शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

आरोपीने पलायन केल्यानंतरही बीड जेलच्या सुरक्षिततेत सुधारणा नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 11:00 IST

कमी उंचीच्या भिंतीचा आधार घेत उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारून अट्टल दरोडेखोराने पलायन केले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांत कारागृह प्रशासनाने दरवाजा व इतर ठिकाणच्या भिंतींची उंची वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले. याला १३ दिवसांचा कालावधी उलटला तरी बांधकाम विभागाचा एकही अधिकारी, कर्मचारी कारागृहाकडे फिरकला नाही, असे कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे. तर सा.बां.विभागाने पाहणी केली असून अंदाजपत्रक तयार केल्याचे सांगितले. या दोघांच्या टोलवाटोलवीने कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न अद्यापही गंभीरच आहे.

ठळक मुद्देभिंतीची उंची वाढविण्याची गरज : सार्वजनिक बांधकाम विभाग व कारागृह प्रशासनाची टोलवाटोलवीदोघांच्या वादात सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

बीड : कमी उंचीच्या भिंतीचा आधार घेत उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारून अट्टल दरोडेखोराने पलायन केले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांत कारागृह प्रशासनाने दरवाजा व इतर ठिकाणच्या भिंतींची उंची वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले. याला १३ दिवसांचा कालावधी उलटला तरी बांधकाम विभागाचा एकही अधिकारी, कर्मचारी कारागृहाकडे फिरकला नाही, असे कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे. तर सा.बां.विभागाने पाहणी केली असून अंदाजपत्रक तयार केल्याचे सांगितले. या दोघांच्या टोलवाटोलवीने कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न अद्यापही गंभीरच आहे.

१५ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास ज्ञानोबा जाधव (रा.रूपचंद तांडा जि.लातूर) या दरोडेखोराने कारागृहातून पलायन केले होते. ज्ञानोबा हा कारागृहातील एका खिडकीच्या आधारे छोट्या भिंतीवर चढला. तेथून तो मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला. येथून तो उंच असलेल्या संरक्षक भिंतीवर चढला. त्याच्यासोबत दुसरा सहकारीही होता. ज्ञानोबाने उंच भिंतीवरून उडी मारली. यामध्ये त्याच्या पायास दुखापत झाल्याने त्याचा सहकारी घाबरून पुन्हा कारागृहात परतला. त्यानंतर ज्ञानोबाला शोधण्यात कारागृह प्रशासनाची धांदल उडाली होती. सुदैवाने तो उपचार घेताना जिल्हा रुग्णालयात सापडला. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, या घटनेने कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सर्वस्तरातून कारागृह प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर कारागृह अधीक्षक एम.एस.पवार यांनी तात्काळ मुख्य प्रवेशद्वारावरील भिंत, भेटण्याच्या कक्षाजवळील भिंत व इतर ठिकाणच्या काही त्रुटींबद्दल सा.बां. विभागाला पत्र पाठवून अंदाजपत्रक तयार करून देण्यासंदर्भात कळविले. परंतु यावर अद्याप कसलीच कारवाई झालेली नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व कारागृह प्रशासन या गंभीर प्रश्नावर एकमेकांकडे बोट दाखवित असून टोलवाटोलवी करीत असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका कारागृहाच्या सुरक्षिततेला बसत आहे.यापूर्वीही आरोपींनी केले होते पलायनकाही वर्षांपूर्वी कारागृहाच्या भिंतीची दगड काढून तीन आरोपींनी पलायन केले होते. त्यानंतर तात्काळ मजबूत अशी संरक्षक भिंत उभारण्यात आली. आता पुन्हा एका आरोपीन पलायन केल्यानंतर कारागृहातील कमी उंचीच्या भिंतीबद्दल शंका उपस्थित करण्यात आली. भिंतीची उंची वाढविण्यासाठी प्रशासन मात्र अद्याप तरी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.त्रुटींबद्दल जाारूकता हवीकारागृहातील काही भिंतीची उंची कमी असल्याचे माहिती असतानाही प्रशासनाने यापूर्वीच का पत्र पाठविलेले नाही. तसेच इतर सुरक्षिततेबाबत हलगर्जीपणा का केला, यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारागृहातील प्रत्येक गोष्ट व सुरक्षिततेसाठी प्रशासनाने जागरूक राहण्याची गरज आहे. घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा घटना घडू नयेत, यासाठी पाऊले उचलण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :jailतुरुंगpwdसार्वजनिक बांधकाम विभागPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणेBeedबीड