शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

उकळते पाणी अंगावर पडले, मायलेकराची मृत्यूशी झुंज; मदतीच्या हातांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 17:51 IST

हिटरमुळे ड्रम फुटून उकळते पाणी अंगावर; मुलीचा मृत्यू, मायलेकाची मृत्यूशी झुंज 

- नितीन कांबळे कडा ( बीड): हिटर सुरू राहिल्याने पाण्याने भरलेले ड्रम वितळून उकळते पाणी अंगावर पडल्याने दोन चिमुकल्यासह आई गंभीर भाजल्याची घटना घडली होती. त्यात तीन दिवसापूर्वी मुलीचा मृत्यू झाला. तर आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मायलेकरांच्या उपचाराची परवड होत आहे. याबाबत माहिती मिळताच मदतीचे हात सरसावले. मात्र, अजूनही मोठ्या मदतीची गरज असल्याने दानशुरांनी पुढे येण्याची गरज आहे.

आष्टी तालुक्यातील सांगवी आष्टी येथील २६ सप्टेंबर  रोजी पहाटेच्या दरम्यान ड्रम वितळून उकळते पाणी जवळच झोपलेल्या सुनीता योगेश सावंत ( ३०), श्रेयश ( ८) , श्रेया ( ५) यांच्या अंगावर पडले. यात तिघेही गंभीर भाजले. पुणे येथील ससून रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, रविवारी ( दि.१) सकाळी ५ वर्षीय श्रेयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

तर आई व मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या कुटुंबाची परिस्थिती अंत्यत हलाखीची असल्याने उपचाराचा खर्च पेलवणे अवघड होत आहे. याची माहिती मिळताच काही त्यांना मदत केली. मात्र, आणखी मदतीची गरज असल्याने दानशुरांनी पुढे येण्याची गरज आहे. योगेश सावंत, शहाजी सावंत यांच्या ८८०६२५६१०२ या मोबाईल नंबरवर युपीआय द्वारे मदत करण्याचे आवाहन सांगवी आष्टीचे सरपंच विनोद खेडकर यांनी केले आहे.

 

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटल