शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बीड : वाढीव आरक्षणासाठी वंजारी समाज एकवटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:14 IST

वंजारी समाजाला देण्यात आलेले २ टक्के आरक्षण हे लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. त्यामध्ये वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने वंजारी समाजातील नागरिक सहभागी झाले होते.

ठळक मुद्दे१० टक्के आरक्षण देण्याची मागणी : विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

बीड : वंजारी समाजाला देण्यात आलेले २ टक्के आरक्षण हे लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. त्यामध्ये वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने वंजारी समाजातील नागरिक सहभागी झाले होते.राज्यात वंजारी समाजाला एनटी.डी प्रवर्गातून २ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, हे आरक्षण तोकडे आहे. त्यासाठी देखील समाजाला संघर्ष करावा लागला होता. लोकसंख्येच्या प्रमाणात हे देण्यात आलेले २ टक्के आरक्षण कमी आहे. त्या तुलनेत विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक पात्रता अधिक आहे मात्र, आरक्षण कमी असल्यामुळे त्याचा फायदा होत नाही. तसेच खुल्या प्रवार्गात देखील प्रविष्ट होता येत नाही. त्यामुळे अनेक वेळा उच्च शिक्षणासाठी संधी समाजातील मुलांना मिळत नाही. वंजारी समाजाला वाढीव आरक्षण देण्याची मागणी आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आले होते. यासाठी जिल्हाभरात समाजामध्ये जनजागृती करुन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन देखील केले होते.मंगळवारी काढण्यात आलेला मोर्चाबीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ््यापासून निघाला होता. त्यानंतर सुभाष रोड मार्गे शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाचे नेतृत्व समाजातील मुलींनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या व्यासपीठावर मुलींनी आरक्षणासंदर्भातील मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी वाढीव आरक्षणाची आवश्यकता का आहे, त्याचा समाजाला फायदा कसा होईल याविषयी माहिती दिली. तसेच शासनाने मागण्यांचा विचार करुन तात्काळ निर्णय घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले.या आहेत प्रमुख मागण्याजातनिहाय जनगणना करावी, लोकसंख्येच्या प्रमाणात वंजारी समाजाला १० टक्के आरक्षण द्यावे, उद्योग व्यावसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध व्हावे, शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची राहण्याची व्यावस्था व्हावी यासाठी जिल्हानिहाय वसतीगृह व्हावेत, समाजासाठी कै. गोपीनाथराव मुंडे या नावाने महामंडळ स्थापन करावे, मागासप्रवर्गीय प्रवर्गातून उच्चतम गुणवत्ताधारक स्पर्धकांना खुल्या प्रवर्गामध्ये सर्व स्तरावरील शिक्षणाची व नौकरीची संधी पुर्ववत मिळावी. या मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत, त्याचा विचार शासनाने करावा व तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा राज्यात सर्व जिल्ह्यात मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.विधानसभा निवडणुकीवर बहिष्कारवंजारी समाज हा कष्टकरी, शेतकरी व शेतमजुर तसेच उसतोड कामगार आहे. अजूनही समाजात शिक्षणाचे प्रमाण हवे त्या पटीत वाढलेले नाही. त्यामुळे वंजारी समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय तात्काळ शासनाने घ्यावा. अन्यथा राज्यभरात विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला जाईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

टॅग्स :BeedबीडMorchaमोर्चाreservationआरक्षण