शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बीड जिल्ह्यात तीन टक्क्यांनी मतदान घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 23:40 IST

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी जवळपास ३ टक्क्यांनी घसरली आहे.

ठळक मुद्देउद्या मतमोजणी : गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज मतदारसंघात टक्का घसरला; केवळ परळीत २ टक्क्यांनी वाढला

बीड : बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी जवळपास ३ टक्क्यांनी घसरली आहे. गेवराई मतदारसंघात सर्वाधिक ७४.०८ टक्के, तर सर्वांत कमी मतदान केजमध्ये ६३.०३ टक्के झाले आहे. २०१४ मध्ये जिल्ह्यात ७१ टक्के मतदान झाले होते. यावेळी ही टक्केवारी ६८ पर्यंत घसरली आहे.जिल्ह्यात गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. ज्या ठिकाणी तुल्यबळ लढत झाली, त्या मतदारसंघात म्हणजे गेवराई आणि परळीत मतदान तुलनेत चांगले झाले आहे. गेवराईमध्ये २०१४ मध्ये ७५ टक्के मतदान झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित, भाजपाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार बदामराव पंडित यांच्यात कडवी लढत झाली. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक टक्केवारी म्हणजे ७४.०८ गेवराईमध्ये आहे. असे असले तरी २०१४ च्या तुलनेत ही टक्केवारी १ टक्क्याने घसरली आहे. गेवराईत ३ लाख ५२ हजार १९२ मतदार होते. यात १ लाख ८५ हजार ७१७ पुरुष, तर १ लाख ६६ हजार ४७४ महिला मतदार आणि एक तृतीयपंथी होता. यापैकी १ लाख ४० हजार २२० पुरुष आणि १ लाख २० हजार ६७१ महिला असे एकूण २ लाख ६० हजार ८९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ मध्ये ७५ टक्के मतदान झाले होते. यापैकी ७४.०८ टक्के मतदान झाले.माजलगावात ३ लाख ३१ हजार १६० मतदार होते. यात १ लाख ७५ हजार २७६ पुरुष तर १ लाख ५५ हजार ८८४ महिला मतदार होते. यापैकी १ लाख २३ हजार ३४९ पुरुष आणि १ लाख ४ हजार ३०८ महिला असे एकूण २ लाख २७ हजार ६५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी ६८.७५ टक्के येते. २०१४ मध्ये ७३ टक्के मतदान झाले होते. यावेळी ४.२५ टक्के मतदार घसरले आहेत. माजलगावमध्ये भाजपाचे रमेश आडसकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके यांच्यात तुल्यबळ लढत झाली.बीडमध्ये ३ लाख ३५ हजार १५० मतदार होते. यात १ लाख ७८ हजार ७६८ पुरुष तर १ लाख ५६ हजार ३७९ महिला मतदार होते. याशिवाय ३ तृतीयपंथी मतदार होते. यापैकी १ लाख २० हजार ५९० पुरुष आणि ९८ हजार ९०९ महिला व एक तृतीयपंथी असे एकूण २ लाख १९ हजार ५०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी ६५.४९ टक्के आहे. २०१४ मध्ये ६९ टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघातही साडेतीन टक्क्यांनी मतदान घसरले आहे. बीडमध्ये शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर या काका-पुतण्यामध्ये मुख्य लढत झाली.आष्टीमध्ये ३ लाख ७० हजार ४५० मतदार होते. यात १ लाख ९६ हजार ८५४ पुरुष, तर १ लाख ७३ हजार ५९६ महिला मतदार होते. पैकी १ लाख ३० हजार ५४७ पुरुष, तर १ लाख ८ हजार ५२६ असे एकूण २ लाख ३९ हजार ७३ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ६४.५४ टक्के आहे. २०१४ मध्ये ही टक्केवारी ७३ टक्के होती. या मतदारसंघातही २०१४ च्या तुलनेत साडेआठ टक्क्यांनी टक्केवारी घसरली आहे. आष्टीमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार भीमराव धोंडे आणि भाजपातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले बाळासाहेब आजबे यांच्यात लढत झाली. सुरुवातीला सोपी वाटणारी लढत शेवटच्या दोन दिवसांत अतिशय तुल्यबळ अशी झाली आहे.केजमध्ये १ लाख ८९ हजार ३७० पुरुष आणि १ लाख ७२ हजार २३३ महिला व एक तृतीयपंथी असे एकूण ३ लाख ६१ हजार ७०४ मतदार होते. यापैकी १ लाख २२ हजार ७१६ पुरुष, १ लाख ५ हजार २५८ महिला आणि एक तृतीयपंथी असे एकूण २ लाख २७ हजार ९७५ मतदान झाले. ही टक्केवारी ६३.०३ टक्के आहे. या ठिकाणीही २०१४ च्या ६६ टक्क्यांच्या तुलनेत मतदान ३ टक्क्यांनी कमी झाले आहे. केजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली असतानाही नमिता मुंदडा या भाजपाच्या तिकिटावर उभ्या राहिल्या. त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे यांच्यासोबत झाली. इतरही उमेदवार रिंगणात होते.परळी विधानसभा मतदारसंघात १ लाख ६० हजार ८३३ पुरुष, १ लाख ४५ हजार ३७१ महिला असे एकूण ३ लाख ६ हजार २०४ मतदार होते. यापैकी १ लाख १९ हजार ५४१ पुरुष, १ लाख ३ हजार ७५९ महिला असे एकूण २ लाख २३ हजार ३०० मतदारांनी मतदान केले. २०१४ च्या ७१ टक्क्यांच्या तुलनेत यावेळी २ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. परळीत ७२.९३ टक्के मतदान झाले आहे. परळीमध्ये ग्रामविकासमंत्री भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात काट्याची टक्कर होती. आरोप-प्रत्यारोपांमुळे परळी मतदारसंघातील प्रचारामध्ये रंगत निर्माण झाली होती.बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात २० लाख ५६ हजार ८६० मतदारांपैकी १३ लाख ९८ हजार ३९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १० लाख ८६ हजार ८१८ पुरुष मतदारांपैकी ७ लाख ५६ हजार ९६३ जणांनी मतदान केले. ९ लाख ७० हजार ३७ महिला मतदारांपैकी ६ लाख ४१ हजार ४३१ महिला मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यात एकूण ५ तृतीयपंथी मतदार होते. त्यापैकी बीडमध्ये १ आणि केजमध्ये १ अशा दोघांनी मतदानाचा हक्क बजावला. मंगळवारी दिवसभर सर्वच मतदारसंघात निवडून कोण येणार? जिल्ह्यात, राज्यात कोणाला किती जागा येणार? यावर लोक चर्चा करीत होते. सोशल मीडियाचाही वापर करीत होते.विधानसभा निवडणुकीत धावल्या २६२ बसेसबीड : विधानसभा निवडणुकीत कर्मचारी, मतपेट्यांना ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या २६२ बसेस जिल्ह्यातील सहा मतदार संघात धावल्या. दोन दिवसाचे रापमला जवळपास ७० लाख रूपये उत्पन्न मिळणार आहे.२१ आॅक्टोबर रोजी बीड जिल्ह्यातील सहा मतदार संघात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी मतनपेट्या जमा करण्यासाठी प्रशासनाने तब्बल २६२ बसेस आरक्षित केल्या होत्या. या दोन दिवसाचे रापमला अंदाजे ७० लाख रूपये उत्पन्न मिळणार आहे.तसेच काही बस गाड्यामध्ये कर्मचाऱ्यांना सोडल्यानंतर प्रवाशी वाहतूकही केल्याने उत्पन्नात आणखी भर पडणार आहे. बीड मतदार संघात ३७, गेवराई ४६, माजलगाव ४७, परळी २७, केज ४४ आणि आष्टीमध्ये ६१ बसेस आरक्षित करण्यात आल्या होत्या. ही माहिती वाहतूक अधीक्षक हर्षद बनसोडे यांनी दिली. वाहतूक निरीक्षक संतोष महाजन यांनी या बसगाड्यांचे नियोजन केले होते.

टॅग्स :BeedबीडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान