शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

बीड : वाढीव आरक्षणासाठी वंजारी समाज एकवटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:14 IST

वंजारी समाजाला देण्यात आलेले २ टक्के आरक्षण हे लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. त्यामध्ये वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने वंजारी समाजातील नागरिक सहभागी झाले होते.

ठळक मुद्दे१० टक्के आरक्षण देण्याची मागणी : विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

बीड : वंजारी समाजाला देण्यात आलेले २ टक्के आरक्षण हे लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. त्यामध्ये वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने वंजारी समाजातील नागरिक सहभागी झाले होते.राज्यात वंजारी समाजाला एनटी.डी प्रवर्गातून २ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, हे आरक्षण तोकडे आहे. त्यासाठी देखील समाजाला संघर्ष करावा लागला होता. लोकसंख्येच्या प्रमाणात हे देण्यात आलेले २ टक्के आरक्षण कमी आहे. त्या तुलनेत विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक पात्रता अधिक आहे मात्र, आरक्षण कमी असल्यामुळे त्याचा फायदा होत नाही. तसेच खुल्या प्रवार्गात देखील प्रविष्ट होता येत नाही. त्यामुळे अनेक वेळा उच्च शिक्षणासाठी संधी समाजातील मुलांना मिळत नाही. वंजारी समाजाला वाढीव आरक्षण देण्याची मागणी आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आले होते. यासाठी जिल्हाभरात समाजामध्ये जनजागृती करुन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन देखील केले होते.मंगळवारी काढण्यात आलेला मोर्चाबीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ््यापासून निघाला होता. त्यानंतर सुभाष रोड मार्गे शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाचे नेतृत्व समाजातील मुलींनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या व्यासपीठावर मुलींनी आरक्षणासंदर्भातील मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी वाढीव आरक्षणाची आवश्यकता का आहे, त्याचा समाजाला फायदा कसा होईल याविषयी माहिती दिली. तसेच शासनाने मागण्यांचा विचार करुन तात्काळ निर्णय घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले.या आहेत प्रमुख मागण्याजातनिहाय जनगणना करावी, लोकसंख्येच्या प्रमाणात वंजारी समाजाला १० टक्के आरक्षण द्यावे, उद्योग व्यावसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध व्हावे, शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची राहण्याची व्यावस्था व्हावी यासाठी जिल्हानिहाय वसतीगृह व्हावेत, समाजासाठी कै. गोपीनाथराव मुंडे या नावाने महामंडळ स्थापन करावे, मागासप्रवर्गीय प्रवर्गातून उच्चतम गुणवत्ताधारक स्पर्धकांना खुल्या प्रवर्गामध्ये सर्व स्तरावरील शिक्षणाची व नौकरीची संधी पुर्ववत मिळावी. या मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत, त्याचा विचार शासनाने करावा व तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा राज्यात सर्व जिल्ह्यात मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.विधानसभा निवडणुकीवर बहिष्कारवंजारी समाज हा कष्टकरी, शेतकरी व शेतमजुर तसेच उसतोड कामगार आहे. अजूनही समाजात शिक्षणाचे प्रमाण हवे त्या पटीत वाढलेले नाही. त्यामुळे वंजारी समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय तात्काळ शासनाने घ्यावा. अन्यथा राज्यभरात विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला जाईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

टॅग्स :BeedबीडMorchaमोर्चाreservationआरक्षण