शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Maharashtra HSC result 2018: बीड जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत पुन्हा लेकीच भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 23:49 IST

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला. जिल्ह्यात पुन्हा एकदा मुलीच भारी राहिल्या. गतवर्षीही मुलींनीच बाजी मारली होती. यावर्षीही त्यांनी हा विजयी जल्लोष कायम ठेवला. जिल्ह्याचा एकूण निकाल ८९.०८ टक्के एवढा लागला.

बीड : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला. जिल्ह्यात पुन्हा एकदा मुलीच भारी राहिल्या. गतवर्षीही मुलींनीच बाजी मारली होती. यावर्षीही त्यांनी हा विजयी जल्लोष कायम ठेवला. जिल्ह्याचा एकूण निकाल ८९.०८ टक्के एवढा लागला. औरंगाबाद विभागात बीड तिसऱ्या स्थानावर आहे. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान औरंगाबाद विभागात बीड जिल्हा तिस-या स्थानावर आहे.

फेब्रुवारी/मार्च २०१८ मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यात मुले आणि मुली मिळून ३७ हजार ६६२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. ३७ हजार ५५६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली असून पैकी ३३ हजार ४५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये २३ हजार ६८२ मुलांपैकी २० हजार ७८२ मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर १३ हजार ८७४ मुलींपैकी १२ हजार ६७३ मुलींनी यश मिळविले आहे.औरंगाबाद विभागात नेहमी दबदबा कायम राखणारा जिल्हा यंदा तिसºया क्रमांकावर राहिला आहे. गुणवत्तेचे प्रमाण का घसरले याबाबत सर्वच शाळा व्यवस्थापनाला विचार करुन यापुढे चांगल्या निकालासाठी नियोजन करावे लागणार आहे.विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल : कला शाखेचा कमी निकालकला शाखेत १४ हजार ०४१ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. त्यापैकी ५४१ परीक्षार्थींनी विशेष प्राविण्य, ६ हजार ९०६ परीक्षार्थींनी प्रथम श्रेणी, तर ३ हजार ७९८ परीक्षार्थींनी द्वितीय श्रेणी पटकावली. वाणिज्य शाखेत २ हजार ३५९ परीक्षार्थींनी परीक्षा देत २२३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ९१७ परीक्षार्थींनी प्रथम श्रेणी, तर ९०७ परीक्षार्थींनी द्वितीय श्रेणी मिळविली. एमसीव्हीमध्ये १४३३ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. त्यापैकी विशेष प्राविण्य ९१, प्रथम श्रेणी ८३५ व २३८ परीक्षार्थींनी द्वितीय श्रेणी पटकावली.

बीड तालुका अव्वल : धारुर तालुक्याचा निकाल कमीबारावी परीक्षेत बीड तालुक्याने ९१.४१ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले. तालुक्यात ८ हजार ९४५ विद्यार्थ्यांपैकी ८ हजार १७७ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. धारूर तालुक्यात ५४२ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. त्यापैकी ५४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात २६६ मुले, तर १९१ मुली उत्तीर्ण झाल्या. टक्केवारीचे गुणप्रमाणे ८४.४७ एवढे आहे. एकूणच बारावी परीक्षेतील टक्केवारीत बीड सरस ठरला असून,धारूरचा निकाल सर्वांत कमी लागला. ९०.७९ टक्के घेऊन केज तालुका दुस-या स्थानी आहे.

पाटोद्यात मुले ठरली सरस; इतर सर्व ठिकाणी मुलीच अव्वलविद्यार्थ्यांची जिल्ह्यातील एकूण टक्केवारीचे प्रमाण ८७.७५ एवढे आहे, तर विद्यार्थिनींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.३४ एवढे असून, जिल्ह्याचा सरासरी निकाल ८९.०८ एवढा लागला. गतवर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनी आघाडी घेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. जिल्ह्यात केवळ पाटोदा तालुक्यात मुलींपेक्षा मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. पाटोदा वगळता इतर तालुक्यांमध्ये मुलीच अव्वल ठरल्या आहेत. यात ग्रामीण भागातील मुलींचे प्रमाण उल्लेखनीय असल्याचे निकालावरुन स्पष्ट होत आहे.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८educationशैक्षणिकMarathwadaमराठवाडाBeedबीड