शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
4
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
5
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
6
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
7
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
8
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
9
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
10
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
11
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
12
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
13
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
14
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
15
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
16
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
17
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
18
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
19
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
20
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
Daily Top 2Weekly Top 5

बीड : वाढीव आरक्षणासाठी वंजारी समाज एकवटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:14 IST

वंजारी समाजाला देण्यात आलेले २ टक्के आरक्षण हे लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. त्यामध्ये वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने वंजारी समाजातील नागरिक सहभागी झाले होते.

ठळक मुद्दे१० टक्के आरक्षण देण्याची मागणी : विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

बीड : वंजारी समाजाला देण्यात आलेले २ टक्के आरक्षण हे लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. त्यामध्ये वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने वंजारी समाजातील नागरिक सहभागी झाले होते.राज्यात वंजारी समाजाला एनटी.डी प्रवर्गातून २ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, हे आरक्षण तोकडे आहे. त्यासाठी देखील समाजाला संघर्ष करावा लागला होता. लोकसंख्येच्या प्रमाणात हे देण्यात आलेले २ टक्के आरक्षण कमी आहे. त्या तुलनेत विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक पात्रता अधिक आहे मात्र, आरक्षण कमी असल्यामुळे त्याचा फायदा होत नाही. तसेच खुल्या प्रवार्गात देखील प्रविष्ट होता येत नाही. त्यामुळे अनेक वेळा उच्च शिक्षणासाठी संधी समाजातील मुलांना मिळत नाही. वंजारी समाजाला वाढीव आरक्षण देण्याची मागणी आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आले होते. यासाठी जिल्हाभरात समाजामध्ये जनजागृती करुन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन देखील केले होते.मंगळवारी काढण्यात आलेला मोर्चाबीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ््यापासून निघाला होता. त्यानंतर सुभाष रोड मार्गे शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाचे नेतृत्व समाजातील मुलींनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या व्यासपीठावर मुलींनी आरक्षणासंदर्भातील मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी वाढीव आरक्षणाची आवश्यकता का आहे, त्याचा समाजाला फायदा कसा होईल याविषयी माहिती दिली. तसेच शासनाने मागण्यांचा विचार करुन तात्काळ निर्णय घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले.या आहेत प्रमुख मागण्याजातनिहाय जनगणना करावी, लोकसंख्येच्या प्रमाणात वंजारी समाजाला १० टक्के आरक्षण द्यावे, उद्योग व्यावसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध व्हावे, शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची राहण्याची व्यावस्था व्हावी यासाठी जिल्हानिहाय वसतीगृह व्हावेत, समाजासाठी कै. गोपीनाथराव मुंडे या नावाने महामंडळ स्थापन करावे, मागासप्रवर्गीय प्रवर्गातून उच्चतम गुणवत्ताधारक स्पर्धकांना खुल्या प्रवर्गामध्ये सर्व स्तरावरील शिक्षणाची व नौकरीची संधी पुर्ववत मिळावी. या मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत, त्याचा विचार शासनाने करावा व तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा राज्यात सर्व जिल्ह्यात मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.विधानसभा निवडणुकीवर बहिष्कारवंजारी समाज हा कष्टकरी, शेतकरी व शेतमजुर तसेच उसतोड कामगार आहे. अजूनही समाजात शिक्षणाचे प्रमाण हवे त्या पटीत वाढलेले नाही. त्यामुळे वंजारी समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय तात्काळ शासनाने घ्यावा. अन्यथा राज्यभरात विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला जाईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

टॅग्स :BeedबीडMorchaमोर्चाreservationआरक्षण