शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

बीड जिल्हा होणार पाणीदार; २३५ गावांत होणार कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेल्या काही वर्षात जिल्ह्यात उन्हाळ््याचे दिवस आले की टँकर युक्त जिल्हा होत असे. मात्र, ‘जलयुक्त शिवार’ ही योजना शासनाने प्रभावीपणे राबवल्यामुळे बीडची वाटचाल दुष्काळमुक्त जिल्ह्याच्या दिशेने होताना दिसत आहे. याच योजनेअंतर्गत जिल्ह्यात गेल्यावर्षी १९५ गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे ही गावे जलयुक्त झाली व पाणीटंचाईवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेल्या काही वर्षात जिल्ह्यात उन्हाळ््याचे दिवस आले की टँकर युक्त जिल्हा होत असे. मात्र, ‘जलयुक्त शिवार’ ही योजना शासनाने प्रभावीपणे राबवल्यामुळे बीडची वाटचाल दुष्काळमुक्त जिल्ह्याच्या दिशेने होताना दिसत आहे. याच योजनेअंतर्गत जिल्ह्यात गेल्यावर्षी १९५ गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे ही गावे जलयुक्त झाली व पाणीटंचाईवर मात करण्यात यश मिळाले. यावर्षी देखील शासनाने जिल्ह्यात भरीव तरतूद केली आहे. २०१८-१९ या वर्षात २३५ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्यात बीड जिल्ह्याची ओळख दुष्काळी जिल्हा म्हणून झाली होती. नागरिकांना उन्हळ््याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. शेतीसाठी देखील पुरेसे पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली होती. या प्रश्नांवर उपाय म्हणून शासन व इतर सामाजिक क्षेत्रात काम करणाºया संघटनांनी पुढे येत जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवली, त्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत झाली.

यावर्षी देखील जिल्ह्यात शासनाने जलयुक्त योजनेसाठी भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करत संपूर्ण जिल्हा पाणीदार होण्यास मदत होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून पाणीपातळी वाढण्यास मदत होत आहे. त्याचा फायदा शेती व पिण्याच्या पाण्यासाठी झाला आहे. त्यामुळे शेती फायद्याची ठरत आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाणी साठ्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात जास्त पाणीटंचाई भासणार नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

टॅग्स :BeedबीडJalyukt Shivarजलयुक्त शिवारMarathwadaमराठवाडाWaterपाणी