शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

Beed: आष्टी तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका, अनेक गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 12:24 IST

प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

- नितीन कांबळेकडा: रात्रीपासून मुसळधार पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने आष्टी तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून रहदारीसाठी असणारे मोठमोठे पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आष्टी तालुक्यात रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पुर आला आहे. पुराचे पाणी शेतात घुसून शेतांना नदीचे स्वरूप आल्याचे दिसून आले. कडा, खिळद, सुलेमान देवळा, शिराळ, देवीनिमगाव, धानोरा, महेश मंदिर, केरूळ यासह अनेक गावातील रहदारीसाठी असणारे मोठमोठे पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. नदीकाठच्या लोकांनी सुरक्षीत स्थळी थांबावे. कसलाही धोका पत्कारू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. पोलीस प्रशासनाकडून रस्त्यावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पावसाने संपूर्ण तालुक्यात जोर धरला आहे. नगर-बीड मार्गावरील कडा नदीवर पाण्याची पातळी वाढली असून कोणत्याही क्षणी मार्ग बंद होऊ शकतो. तसेच कडा-धामणगांव महामार्गावर असलेल्या देविनिमगांव पुलावरून पाणी जात आहे. आष्टी-मिरजगांव मार्गावर असलेला इमनगांव तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तर शिराळ येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा ही मार्ग बंद आहे. पुलावरून पाणि वाहत असताना नागरिकांनी सेल्फी काढणे, स्टंटबाजी करत पुरातून गाडी घालू नये, सतर्क राहा, प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन आष्टीच्या तहसिलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :BeedबीडfloodपूरRainपाऊस