शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वनक्षेत्र कमी असल्यानेच बीड जिल्ह्यात वारंवार दुष्काळाचे संकट

By अनिल भंडारी | Updated: January 15, 2024 19:49 IST

राजेंद्रसिंह राणा : जलसाक्षरतेसाठी काम करण्याची गरज

बीड : वनक्षेत्र आणि हरित क्षेत्र कमी असल्याने बीड जिल्ह्यात वारंवार दुष्काळजन्य स्थिती निर्माण होते. दुष्काळमुक्तीसाठी जल पुनर्भरणाबरोबरच नद्या जिवंत ठेवण्याची गरज आहे. सरकार फक्त नियंत्रणाचे काम करू शकते, पाऊसप्रमाण वाढविण्यासाठी वनक्षेत्र वाढवून हरितभूमी करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन वॉटरमॅन राजेंद्रसिंह राणा यांनी केले.

सोमवारी अंबाजोगाई येथे कार्यक्रमानिमित्त ते आले होते. दुपारी बीड येथे त्यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, चला जाणूया नदीला उपक्रमांतर्गत ११८ नद्यांवर काम करण्यात आले. त्याचा अहवाल शासनाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. यात महाराष्ट्रातील पाच नद्यांचा अभ्यास करून कृती आराखडा तयार केला आहे.

दुष्काळ पडण्याची कारणे शोधून बदलत्या पाऊस पद्धतीप्रमाणे पीक पद्धती जोडण्याचे काम करावे लागणार आहे. हिरवाई नसल्याने दुष्काळ पडतो. त्यामुळे कार्बनचे रूपांतर मातीत होत नाही. हिरवाई निर्माण करून जमिनीत पावसाचे जिरलेल्या पाण्याचे होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे ते म्हणाले. पूर्वी सेंद्रिय शेती पद्धतीमुळे अशी विदारकता नव्हती. परंतु, रासायनिक शेती वाढल्याने ही विदारकता निर्माण होत असल्याचे राणा म्हणाले. यावेळी चला जाणूया नदीला उपक्रमाचे राज्य सदस्य अनिकेत लोहिया, नरेंद्र चुग, रमाकांत कुलकर्णी, जिल्हा सदस्य एच. पी. देशमुख, आदी उपस्थित होते.

जलसाठा वाढविण्यासाठी ॲक्शन प्लानजलसाठा वाढविण्यासाठी तसेच पावसाचे वाहून जाणारे पाणी वाचविण्यासाठी ओढे, नाले, नदी, तलाव, आदी जलस्रोतांवरील अतिक्रमणे काढणे, त्यांची ओळख, मालकी व क्षेत्र निश्चित करणे, नादुरुस्त सिमेंट नाला, बंधारे, केटीवेअर दुरुस्त करून पुन्हा पूर्वक्षमतेने स्थापित करणे, सांडपाणी व्यवस्थापन तसेच वनस्पतीचा उपयोग करणे, आदी बाबींचा नदी सुधार कृती आराखड्यात समावेश आहे.

टॅग्स :forestजंगलBeedबीड