शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
2
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
4
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
5
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
6
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
7
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
8
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
9
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
10
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
11
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
12
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
13
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
14
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
15
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
16
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
17
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
18
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
19
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
20
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश

वनक्षेत्र कमी असल्यानेच बीड जिल्ह्यात वारंवार दुष्काळाचे संकट

By अनिल भंडारी | Updated: January 15, 2024 19:49 IST

राजेंद्रसिंह राणा : जलसाक्षरतेसाठी काम करण्याची गरज

बीड : वनक्षेत्र आणि हरित क्षेत्र कमी असल्याने बीड जिल्ह्यात वारंवार दुष्काळजन्य स्थिती निर्माण होते. दुष्काळमुक्तीसाठी जल पुनर्भरणाबरोबरच नद्या जिवंत ठेवण्याची गरज आहे. सरकार फक्त नियंत्रणाचे काम करू शकते, पाऊसप्रमाण वाढविण्यासाठी वनक्षेत्र वाढवून हरितभूमी करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन वॉटरमॅन राजेंद्रसिंह राणा यांनी केले.

सोमवारी अंबाजोगाई येथे कार्यक्रमानिमित्त ते आले होते. दुपारी बीड येथे त्यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, चला जाणूया नदीला उपक्रमांतर्गत ११८ नद्यांवर काम करण्यात आले. त्याचा अहवाल शासनाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. यात महाराष्ट्रातील पाच नद्यांचा अभ्यास करून कृती आराखडा तयार केला आहे.

दुष्काळ पडण्याची कारणे शोधून बदलत्या पाऊस पद्धतीप्रमाणे पीक पद्धती जोडण्याचे काम करावे लागणार आहे. हिरवाई नसल्याने दुष्काळ पडतो. त्यामुळे कार्बनचे रूपांतर मातीत होत नाही. हिरवाई निर्माण करून जमिनीत पावसाचे जिरलेल्या पाण्याचे होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे ते म्हणाले. पूर्वी सेंद्रिय शेती पद्धतीमुळे अशी विदारकता नव्हती. परंतु, रासायनिक शेती वाढल्याने ही विदारकता निर्माण होत असल्याचे राणा म्हणाले. यावेळी चला जाणूया नदीला उपक्रमाचे राज्य सदस्य अनिकेत लोहिया, नरेंद्र चुग, रमाकांत कुलकर्णी, जिल्हा सदस्य एच. पी. देशमुख, आदी उपस्थित होते.

जलसाठा वाढविण्यासाठी ॲक्शन प्लानजलसाठा वाढविण्यासाठी तसेच पावसाचे वाहून जाणारे पाणी वाचविण्यासाठी ओढे, नाले, नदी, तलाव, आदी जलस्रोतांवरील अतिक्रमणे काढणे, त्यांची ओळख, मालकी व क्षेत्र निश्चित करणे, नादुरुस्त सिमेंट नाला, बंधारे, केटीवेअर दुरुस्त करून पुन्हा पूर्वक्षमतेने स्थापित करणे, सांडपाणी व्यवस्थापन तसेच वनस्पतीचा उपयोग करणे, आदी बाबींचा नदी सुधार कृती आराखड्यात समावेश आहे.

टॅग्स :forestजंगलBeedबीड