शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

बीडला ३० मार्च रोजी पोलीस भरतीतील उमेदवारांची होणार लेखी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:13 IST

पोलीस भरतीची मैदानी चाचणी पार पडल्यानंतर आता ३० मार्च रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी तगडा बंदोबस्त राहणार असून, परीक्षावर कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. तसेच दलालांवर वॉच ठेवण्यासाठी विशेष पथके नियुक्ती केली आहेत. एखाद्या व्यक्तीवर संशय वाटल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पोलीस भरतीची मैदानी चाचणी पार पडल्यानंतर आता ३० मार्च रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी तगडा बंदोबस्त राहणार असून, परीक्षावर कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. तसेच दलालांवर वॉच ठेवण्यासाठी विशेष पथके नियुक्ती केली आहेत. एखाद्या व्यक्तीवर संशय वाटल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले आहे.

१२ ते २१ मार्च दरम्यान पोलीस मुख्यालयावर ५३ जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया पार पडली. तब्बल चार हजारांवर उमेदवारांनी ही चाचणी दिली. पात्र - अपात्र उमदेवारांची माहिती काढणे अद्यापही सुरुच आहे. दरम्यान, पोलीस दलाने लेखी परीक्षेची तारीख ३० मार्च जाहीर केली आहे. सकाळी ७ वाजता बीड शहरातील तेलगाव नाक्यावरील आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयात ही परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षेला येताना पोलीस भरतीचे ओळखपत्र, चेस्ट नंबर, स्वत:चा फोटो असलेले ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असल्याचेही जी. श्रीधर यांनी सांगितले. या परीक्षेत गडबड गोंधळ होणार नाही त्या दृष्टिकोनातून तगडा बंदोबस्त लावला आहे. तसेच प्रत्येक हॉलमध्ये सीसीटीव्ही व व्हिडीओ कॅमेरे राहणार असल्याचेही श्रीधर यांनी सांगितले.अफवांवर विश्वास नकोलेखी परीक्षेत पैसे देऊन भरती होता येते अशी अफवा शहरात पसरली आहे. परंतु पोलीस दलाने असा कुठलाही प्रकार होणार नाही असा विश्वास उमेदवारांना दिला आहे. असे कोठे होते असेल तर गोपनीय माहिती द्यावी, त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. परीक्षा पारदर्शकपणे होणार आहे. उमेदवार व नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, असे आवाहनही जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे, अजित बोºहाडे, उप अधीक्षक सुधीर खिरडकर यांनी केले आहे.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसexamपरीक्षाMarathwadaमराठवाडा