शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बीड, तुळजापूरचे ‘सैराट’ जोडपे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 01:08 IST

उस्मानाबादच्या तुळजापूरमधून आणि बीडच्या आष्टी तालुक्यातून पलायन केलेल्या सैराट जोडप्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : उस्मानाबादच्या तुळजापूरमधून आणि बीडच्या आष्टी तालुक्यातून पलायन केलेल्या सैराट जोडप्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना आष्टी आणि तुळजापूर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तुळजापूर आणि कर्जतमध्ये केली.आष्टी तालुक्यातील कडा येथील मनाली (नाव बदललेले) हिला तिच्याच बहिणीचा दीर गणेश लक्ष्मण लोंढे (२२ रा.डिकसळ ता.कर्जत) याने पळवून नेले. ही घटना सप्टेंबर २०१७ रोजी घडली होती. आष्टी पोलिसांना याचा तपास न लागल्याने हे प्रकरण २६ जानेवारी २०१९ रोजी बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे आले.कक्षाने अवघ्या चार दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला. दोघांनाही मिरजगाव येथून ताब्यात घेतले. त्यांना आष्टी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.दरम्यान, मनाली व गणेश हे सुरूवातीला पुण्यात राहिले. गणेश हा प्लंबरचे काम करीत होता. मात्र त्यावर त्यांचा खर्च भागला नाही. म्हणून ते मिरजगावला आले होते. हीच माहिती पोलिसांना मिळाली. बातमीदारामार्फत त्यांनी त्याच्या मित्राला गाठले. त्यांच्या माध्यमातून ते या जोडप्यापर्यंत पोहोचले.रात्रीच्या वेळी जेवण सुरू असतानाच त्यांनी या जोडप्याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि भारत माने, सफौ. शिवाजी भारती, प्रताप वाळके, सुरेखा उगले, सिंधू उगले, नीलावती खटाणे, मीना घोडके, शेख शमीम, सतीश बहिरवाळ, विकास नेवडे आदींनी केली.एप्रिल २०१८ रोजी तुळजापुरमध्ये शेजारीच राहणाऱ्या नंदिनीला (नाव बदललेले) महेश तुळशीराम लोंढे (२२) याने पळवून नेले होते. तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. हा गुन्हा बीडच्या एएचटीयू विभागाकडे येताच त्यांनी याचा तपास लावला. तुळजापुरमधूनच नंदिनीची सुटका केली. मात्र महेशने अगोदरच पलायन केले. पीडितेला पोलीस, नातेवाईकांच्या स्वाधीन केले. या गुन्ह्यात महेशच्या आई-वडिलांना अटक केली होती.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारी