालकfireआग