शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

'सोयाबीन हातचे गेले..मुलीचे लग्न कसे करायचे'; धसक्याने शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:04 IST

अंबाजोगाई तालुक्यातील घटना 

ठळक मुद्दे मुलीच्या लग्नाची चिंता सतावत होतीरविवारी हिंगोली जिल्ह्यात अशीच घटना घडली होती. 

अंबाजोगाई (जि. बीड) : कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे दु:ख मराठवाडा वारंवार सहन करीत असतानाच आता परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान सहन न होऊन शेतकऱ्यांचा हृदयविकाराने अंत होण्याच्या दुर्दैवी घटना घडत आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील प्रकाश कारभारी चोरमले (४५) या शेतकऱ्याचा सोमवारी असाच मृत्यू झाला. रविवारी हिंगोली जिल्ह्यात अशीच घटना घडली होती. 

पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

चोरमले यांना अडीच एकर शेती होती. पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्यामुळे चिंतेत असलेल्या या शेतकऱ्याचा सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. यामुळे हे कुटुंब पावसाचा बळी ठरल्याचे बोलले जात आहे. मुलीचे लग्न कसे करावे या चिंतेत हा शेतकरी मागील दोन दिवसांपासून होता. रात्री झोपल्यानंतर सकाळी कसे उठले नाहीत ते पाहण्यासाठी पत्नी त्यांच्या खोलीत गेली. यावेळी चोरमले हे निपचित पडलेले दिसून आले. त्यांना तात्काळ स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. प्रकाश यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबावर ओढवलेले संकट दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीची मदत द्यावी अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. या प्रकरणी स्वाराती रुग्णालय परिसरातील पोलीस चौकीत नोंद झाली असून प्रकरण पुढील तपासासाठी बर्दापूर ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील शेतकरी प्रकाश चोरमले यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. उत्तरीय तपासणी केली असता त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचा प्राथमिक अहवाल आला आहे. व्हिसेरा नमुना प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहे. अंतिम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.- डॉ. विश्वजित पवार, न्यायवैद्यकशास्त्र विभाग, स्वाराती, अंबाजोगाई

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूRainपाऊसBeedबीडagricultureशेती