शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

बीड, वडवणी, पाटोद्यात ‘हल्लाबोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:27 AM

बीड : अवघ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँगे्रसने सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर हल्लाबोल मोर्चाद्वारे रान पेटविलेले आहे. विविध फसव्या योजनांच्या माध्यमातुन सरकार कशा पद्धतीने सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे, यावर मोठा जनाक्रोश सुरु आहे. जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्यात मोर्चे काढले जात आहेत. बुधवारी बीड, पाटोदा व वडवणीमध्ये हल्लाबोल मोर्चा काढून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ...

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

बीड : अवघ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँगे्रसने सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर हल्लाबोल मोर्चाद्वारे रान पेटविलेले आहे. विविध फसव्या योजनांच्या माध्यमातुन सरकार कशा पद्धतीने सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे, यावर मोठा जनाक्रोश सुरु आहे. जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्यात मोर्चे काढले जात आहेत. बुधवारी बीड, पाटोदा व वडवणीमध्ये हल्लाबोल मोर्चा काढून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

बीडमध्ये दुचाकी रॅलीने दणाणला परिसरबीड : शेतकरी आणि जनसामान्यांच्या विरोधातील भाजप सरकारविरूद्ध बीड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवणी फाटा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारविरोधी घोषणांचा हल्लाबोल करीत दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये माजी आमदार सय्यद सलीम, ज्येष्ठ नेते डी.बी.बागल, माजी आमदार राजेंद्र जगताप यांची उपस्थिती होती. शेतकºयांचे सरसकट कर्जमाफ करून सातबारा कोरा करा, बीड जिल्ह्यातील लोडशेडींग तातडीने बंद करा, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई द्या, खरिप हंगामातील पिकविमा तातडीने वाटप करा, शेतीमालाला हमीभाव द्या, खरेदी केंद्र सुरू करा, शेतातील नादुरूस्त डी.पी. दुरूस्त करण्यात याव्यात यासह विविध मागण्यांसाठी हे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.सकाळी अकरा वाजता शिवणी फाटा येथून दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये संदीप क्षीरसागर, गंगाधर घुमरे, किसानसभेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, बबन गवते, दिलीप भोसले, शिवाजी जाधव, भाऊसाहेब डावकर, अमर नाईकवाडे, रमेश चव्हाण, फारूक पटेल, फेरोज पठाण, सुधीर काकडे, सचिन शेळके, उत्तरेश्वर सोनवणे, दत्तुभाऊ जाधव, देवकते, खदीर ज्वारीवाले, इरफान बागवान, युवराज जगताप, जयतुल्ला खान, प्रभाकर पोकळे, भैय्या मोरे, रणजित बनसोडे, प्रेम चांदणे, गणेश तांदळे, किशोर पिंगळे, बाजीराव बोबडे, बरकत पठाण, शेख इकबाल यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.वडवणीत सरकारविरोधात घोषणाबाजीभाजपच्या तीन वर्षाच्या काळात फक्त खोटी आश्वासने फसव्या योजना व जाहिरात बाजी करून जनतेला गाजर दाखवत या देशातील व राज्यातील शेतकरी कष्टकरी समाजासह व्यापाºयांना भाजप सरकारने देशोधडीला लावण्याचे काम केले. आता जनताच भाजप सरकारला जागा दाखवून देईल, असा आरोप माजी राज्यमंत्री प्रकाश सोंळके यांनी वडवणीतील मोर्चात केला. यावेळी राष्ट्रवादीचे जयसिंह सोंळके, रेखा फड, सोमनाथ बडे, पंजाबराव शिंदे, विनोदकुमार नहार, दिनेश मस्के, प्रशांत सावंत, संदिपान खळगे, गणेश शिंदे, भगवानराव लंगे, भारत जगताप, तालुकाध्यक्ष बजरंग साबळे, विश्वास आगे, औदुंबर सांवत, शेषेराव जगताप, संतोष पवार, अस्लम कुरेशी, सचिन लंगडेसह कार्यकर्ते, शेतकरी पदाधिकारी उपस्थित होते. हल्लाबोल अांदोलन हे वसंत नाईक चौक पासून पदयात्रा तहसील कार्यालयात धडकले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. सदरील मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार शेख यांना देण्यात आले.

पाटोद्यातही हल्लाबोलपाटोदा : पाटोदा तालुका राष्ट्रवादीच्या वतीने शिवभूषण जाधव यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा तहसीलवर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. कर्ज माफीची खोटी आश्वासने, महिलांवरील वाढते अत्याचार, शेतीमालाला मिळणारा हमीभाव, गॅस, पेट्रोल, डिझेलचे वाढलेले भाव अशा खोट्या आश्वासने देणाºया भाजप सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढण्यता आल्याचे राष्ट्रवादीने कळविले आहे. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करून हल्लाबोल आंदोलन झाले. यावेळी मोर्चात बाळासाहेब आजबे, शिवाजी राऊत, महेबूब शेख, अण्णासाहेब चौधरी, सतीश बडे, गुलाबराव घुमरे आदी सहभागी झाले होते.