शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

बीडमध्ये भाऊ ठरला बहिणीला भारी; धनंजय यांचा पंकजांना दुसरा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 05:01 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या ताब्यातील बीड जिल्हा परिषद घेऊन धनंजय मुंडे यांनी आपली बहीण पंकजा मुंडे यांना दीड महिन्यात परळी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर हा दुसरा धक्का दिला.

सतीश जोशीबीड : राज्यातील सत्ता परिवर्तनाचा फटका बीड जिल्ह्यातील राजकारणास बसला. महाआघाडीच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या ताब्यातील बीड जिल्हा परिषद घेऊन धनंजय मुंडे यांनी आपली बहीण पंकजा मुंडे यांना दीड महिन्यात परळी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर हा दुसरा धक्का दिला.जि.प.च्या पहिल्या टर्ममध्ये जशी मोडतोड करून पंकजा मुंडे यांनी भाजपला सत्तेत आणले होते, अगदी त्याच स्टाईलने यावेळेस भाजपला सुरुंग लावून तीन सदस्य फोडत धनंजय मुंडे यांनी जशास तसे उत्तर दिले. काँग्रेसचा एक सदस्य भाजपने फोडला परंतु, महाआघाडीस त्याचा काही फरक पडला नाही. मागील दोन वर्षांत जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अपयश आल्यानंतर धनंजय मुंडे बॅकफूटवर गेले होते. २०१९ ची परळी विधानसभा निवडणूक अस्तित्वाची समजून लढले आणि पंकजा मुंडेंचा पराभव करीत २०१४ च्या पराभवाची परतफेड केली.राज्यातील सत्ता बदलात धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री झाले. अवघ्या दीड महिन्यांतच त्यांनी बीड जिल्हा परिषद ताब्यात घेऊन बहिणीला दुसरा धक्का दिला. ६० सदस्यांच्या सभागृहात पाच सदस्य अपात्र, तर बाळासाहेब आजबे आणि संदीप क्षीरसागर आमदार झाल्यामुळे त्यांच्या दोन जागा रिक्त झाल्या. त्यामुळे ५३ सदस्यांच्या या सभागृहात बहुमतासाठी २७ सदस्यांची आवश्यकता होती. राज्याप्रमाणेच या जिल्हा परिषदेतही महाआघाडीचा पॅटर्न राबवत शिवसेनेला सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांना सर्वाधिक मते मिळवली. पहिल्या टर्ममध्ये राज्यात भाजपची सत्ता होती. तेव्हा ग्रामविकासमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी तोडफोड करीत अशक्य असलेली जि.प.ची सत्ता हस्तगत केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य भाजपने फोडले होते. त्यापैकी पाच सदस्यांना अपात्र घोषित करीत मतदानापासून वंचित ठेवले आहे. पंकजा मुंडे यांचा हा पॅटर्न धनंजय मुंडे यांनी राबविला. भाजपचे तीन सदस्य फोडून मागचे उट्टे काढले.>भाजपच्या यंत्रणेत समन्वयाचा अभावमागच्या वेळी भाजपसोबत असलेल्या शिवसेनेच्या ४ आणि काँग्रेसच्या एका सदस्याला सोबत घेऊन भाजपला धोबीपछाड दिली. परळी विधानसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे अजूनही सावरलेल्या नाहीत. मध्यंतरी गोपीनाथगडावर घेतलेल्या समर्थकांच्या मेळाव्यातच त्यांनी आपण जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय राहणार नसून ही जबाबदारी यापुढे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यावर सोपवित आहे, असे सांगून त्या जिल्ह्यातील राजकारणापासून अलिप्त राहिल्या होत्या.मागच्या वेळी त्यांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी जोराचा प्रयत्न केला होता. तसे प्रयत्न यावेळी दोघीही बहिणींकडून झाल्याचे दिसले नाहीत. पंकजा मुंडे तर परदेशात होत्या. त्यामुळे भाजपच्या यंत्रणेत समन्वयाचा अभाव जाणवला. याउलट, सत्तेत आलेल्या धनंजय मुंडे यांनी अतिशय मुत्सद्दीगिरीने सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेले संख्याबळ जमविलेच नाही तर ही लढाई एकतर्फी जिंकली.