शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
2
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
3
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
4
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
5
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
6
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवयाला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
7
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
8
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
9
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
10
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
11
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
12
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
13
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
14
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
15
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
16
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
17
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
18
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
19
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?

मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा, शेतकरी पुत्रानं राज्यपालांना लिहिलेल्या पत्रानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 08:26 IST

एका शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री करण्याच्या मागणीचं राज्यपालांना पत्र लिहिल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

बीड: एका शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री करण्याच्या मागणीचं राज्यपालांना पत्र लिहिल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे शिवसेना-भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरूनच रस्सीखेच सुरू असताना शेतकरी पुत्रानं ही मागणी केल्यानं सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय ठरत आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दहिफळ गावातल्या श्रीकांत विष्णू गदळे यांनी ही मागणी केली आहे.श्रीकांत हे मागील काही वर्षांपासून राजकारण आणि समाजकारण करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यपालांना पत्र लिहून मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातल्या शिवसेना-भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत माझ्याकडे मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार द्या, अशा आशयाचं पत्र लिहून त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतात पेरलेल्या सर्व पिकांचं नुकसान झालं आहे.  शिवसेना-भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे. हा तिढा सुटत नाही, तोपर्यंत राज्यातील जनतेच्या हितासाठी असा निर्णय घ्यावा, असं श्रीकांत यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला मुख्यमंत्री करा. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा मी तुम्हाला विश्वास देतो. माझ्या या निवेदनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी राज्यपालांना दिला आहे. श्रीकांत यांनी राज्यपालांना उद्देशून लिहिलेलं हे पत्र बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं असून, ते सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं आहे. 

टॅग्स :Mantralayaमंत्रालय