शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

बीडमध्ये सोशल मीडियातून '१५ दिवस जिल्हा बंद' च्या अफवांचे पेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 19:40 IST

सोमवारी झालेल्या कोरोनाबाधीताच्या मृत्यूमुळे पुढील १५ दिवस जिल्हा बंद राहणार, अशा अफवा सोशल मिडीयावर पसरविल्या.

बीड : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच एका मृत्यूमुळे पुढील १५ दिवस जिल्हा बंद राहणार, अशा अफवा सोशल मिडीयावर पसरत आहेत. परंतु याची खात्री केली असता याबाबत जिल्हाधिकारी यांचा कसलाच आदेश नसल्याचे सांगण्यात आले. या अफवांमुळे मात्र नागरिक दिवसभर भितीने हैराण झाले होते.

जिल्ह्यात रविवारी ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यातील एका वृद्धेचा सोमवारी पहाटे उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला तर सहा रुग्णांना विनंती वरून पुण्याला पाठविले आहे. त्यामुळे सध्या दोनच रुग्ण उपचार घेत आहेत. परंतू सोमवारी झालेल्या मृत्यूमुळे पुढील १५ दिवस जिल्हा बंद राहणार, अशा अफवा सोशल मिडीयावर पसरविल्या. हाच संदेश दिवसभर सर्वत्र फिरला. नागरिकांनी याची खात्री न करता त्यावर विश्वास ठेवला आणि फोनाफोनी सुरू केली. परंतु असा कसलाही आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी सायंकाळभ ७ वाजेपर्यंत काढला नव्हता. त्यामुळे नागरिकांनी अफवा पसरवू नये आणि त्यावर विश्वासही ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. 

बीड बंद बाबत जिल्हाधिकारी यांनी आतापर्यंत (सायं ७ वाजेपर्यंत) कसलाही आदेश काढलेला नाही. या केवळ अफवा आहेत.- अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड