शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

बस पेटली, पळा...पळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 00:00 IST

नांदेड येथून पुण्याच्या दिशेने निघालेली खाजगी प्रवासी बस जळून खाक झाल्याची घटना घडली. यावेळी चालकाने राखलेले प्रसंगावधान आणि क्लिनरने केलेली धडपड यामुळे बसमधील सर्व ३४ प्रवासी सुखरुप बचावले.

ठळक मुद्देचालक, क्लिनरचे प्रसंगावधान : चढ-उतारावर वारंवार ब्रेकमुळे लायनर होते गरम

नितीन कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्ककडा : नांदेड येथून पुण्याच्या दिशेने निघालेली खाजगी प्रवासी बस जळून खाक झाल्याची घटना घडली. यावेळी चालकाने राखलेले प्रसंगावधान आणि क्लिनरने केलेली धडपड यामुळे बसमधील सर्व ३४ प्रवासी सुखरुप बचावले. बस पेटली पळा... पळा... ओरडत प्रवासी बसबाहेर सुखरुप पडले. तर वारंवार ब्रेक मारावे लागल्याने लायनर गरम होऊन बसने पेट घेतल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. महिनाभरात अशा प्रकारचा तालुक्यातील हा दुसरा अपघात आहे.नांदेड येथील शर्मा ट्रॅव्हल्सची बस गुरु वारी रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी ३४ प्रवासी घेऊन निघाली होती. रात्री अकरा वाजता परळी येथे चहा नाष्टा करून पुढे डोंगरिकन्ही येथे काही वेळ थांबुन परत चहा पाणी करून ही बस पुण्याकडे निघाली. आष्टी तालुक्यातील बीड धामणगाव नगर रोडवरील सांगवी पाटण येथे शुक्र वारी पहाटे दोनच्या सुमारास बसने अचानक पेट घेतल्याचे लक्षात आले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. अशा परिस्थितीत चालकाने प्रसंगवधान राखले, त्यामुळे सर्व प्रवाशी सुखरूप बाहेर पडले.ही घटना घडताच जवळच गव्हाच्या शेताला पाणी देणारे समीर शेख यांनी तिकडे धाव घेत मित्रांना फोन करून कळविले. आग विझवण्यासाठी धनंजय भोसले, माऊली खिलारे , राजु भोसले, उध्दव खिलारे , सद्दाम शेख व परिसरातील लोकांनी प्रयत्न केले. या दुर्घटनेत प्रवाशांचे सोने, भ्रमणध्वनी, पिशव्या, सुटकेस असे तीन लाखाच्या घरात नुकसान झाले आहे. सोने मोबाईल, बॅग मधील साहित्य असे एकुण तीन लाखांच्या घरात नुकसान झाल्याचे बोलले जात होते.याच रस्त्यावर महिन्यात दुसरी घटनावीस दिवसा पुर्वी बीड धामणगाव- नगर रोडवर कापशी येथे नगर येथून चिंचपूरकडे जाणारा एका ट्रक अचानक आग लागून जळून खाक झाला होता. याच रोडवर शुक्रवारी पहाटे ही दुसरी घटना घडली. दोन्ही घटनेत जिवीत हानी घडली नसून वाहने मात्र पुर्णपणे जळाली आहेत. चढ उताराचा हा रस्ता असल्याने कमी जास्त प्रमाणात ब्रेक मारावे लागते. सारखे सारखे ब्रेक दाबावे लागत असल्याने लायनरवर दाब येतो. आणि याच दाबामुळे ते गरम झाल्याने अचानक आग लागून पेट घेऊन गाडी पुर्णपणे जळाली.गॅस संपल्याने आग आटोक्यात आणता आली नाहीलक्झरी बसमध्ये आगीच्या घटना घडल्या तर अग्निशमन यंत्राची व्यवस्था असते. पण चालक याची खात्री करत नाहीत.एवढ्या मोठ्या प्रमाणावर आग लागल्यानंतर ती विझवायला यंत्र हातात घेताच रिकामे असल्याने ती आग आटोक्यात येऊ शकली नाही.पाणी टाकूनही गाडी पुर्णपणे जळाली असल्याचे चालक अशोक बोराडे यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडBus Driverबसचालकfireआग