शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बीड जिल्ह्यात ६८.१२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 00:13 IST

जिल्ह्यातील सहा मतदार संघांत सोमवारी झालेल्या निवडणुकीत प्राप्त माहितीनुसार अंदाजे ६८.१२ टक्के मतदान झाले. पावसामुळे व्यत्यय आला तरी मतदारांनी आपला हक्क बजावत लोकशाहीचा उत्सव उत्साहात साजरा केला.

ठळक मुद्देनवमतदारांमध्ये उत्साह : व्होटर स्लीप मिळाल्या नसल्याच्या तक्रारी

बीड : जिल्ह्यातील सहा मतदार संघांत सोमवारी झालेल्या निवडणुकीत प्राप्त माहितीनुसार अंदाजे ६८.१२ टक्के मतदान झाले. पावसामुळे व्यत्यय आला तरी मतदारांनी आपला हक्क बजावत लोकशाहीचा उत्सव उत्साहात साजरा केला. तर जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन, राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या शांत, संयमी भूमिकेमुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता अत्यंत शांततेत व सुरळीत मतदान पार पडले.जिल्ह्यात २३२१ मतदान केंद्रे होती. १२ सखी मतदान केंद्रांवर महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापन सांभाळले. तर ६ मॉडेल मतदान केंद्रांमुळे त्या केंद्र परिसरात उत्साह दिसला. मतदान केंद्र शोधत येणाºया बहुतांश मतदारांनी त्यांना बीएलओंकडून व्होटर स्लीप मिळाल्याच्या नसल्याच्या तक्रारी केल्या.सायंकाळी ६ वाजता मतदान वेळ संपली. या वेळेपर्यंत केंद्रात आलेल्या मतदारांना मतदान करता आले. त्यानंतर निवडणूक कर्मचारी यंत्र व साहित्यासह अधिग्रहित केलेल्या वाहनातून मुख्यालयाच्या ठिकाणी पोहोचत होते. रात्री दहा वाजेपर्यंत गेवराई मतदार संघातील ३९५ पैकी २०१ केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी पोहोचले होते, माजलगाव मतदार संघातील सर्व ३७४ मतदान पथक पोहोचले होते. बीडमध्ये ३७४ पैकी २२६ पथक पोहोचले होते. आष्टीतील ४३८ पैकी २४७ पथक पोहोचले होते. केजचे ४०५ पैकी २५० आणि परळीचे ३३५ पैकी १६९ पथक मुख्यालयात पोहोचले होते.पूर आल्याने कर्मचारी अडकलेबीड तालुक्यातील राजुरीजवळ नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे मतदान यंत्रे घेऊन येणाºया दोन बसेस व त्यामधील ५० ते ६० कर्मचारी साडेनऊच्या सुमारास अडकले होते.प्रशासनाची तत्परताबहुतांश मतदान केंद्रांवर व्हीलचेअर नसल्याने दिव्यांग मतदारांना खुर्चीद्वारे, तसेच खांद्यावरुन न्यावे लागले. तर मतदान केंद्राच्या ठिकाणी दूतांनी दिव्यांगांसह वृध्द मतदारांना आधार देत कर्तव्य बजावले. पुरेशा पोलीस बंदोबस्तामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.चिखल, पावसातही लोकशाहीचा उत्सवबीड : रविवार आणि सोमवारी झालेल्या पावसामुळे विधानसभा निवडणुकीत सोमवारी झालेल्या मतदानावर परिणाम झाला असलातरी उघडीप झाल्यानंतर मतदानाचा ओघ कमालीचा वाढला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण ६० च्या पुढे गेले.पहाटे मॉकपोल झाल्यानंतर ठीक सात वाजता मतदान प्रक्रिया सुरु झाली. मात्र पावसामुळे केंद्र परिसरात काही ठिकाणी पाणी साचले होते. तर काही ठिकाणी मतदारांना चिखल तुडवत जावे लागले. पावसाची तमा न बाळगता मतदारांनी उत्स्फूर्त मतदान केले. काही मतदारांनी छत्रीचा वापर करत केंद्र गाठले.अंबाजोगाईसह तालुक्यात सकाळी १० वाजेपर्यंत तुरळक गर्दी होती. ११ वाजेनंतर मतदान केंद्रांवर गर्दी वाढली. परळीत पावसामुळे ९ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर शुकशुकाट दिसून आला. गेवराई शहरातील जिल्हा परिषद शाळा केंद्राभोवती चिखल साचल्याने मतदारांना कसरत करत मतदानासाठी जावे लागले. माजलगाव मतदार संघात वडवणी, धारुर तालुक्यांचा समावेश आहे. सकाळी सर्वत्र पाऊस असल्याने दहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. सखी मतदान केंद्र परिसरात अनेक ठिकाणी चिखल झाल्याने या केंद्रावर कमानीची सजावट करता आली नाही. तर काही केंद्रावर चिखल झाल्याने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिभा गोरे यांनी स्वत: उभा राहून रस्ता तयार करु न घेतला. आष्टी तालुक्यातही पाऊस व चिखलाचा परिणाम झाला. बीडमध्येही पहाटे तुरळक पाऊस आणि गारठ्यामुळे सकाळच्या टप्प्यात मतदान केंद्रांवर वर्दळ थंडावली होती. बारा वाजेनंतर मतदानासाठी मतदार घराबाहेर पडत होते.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडVotingमतदान