शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा, शेतकरी पुत्रानं राज्यपालांना लिहिलेल्या पत्रानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 08:26 IST

एका शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री करण्याच्या मागणीचं राज्यपालांना पत्र लिहिल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

बीड: एका शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री करण्याच्या मागणीचं राज्यपालांना पत्र लिहिल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे शिवसेना-भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरूनच रस्सीखेच सुरू असताना शेतकरी पुत्रानं ही मागणी केल्यानं सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय ठरत आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दहिफळ गावातल्या श्रीकांत विष्णू गदळे यांनी ही मागणी केली आहे.श्रीकांत हे मागील काही वर्षांपासून राजकारण आणि समाजकारण करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यपालांना पत्र लिहून मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातल्या शिवसेना-भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत माझ्याकडे मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार द्या, अशा आशयाचं पत्र लिहून त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतात पेरलेल्या सर्व पिकांचं नुकसान झालं आहे.  शिवसेना-भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे. हा तिढा सुटत नाही, तोपर्यंत राज्यातील जनतेच्या हितासाठी असा निर्णय घ्यावा, असं श्रीकांत यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला मुख्यमंत्री करा. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा मी तुम्हाला विश्वास देतो. माझ्या या निवेदनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी राज्यपालांना दिला आहे. श्रीकांत यांनी राज्यपालांना उद्देशून लिहिलेलं हे पत्र बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं असून, ते सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं आहे. 

टॅग्स :Mantralayaमंत्रालय