शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
2
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
3
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
4
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
5
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
6
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
7
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
8
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
9
Diwali 2025: फराळ तयार करताना तळणीच्या 'या' वेळा फॉलो करा; पदार्थ तेल कमी पितील आणि खुसखुशीत होतील!
10
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
11
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
12
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
13
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
14
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
15
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
16
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
17
दिवाळीत स्वामींना घरी आणताय? आयुष्यभर सोबत करतील; अनंत कृपा होईल, स्थापनेचे ‘हे’ नियम पाळा!
18
Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
19
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
20
बँकांच्या मागण्यांना कंटाळला विजय मल्ल्या; म्हणाला,"माझ्याकडून पैसे मागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे," भारतातच प्रकरण मिटवण्याची दिली ऑफर

Beed: शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष, परळीत बिबदरा पाझर तलाव फुटून शेतीचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 16:21 IST

पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने शेतजमीनी वाहून जाऊन अतोनात नुकसान झाले आहे

- संजय खाकरेपरळी ( बीड) : सततच्या पावसामुळे बोरणा नदीवरील भोजनकवाडी नागदरा येथील बिबदरा पाझर तलाव गुरुवारी सकाळी फुटला आहे. त्यामुळे तलावाखालील शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे. ३५ वर्षापूर्वी माजी ग्रामविकास राज्य मंत्री पंडितराव दौंड यांच्या मंत्रीपदाच्या काळात बिबदरा पाझर तलाव बांधण्यात आला होता. या तलावाच्या दुरुस्तीची शेतकऱ्यांनी अनेकदा मागणी केली होती. परंतु, पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने पाझर तलाव फुटून शेतजमीनी वाहून जाऊन अतोनात नुकसान झाल्याचा आरोप माजी आमदार संजय  दौंड यांनी केला आहे. 

परळी तालुक्यातील नंदनज येथील बोरणा मध्यम प्रकल्प २४ ऑगस्ट रोजी ओव्हरफ्लो झाला असून, प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. या जलसाठ्यामुळे बोरणा मध्यम प्रकल्पाखालील नंदनज, कासारवाडी, सारडगाव ,मिरवट, मांडवा व इतर गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच सारडगाव व नंदनज परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचन क्षमतेतही वाढ झाली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही नंदनज येथील बोरणा प्रकल्प शंभर टक्के भरल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे बोरना नदीवरील भोजनकवाडी नागदरा येथील बिबदरा पाझर तलाव गुरुवारी सकाळी फुटला आहे. त्यामुळे तलावाखालील शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे.

मागील काही दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे परळी तालुक्यातील लघु प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पही ओव्हरफ्लो झाला होता. या प्रकल्पातून परळी शहराला पाणीपुरवठा केला जात असल्याने परळीकरांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. याशिवाय, परळी तालुक्यातील बोधेगाव मध्यम प्रकल्प,  तसेच मालेवाडी, कनेरवाडी,  चांदापूर ,मोहा हे लघु प्रकल्प ही शंभर टक्के भरले आहे. तसेच करेवाडी, गुट्टेवाडी, गोपाळपूर, दैठणा घाट यांसारख्या लघु प्रकल्पांमध्येही पाणीसाठा वाढल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचीही चिंता दूर झाली आहे. 

अधिकाऱ्याकडून पाहणी, नागरिकांना सतर्कतेचा इशारापाझर तलाव बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे फुटल्याची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सावंत, तलाठी भताने यांनी आज पाहणी केली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, तलावाच्या पाण्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे का, याबाबत पाहणी करण्याचे आदेश  परळी चे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना  दिले.या तलावातील पाणी थेट बोरणा नदीत मिसळत असल्याने बोरणा नदीकाठच्या गावातील व शिवारातील नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सदर घटनेची प्राथमिक माहिती नैसर्गिक आपत्ती विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय यांना देण्यात आलेली आहे.

टॅग्स :RainपाऊसBeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र