शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये फुकटचंबू पाणीचोरांवर अखेर कारवाई सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:02 IST

बीड शहरात धनदांडग्यांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेऊन मागील अनेक वर्षांपासून बीड नगर पालिकेचे फुकटात पाणी वापरले. हा प्रकार ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून चव्हाट्यावर आणला. पाणीपुरवठा विभागाने याची गंभीर दखल घेत पथक नियुक्त करून कारवाईला सुरूवात केली आहे. यामुळे फुकटात पाणी वापरणाºयांचे धाबे दणाणले आहेत. मंगळवारी दिवसभर कारवाई सुरूच होती.

ठळक मुद्देपथक लागले कामाला : अनधिकृत नळ कनेक्शन असणाऱ्यांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड शहरात धनदांडग्यांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेऊन मागील अनेक वर्षांपासून बीड नगर पालिकेचे फुकटात पाणी वापरले. हा प्रकार ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून चव्हाट्यावर आणला. पाणीपुरवठा विभागाने याची गंभीर दखल घेत पथक नियुक्त करून कारवाईला सुरूवात केली आहे. यामुळे फुकटात पाणी वापरणाºयांचे धाबे दणाणले आहेत. मंगळवारी दिवसभर कारवाई सुरूच होती.बीड शहरात गल्लीबोळात काही धनदांडग्यांनी लोकप्रतिनिधी व तत्कालीन अधिकाºयांना हाताशी धरुन मुख्य जलवाहिनीला नळ जोडणी घेतल्या. अनेकांच्या घरी दोन ते तीन नळ जोडणी आढळून येतात. त्यामुळे काही भागात सर्वसामान्यांना थोडेसे पाणी मिळते. हाच धागा पकडून लोकमतने १७ नोव्हेंबर रोजी ‘बीड शहरात तीन हजार अवैध नळ कनेक्शन’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. परंतु पालिकेने दुर्लक्ष केले. त्यानंतर ७ एप्रिल रोजी ‘अनधिकृत नळ जोडणीला अभय’ असे वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर पालिका खडबडून जागी झाली आणि कारवाईसाठी तात्काळ पथक नियूक्त केले.परंतु पथकाने कारवाईस सुरूवात केली नाही. त्यानंतर पुन्हा १७ एप्रिल रोजी ‘अनधिकृृत नळ जोडणी तोडण्यासाठी पथक नियुक्त’ असे वृत्त प्रकाशित केले. यामध्ये नियुक्त केलेल्या पथकाकडून एकही कारवाई झाली नसल्याचे समोर आणले. त्यानंतर मात्र पाणीपुरवठा विभाग खडबडून जागा झाला आणि मंगळवारी सकाळपासूनच कारवाईला सुरूवात केली.बीड शहरातील गांधीनगर व इतर भागात दिवसभर कारवाया केल्या जात होत्या.सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरूच होते. मिळालेल्या माहितीनूसार जवळपास ३० नळ जोडण्या तोडल्याचे सांगण्यात आले. या सर्व कारवायांचा आढावा अभियंता राहुल टाळके, निखिल नवले, श्रद्धा गर्जे हे घेत होते.कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणीपालिकेने पहिल्या टप्प्यात सलग चार दिवस कारवाई करण्याचे आदेश पथकाला दिले आहेत. पहिल्याच दिवशी जोरात कारवाया केल्या.यामध्ये पथकाने सातत्य ठेवण्याची मागणी होत आहे. या कारवाईमुळे सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.दुजाभाव करू नयेअनेकवेळा पालिकेकडून कारवाईत दुजाभाव केला गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. यामध्येही धनदांडग्यांना पाठिशी घालून सर्वसामान्यांवर कारवाई केली जाते, असे झाल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येतो. हे टाळण्यासाठी कारवाईत दुजाभाव न करता, समान कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.राजकीय व्यक्तींनी हस्तक्षेप करू नयेबीडमध्ये प्रत्येक चांगल्या कामात राजकीय व्यक्ती हस्तक्षेप करून अडथळा आणतात. या कारवाई मोहिमेतही हे नाकारता येत नाही.उन्हाळ्याच्या दिवस असल्याने काही लोकांना कमी पाणी येत असल्याने धावपळ करावी लागते. त्यामुळे ही कारवाई मोहीम समाधानकारक आहे. त्यामुळे राजकीय व्यक्तींनी हस्तक्षेप न करता कारवाईस सहकार्य करण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :WaterपाणीBeedबीड