शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

रस्त्यावरच्या फांद्या ठरत आहेत धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:33 IST

अंबाजोगाई : ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा बाजूने अनेक मोठमोठी काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या ...

अंबाजोगाई : ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा बाजूने अनेक मोठमोठी काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या झाडांच्या फांद्या रस्त्यालगत येत आहेत. त्यामुळे मोठ्या वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्यावर आलेल्या काटेरी फांद्या तोडून रस्ता सुरक्षित करून द्यावा, अशी मागणी धानोरा येथील सामाजिक कार्यकर्ते पप्पू आदनाक यांनी केली आहे.

कृषी विभागाच्या बंधाऱ्याची दुर्दशा

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात अनेक गावांमध्ये २०१५ ते २०१८ या कालावधीत कृषी विभागाच्यावतीने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. आता हे बंधारे झालेल्या मोठ्या पावसामुळे नादुरूस्त झाले आहेत. अनेक बंधाऱ्यांना मोठमोठ्या भेगा पडल्याने पाणी वाहून जात आहे. त्यामुळे हे बंधारे निरूपयोगी ठरत आहेत. या बंधाऱ्यांची देखभाल व दुरूस्ती करावी, अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते प्रशांत आदनाक यांनी केली आहे.

मंदिर परिसरात शुकशुकाट

अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरातील श्री योगेश्वरी देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून भाविक येत असतात. मात्र कोरोना सुरू झाल्यापासून भाविकांची संख्या रोडावली आहे. आता पुन्हा मंदिर बंद ठेवल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवू लागला आहे. मंदिर बंद असल्याने या परिसरातील व्यवसायही थंडावले आहेत.

बळीराजा शेतीच्या मशागतीत गुंतला

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी उन्हाळी कामांना सुरुवात केली आहे. शेतीच्या मशागतीचे काम सध्या सुरू आहे. उन्हाळ्यात शेताची नांगरणी, कोळपणी व स्वच्छतेचे काम केले जाते. ग्रामीण भागातही कोरोनाची स्थिती वाढत चालल्याने गावात फिरण्यापेक्षा ग्रामस्थ स्वत:ला शेतीच्या कामात गुंतवून घेत आहेत. त्यामुळे शेतीची मशागतीची कामे जोमाने सुरू आहेत.

सुट्ट्या पैशांचा तुटवडा

अंबाजोगाई : नोटाबंदीनंतर ग्रामीण भागात चिल्लरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने आर्थिक व्यवहार करताना मोठ्या अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी चिल्लर मिळत नसल्याने ग्रामस्थांना इतरत्र भटकावे लागत आहे. दहा रुपयाचा रोकडा चलनात असतानाही व्यापारी व दुकानदार तो रोकडा स्वीकारत नसल्याने ग्रामस्थांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.