शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आरोपीने पलायन केल्यानंतरही बीड जेलच्या सुरक्षिततेत सुधारणा नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 11:00 IST

कमी उंचीच्या भिंतीचा आधार घेत उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारून अट्टल दरोडेखोराने पलायन केले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांत कारागृह प्रशासनाने दरवाजा व इतर ठिकाणच्या भिंतींची उंची वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले. याला १३ दिवसांचा कालावधी उलटला तरी बांधकाम विभागाचा एकही अधिकारी, कर्मचारी कारागृहाकडे फिरकला नाही, असे कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे. तर सा.बां.विभागाने पाहणी केली असून अंदाजपत्रक तयार केल्याचे सांगितले. या दोघांच्या टोलवाटोलवीने कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न अद्यापही गंभीरच आहे.

ठळक मुद्देभिंतीची उंची वाढविण्याची गरज : सार्वजनिक बांधकाम विभाग व कारागृह प्रशासनाची टोलवाटोलवीदोघांच्या वादात सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

बीड : कमी उंचीच्या भिंतीचा आधार घेत उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारून अट्टल दरोडेखोराने पलायन केले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांत कारागृह प्रशासनाने दरवाजा व इतर ठिकाणच्या भिंतींची उंची वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले. याला १३ दिवसांचा कालावधी उलटला तरी बांधकाम विभागाचा एकही अधिकारी, कर्मचारी कारागृहाकडे फिरकला नाही, असे कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे. तर सा.बां.विभागाने पाहणी केली असून अंदाजपत्रक तयार केल्याचे सांगितले. या दोघांच्या टोलवाटोलवीने कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न अद्यापही गंभीरच आहे.

१५ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास ज्ञानोबा जाधव (रा.रूपचंद तांडा जि.लातूर) या दरोडेखोराने कारागृहातून पलायन केले होते. ज्ञानोबा हा कारागृहातील एका खिडकीच्या आधारे छोट्या भिंतीवर चढला. तेथून तो मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला. येथून तो उंच असलेल्या संरक्षक भिंतीवर चढला. त्याच्यासोबत दुसरा सहकारीही होता. ज्ञानोबाने उंच भिंतीवरून उडी मारली. यामध्ये त्याच्या पायास दुखापत झाल्याने त्याचा सहकारी घाबरून पुन्हा कारागृहात परतला. त्यानंतर ज्ञानोबाला शोधण्यात कारागृह प्रशासनाची धांदल उडाली होती. सुदैवाने तो उपचार घेताना जिल्हा रुग्णालयात सापडला. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, या घटनेने कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सर्वस्तरातून कारागृह प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर कारागृह अधीक्षक एम.एस.पवार यांनी तात्काळ मुख्य प्रवेशद्वारावरील भिंत, भेटण्याच्या कक्षाजवळील भिंत व इतर ठिकाणच्या काही त्रुटींबद्दल सा.बां. विभागाला पत्र पाठवून अंदाजपत्रक तयार करून देण्यासंदर्भात कळविले. परंतु यावर अद्याप कसलीच कारवाई झालेली नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व कारागृह प्रशासन या गंभीर प्रश्नावर एकमेकांकडे बोट दाखवित असून टोलवाटोलवी करीत असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका कारागृहाच्या सुरक्षिततेला बसत आहे.यापूर्वीही आरोपींनी केले होते पलायनकाही वर्षांपूर्वी कारागृहाच्या भिंतीची दगड काढून तीन आरोपींनी पलायन केले होते. त्यानंतर तात्काळ मजबूत अशी संरक्षक भिंत उभारण्यात आली. आता पुन्हा एका आरोपीन पलायन केल्यानंतर कारागृहातील कमी उंचीच्या भिंतीबद्दल शंका उपस्थित करण्यात आली. भिंतीची उंची वाढविण्यासाठी प्रशासन मात्र अद्याप तरी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.त्रुटींबद्दल जाारूकता हवीकारागृहातील काही भिंतीची उंची कमी असल्याचे माहिती असतानाही प्रशासनाने यापूर्वीच का पत्र पाठविलेले नाही. तसेच इतर सुरक्षिततेबाबत हलगर्जीपणा का केला, यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारागृहातील प्रत्येक गोष्ट व सुरक्षिततेसाठी प्रशासनाने जागरूक राहण्याची गरज आहे. घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा घटना घडू नयेत, यासाठी पाऊले उचलण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :jailतुरुंगpwdसार्वजनिक बांधकाम विभागPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणेBeedबीड