शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

भाजपने केले ‘महिला सक्षमीकरण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:26 IST

भाजप सरकारने खऱ्या अर्थाने महिलांना न्याय देऊन सन्मान दिल्याचे मत खा. प्रीतम मुंडे यांनी रमेश आडसकर यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रीतम मुंडे यांचे प्रतिपादन : माजलगाव येथे महिला मेळाव्यात केले मार्गदर्शन

माजलगाव : नारी शक्तीचा आणि महिलेचा खरा सन्मान हा पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात झाला आहे. महिला सक्षमीकरण करून त्यांना प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना या सरकारने सुरु केल्या. त्याचेच यश म्हणून एकट्या बीड जिल्ह्यात सुमारे तीस हजार बचत गटांची स्थापना झाली. ते उत्तम प्रकारे सुरु असून, यातून महिलांचा विकास साधण्याचे काम झाले आहे. त्यामुळे भाजप सरकारने खऱ्या अर्थाने महिलांना न्याय देऊन सन्मान दिल्याचे मत खा. प्रीतम मुंडे यांनी रमेश आडसकर यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात व्यक्त केले.महिला बचत गटातून महिला या स्वावलंबी बनून आपल्या पायावर उभा राहिल्या आहेत हेच खरे यश आहे. तसेच अंगणवाडी ताई महिलांना योग्य सन्मान देण्याचा निर्णय घेऊन मानधनात वाढ केली. माता भगिनींना चुलीच्या त्रासापासून मुक्ती देत पंतप्रधान उज्वला गॅस योजना दारोदारी देऊन महिलांनाच सन्मान केला. गरजवतांना आपल्या हक्काचे घर घरकुलाच्या माध्यमातून देत हक्काचे ठिकाण दिले. गरजू रुग्णांना जीवनदायी योजनेतून न परवडणारा उपचार देण्याच्या कल्याणकारी योजनेचा लाभ देण्याचे काम भाजप सरकारने केले.याभागात देखील चांगल्या पद्धतीने या योजना सर्वसामान्य महिलांना लाभ मिळाल्याने पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाने लोकापर्यंत खरे काम पोहचविण्याचे काम केल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी उपनगराध्यक्षा सुमन मुंडे, गौरी देशमुख, रुपाली कचरे, संजीवनी राऊत, प्रतीक्षा मुळे यांनी मनोगत व्यक्त केले. यापुढेही याच पद्धतीने योजनेचा लाभ मिळण्यासाठी भाजपचे उमेदवार रमेश आडसकरांना विजयी करण्याचे आवाहन प्रीतम मुंडे यांनी केले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019majalgaon-acमाजलगांवBJPभाजपाPritam Mundeप्रीतम मुंडे