शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
3
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
4
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
6
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
7
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
8
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
9
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
10
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
12
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
13
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
14
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
15
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
16
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
17
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
18
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
19
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
20
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ

रस्त्यावरच्या फांद्या ठरत आहेत धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:33 IST

अंबाजोगाई : ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा बाजूने अनेक मोठमोठी काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या ...

अंबाजोगाई : ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा बाजूने अनेक मोठमोठी काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या झाडांच्या फांद्या रस्त्यालगत येत आहेत. त्यामुळे मोठ्या वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्यावर आलेल्या काटेरी फांद्या तोडून रस्ता सुरक्षित करून द्यावा, अशी मागणी धानोरा येथील सामाजिक कार्यकर्ते पप्पू आदनाक यांनी केली आहे.

कृषी विभागाच्या बंधाऱ्याची दुर्दशा

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात अनेक गावांमध्ये २०१५ ते २०१८ या कालावधीत कृषी विभागाच्यावतीने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. आता हे बंधारे झालेल्या मोठ्या पावसामुळे नादुरूस्त झाले आहेत. अनेक बंधाऱ्यांना मोठमोठ्या भेगा पडल्याने पाणी वाहून जात आहे. त्यामुळे हे बंधारे निरूपयोगी ठरत आहेत. या बंधाऱ्यांची देखभाल व दुरूस्ती करावी, अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते प्रशांत आदनाक यांनी केली आहे.

मंदिर परिसरात शुकशुकाट

अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरातील श्री योगेश्वरी देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून भाविक येत असतात. मात्र कोरोना सुरू झाल्यापासून भाविकांची संख्या रोडावली आहे. आता पुन्हा मंदिर बंद ठेवल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवू लागला आहे. मंदिर बंद असल्याने या परिसरातील व्यवसायही थंडावले आहेत.

बळीराजा शेतीच्या मशागतीत गुंतला

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी उन्हाळी कामांना सुरुवात केली आहे. शेतीच्या मशागतीचे काम सध्या सुरू आहे. उन्हाळ्यात शेताची नांगरणी, कोळपणी व स्वच्छतेचे काम केले जाते. ग्रामीण भागातही कोरोनाची स्थिती वाढत चालल्याने गावात फिरण्यापेक्षा ग्रामस्थ स्वत:ला शेतीच्या कामात गुंतवून घेत आहेत. त्यामुळे शेतीची मशागतीची कामे जोमाने सुरू आहेत.

सुट्ट्या पैशांचा तुटवडा

अंबाजोगाई : नोटाबंदीनंतर ग्रामीण भागात चिल्लरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने आर्थिक व्यवहार करताना मोठ्या अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी चिल्लर मिळत नसल्याने ग्रामस्थांना इतरत्र भटकावे लागत आहे. दहा रुपयाचा रोकडा चलनात असतानाही व्यापारी व दुकानदार तो रोकडा स्वीकारत नसल्याने ग्रामस्थांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.