शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

बीडमध्ये भाऊ ठरला बहिणीला भारी; धनंजय यांचा पंकजांना दुसरा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 05:01 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या ताब्यातील बीड जिल्हा परिषद घेऊन धनंजय मुंडे यांनी आपली बहीण पंकजा मुंडे यांना दीड महिन्यात परळी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर हा दुसरा धक्का दिला.

सतीश जोशीबीड : राज्यातील सत्ता परिवर्तनाचा फटका बीड जिल्ह्यातील राजकारणास बसला. महाआघाडीच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या ताब्यातील बीड जिल्हा परिषद घेऊन धनंजय मुंडे यांनी आपली बहीण पंकजा मुंडे यांना दीड महिन्यात परळी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर हा दुसरा धक्का दिला.जि.प.च्या पहिल्या टर्ममध्ये जशी मोडतोड करून पंकजा मुंडे यांनी भाजपला सत्तेत आणले होते, अगदी त्याच स्टाईलने यावेळेस भाजपला सुरुंग लावून तीन सदस्य फोडत धनंजय मुंडे यांनी जशास तसे उत्तर दिले. काँग्रेसचा एक सदस्य भाजपने फोडला परंतु, महाआघाडीस त्याचा काही फरक पडला नाही. मागील दोन वर्षांत जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अपयश आल्यानंतर धनंजय मुंडे बॅकफूटवर गेले होते. २०१९ ची परळी विधानसभा निवडणूक अस्तित्वाची समजून लढले आणि पंकजा मुंडेंचा पराभव करीत २०१४ च्या पराभवाची परतफेड केली.राज्यातील सत्ता बदलात धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री झाले. अवघ्या दीड महिन्यांतच त्यांनी बीड जिल्हा परिषद ताब्यात घेऊन बहिणीला दुसरा धक्का दिला. ६० सदस्यांच्या सभागृहात पाच सदस्य अपात्र, तर बाळासाहेब आजबे आणि संदीप क्षीरसागर आमदार झाल्यामुळे त्यांच्या दोन जागा रिक्त झाल्या. त्यामुळे ५३ सदस्यांच्या या सभागृहात बहुमतासाठी २७ सदस्यांची आवश्यकता होती. राज्याप्रमाणेच या जिल्हा परिषदेतही महाआघाडीचा पॅटर्न राबवत शिवसेनेला सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांना सर्वाधिक मते मिळवली. पहिल्या टर्ममध्ये राज्यात भाजपची सत्ता होती. तेव्हा ग्रामविकासमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी तोडफोड करीत अशक्य असलेली जि.प.ची सत्ता हस्तगत केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य भाजपने फोडले होते. त्यापैकी पाच सदस्यांना अपात्र घोषित करीत मतदानापासून वंचित ठेवले आहे. पंकजा मुंडे यांचा हा पॅटर्न धनंजय मुंडे यांनी राबविला. भाजपचे तीन सदस्य फोडून मागचे उट्टे काढले.>भाजपच्या यंत्रणेत समन्वयाचा अभावमागच्या वेळी भाजपसोबत असलेल्या शिवसेनेच्या ४ आणि काँग्रेसच्या एका सदस्याला सोबत घेऊन भाजपला धोबीपछाड दिली. परळी विधानसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे अजूनही सावरलेल्या नाहीत. मध्यंतरी गोपीनाथगडावर घेतलेल्या समर्थकांच्या मेळाव्यातच त्यांनी आपण जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय राहणार नसून ही जबाबदारी यापुढे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यावर सोपवित आहे, असे सांगून त्या जिल्ह्यातील राजकारणापासून अलिप्त राहिल्या होत्या.मागच्या वेळी त्यांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी जोराचा प्रयत्न केला होता. तसे प्रयत्न यावेळी दोघीही बहिणींकडून झाल्याचे दिसले नाहीत. पंकजा मुंडे तर परदेशात होत्या. त्यामुळे भाजपच्या यंत्रणेत समन्वयाचा अभाव जाणवला. याउलट, सत्तेत आलेल्या धनंजय मुंडे यांनी अतिशय मुत्सद्दीगिरीने सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेले संख्याबळ जमविलेच नाही तर ही लढाई एकतर्फी जिंकली.