शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

बीडमध्ये १९९० नंतर काँग्रेसचा खासदार अन् आमदार नाही; सर्व नेते भाजप, राष्ट्रवादीत गेले

By सोमनाथ खताळ | Published: April 29, 2024 2:57 PM

जनतेशी संपर्कही होतोय कमी :

बीड : जिल्ह्यात १९९० मध्ये चार आमदार आणि १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकीत केशरकाकू क्षीरसागर यांच्या रूपाने काँग्रेसने शेवटचा गुलाल उधळला. त्यानंतर सर्व बडे नेते भाजप आणि राष्ट्रवादीत गेले. त्यामुळेच जिल्ह्यात सध्या हे दोन पक्ष मजबूत आहेत. १९५२ पासून २०१९ पर्यंत एका पोटनिवडणुकीसह १८ निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये सहा वेळा काँग्रेसचे खासदार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे तीन वेळा केशरकाकू क्षीरसागर यांनीच गुलाल उधळला आहे. त्यानंतर मात्र कोणालाही विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक जिंकता आली नाही. 

१९९६ च्या लोकसभा निवडणुकीपासून एकवेळा राष्ट्रवादी सोडली तर बाकी सर्व निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. सध्या तरी भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष जिल्ह्यात मजबूत आहेत; तसेच खा. रजनीताई पाटील आणि माजी मंत्री अशोक पाटील यांच्याशिवाय दुसरे मोठे नेतेही नाहीत. त्यांचा केज वगळता इतर मतदारसंघात फारसा संपर्क नसल्याने कार्यकर्त्यांचे जाळे दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे दिसत आहे.

पाटील घराण्याशिवाय मोठा नेता नाहीचरजनी पाटील १९९६ मध्ये केज तालुक्यातील जवळबन जिल्हा परिषद गटाच्या सदस्या होत्या. गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री असताना त्यांना भाजपमध्ये घेत लोकसभेची उमेदवारी दिली. त्यांनीही यात विजय मिळवला; परंतु लगेच १९९८ मध्ये त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना दोन वेळा राज्यसभा सदस्य केले; परंतु अद्याप तरी याचा फायदा जिल्ह्याला फारसा झालेला नाही. मोेठे प्रकल्प, उद्योगांची आजही प्रतीक्षा आहे. माजी मंत्री अशोक पाटील आणि खा. रजनी पाटील या घराशिवाय जिल्ह्यात काँग्रेसचा मोठा नेताही कोणी नाही.

१९९० मध्ये हे होते आमदार १९९० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दबदबा होता. गेवराईतील शिवाजीराव पंडित, आष्टीतून भीमराव धोंडे, चौसाळ्यातून जयदत्त क्षीरसागर आणि माजलगावातून राधाकृष्ण होके पाटील आमदार होते. १९९९ ला राष्ट्रवादी स्थापन झाल्यावर केशरकाकू क्षीरसागर यांच्यासह पंडित व इतर बडे नेते राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर राष्ट्रवादी मजबूत झाली आणि काँग्रेस डबघाईला आली.

काँग्रेसमध्ये काय कमी? काँग्रेसला जिल्ह्यात नेतृत्वाचा अभाव आहे. पाटील घराण्याचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी फारसा संपर्क नाही; तसेच नवे पदाधिकारी, कार्यकर्ते तयार करण्यासाठी काही उपाययोजना होत नसल्याचे दिसते.

जिल्ह्यात एकाही संस्थेवर वर्चस्व नाहीआतापर्यंत राजकिशोर मोदी या एकमेव नेत्यामुळे अंबाजोगाई नगरपालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व होते; परंतु मोदी यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे; तसेच खा. पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या केज नगरपंचायतीवरही वर्चस्व राखता आले नाही. राज्यसभा सदस्य वगळता इतर कोणत्याही ठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व नसल्याचे दिसते.

जिल्ह्यातील काँग्रेसचे खासदार: खासदार - पक्ष - वर्षेरखमाजी धोंडिबा - भा.रा.काँ. - १९५७ द्वारकादास मंत्री - भा.रा.काँ. - १९६२ पंडित सयाजीराव त्रिंबकराव - भा.रा.काँ. - १९७१ केशरकाकू क्षीरसागर - काँग्रेस आय - १९८० केशरकाकू क्षीरसागर - काँग्रेस आय - १९८४ केशरकाकू क्षीरसागर - काँग्रेस आय - १९९१

टॅग्स :beed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४