शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

Beed: आष्टी तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका, अनेक गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 12:24 IST

प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

- नितीन कांबळेकडा: रात्रीपासून मुसळधार पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने आष्टी तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून रहदारीसाठी असणारे मोठमोठे पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आष्टी तालुक्यात रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पुर आला आहे. पुराचे पाणी शेतात घुसून शेतांना नदीचे स्वरूप आल्याचे दिसून आले. कडा, खिळद, सुलेमान देवळा, शिराळ, देवीनिमगाव, धानोरा, महेश मंदिर, केरूळ यासह अनेक गावातील रहदारीसाठी असणारे मोठमोठे पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. नदीकाठच्या लोकांनी सुरक्षीत स्थळी थांबावे. कसलाही धोका पत्कारू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. पोलीस प्रशासनाकडून रस्त्यावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पावसाने संपूर्ण तालुक्यात जोर धरला आहे. नगर-बीड मार्गावरील कडा नदीवर पाण्याची पातळी वाढली असून कोणत्याही क्षणी मार्ग बंद होऊ शकतो. तसेच कडा-धामणगांव महामार्गावर असलेल्या देविनिमगांव पुलावरून पाणी जात आहे. आष्टी-मिरजगांव मार्गावर असलेला इमनगांव तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तर शिराळ येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा ही मार्ग बंद आहे. पुलावरून पाणि वाहत असताना नागरिकांनी सेल्फी काढणे, स्टंटबाजी करत पुरातून गाडी घालू नये, सतर्क राहा, प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन आष्टीच्या तहसिलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :BeedबीडfloodपूरRainपाऊस