शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बॅँक अधिका-यांना सुनावले ; पाच बैठका झाल्या, पीक कर्जवाटपात दिरंगाई का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:27 IST

बीड जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे लक्षांक २११६ कोटी रुपये असून बॅँकांकडून आतापर्यंत ८५.८६ कोटी रुपये वाटप केले आहे. हे कर्जवाटप असमाधानकारक असून यात दिरंगाई का, अशी विचारणा करतानाच पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जूनअखेरपर्यंत पूर्ण करावे असे आदेश जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सर्व बॅँकांना दिले.

बीड : पीककर्ज वाटप अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व बँकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येत आहे. यासाठी सर्व बँकांच्या जिल्हा समन्वयकांच्या आतापर्यंत ५ बैठका घेण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे लक्षांक २११६ कोटी रुपये असून बॅँकांकडून आतापर्यंत ८५.८६ कोटी रुपये वाटप केले आहे. हे कर्जवाटप असमाधानकारक असून यात दिरंगाई का, अशी विचारणा करतानाच पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जूनअखेरपर्यंत पूर्ण करावे असे आदेश जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सर्व बॅँकांना दिले.

खरीप पीक कर्ज वाटप आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे, निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी विजय चव्हाण, एस बी आय बँकेचे डी.जी.एम. सी.एस.राणा, रिझर्व्ह बँकेचे ए.जी.एम मनोज कुमार, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे जिल्हा समन्वयक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपनिबंधक, सहायक निबंधक, सहकारी संस्था, महसूल संघटनेचे पदाधिकारी व सर्व राष्ट्रीयीकृत, ग्रामीण खाजगी बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

बँक शाखांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी जिल्हयातील सर्व बँकांच्या प्रत्येक शाखेस एक नोडल आॅफीसर नियुक्त केलेले आहेत. तसेच ज्या बँकांकडे कर्मचारी संख्या कमी आहे तेथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी, सहकार विभागाचे कर्मचारी व गटसचिव बँकेत थांबून बँकेस आवश्यक ती मदत करण्यास तयार असून देखील पीक कर्ज वाटपास गती का मिळत नाही, अशा शब्दात जिल्हाधिकाºयांनी विचारणा केली.जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेले शेतकरी नवीन कर्ज घेण्यास पात्र झालेले आहेत. संबंधित बँकांनी कर्जमाफी झालेल्या शेतक-यांना नवीन कर्ज मंजूर करावे. बँकांनी पीक कर्ज वाटपाबाबत बँकेकडे असलेल्या गावामध्ये जाऊन कर्ज मेळावे आयोजित करावे. अशा सूचनाही जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी यावेळी दिल्या.

कर्ज मंजुरी, वाटप तसेच लक्षांक पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी, दररोज किती शेतक-यांना कर्जवाटप करणार व त्यानुसार किती तारखेपर्यंत लक्षांक पूर्ण होईल इ. कर्ज वाटपाची माहिती आॅनलाईन गुगल स्प्रेड शीटवर दररोज दिली पाहिजे अशा जिल्हाधिकारी सिंह यांनी सर्व बँकांना दिल्या.

यावेळी जिल्हा उपनिबंधक एस पी बडे यांनी तालुकास्तरीय समिती स्थापनेचा आदेश, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे लक्षांक इतर बॅकांना वर्ग केल्याचे आदेश, जिल्ह्यातील अधिकाºयांची पीक कर्ज वाटपासाठी संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश इत्यादींची माहिती सादरीकरणाव्दारे दिली. यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे एजीएम मनोजकुमार यांनी बँकांनी कर्जवाटप गतिमान करणे आवश्यक असल्याचे सांगीतले.बॅँकांना तंबी : खाते वर्ग करूनिवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पीक विमा, मुद्रा योजना इत्यादी योजनांचा आढावा घेतला.ज्या बँका त्यांना दिलेला पीक कर्ज वाटपाचा लक्षांक मुदतीत पूर्ण करणार नाही त्या बँकांमधील सरकारी खाती महाराष्ट्र ग्रामीण बँकेत वर्ग करणार येणार असल्याची माहितीही यावेळी दिली. जिल्ह्यातील सर्व बँकांच्या शाखांना लक्षांक वाटप करून शाखानिहाय कर्जवाटपाचे दैनंदिन नियोजन करावे व दररोज झालेल्या कर्जवाटपाचे शाखानिहाय अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर करण्याबाबत सर्व बँकांच्या जिल्हा समन्वयक यांना निर्देश देण्यात आले.

अनेक बॅँकांकडून कर्ज घेणारे होणार उघडयावेळी अनेक बँकांकडून कर्ज घेतलेले शेतकºयांबाबत एस.बी.आय गेवराईचे शाखाधिकाºयांनी मुद्दा उपस्थित केल्यावर अशा शेतक-यांची यादी बँकांनी नोटीस बोर्डवर डकवावी अशी सूचना यावेळी करण्यात आली. तसेच जिल्हा उपनिबंधक व जिल्हा अग्रणी बँक अधिकाºयांनी संनियंत्रण अधिकारी व बँकर्स यांच्यामध्ये योग्य ते समन्वय राखून कामकाज करण्याबाबत, तालुकास्तरीय सभा दर शुक्रवारी न चुकता आयोजित करणे तसेच सर्व तहसीलदारांनी प्रथम प्राधान्याने कार्यवाही करण्याबाबत सूचना यावेळी देण्यात आल्या.

व्हिडिओ व्हायरलमुळे अडचणीयावेळी बँक आॅफ बडोदा बँकेचे जिल्हा समन्वयक यांनी सद्यस्थितीत शासन २०१७ अखेर सरसकट कर्जमाफी देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे व त्यामुळेच शेतकरी सभासदांना कर्जवाटप होण्यासाठी अडचण येत असल्याचे सांगितले. यावेळी एस बी आय बँकेचे डी.जी.एम. सी.एस राणा यांनी बँकेच्या वतीने प्रशासनाचे सहकार्याने कर्जवाटपातील अडचणी दूर करून जास्तीत जास्त कर्जवाटप करण्याची हमी दिली.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा