शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

'सोयाबीन हातचे गेले..मुलीचे लग्न कसे करायचे'; धसक्याने शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:04 IST

अंबाजोगाई तालुक्यातील घटना 

ठळक मुद्दे मुलीच्या लग्नाची चिंता सतावत होतीरविवारी हिंगोली जिल्ह्यात अशीच घटना घडली होती. 

अंबाजोगाई (जि. बीड) : कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे दु:ख मराठवाडा वारंवार सहन करीत असतानाच आता परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान सहन न होऊन शेतकऱ्यांचा हृदयविकाराने अंत होण्याच्या दुर्दैवी घटना घडत आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील प्रकाश कारभारी चोरमले (४५) या शेतकऱ्याचा सोमवारी असाच मृत्यू झाला. रविवारी हिंगोली जिल्ह्यात अशीच घटना घडली होती. 

पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

चोरमले यांना अडीच एकर शेती होती. पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्यामुळे चिंतेत असलेल्या या शेतकऱ्याचा सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. यामुळे हे कुटुंब पावसाचा बळी ठरल्याचे बोलले जात आहे. मुलीचे लग्न कसे करावे या चिंतेत हा शेतकरी मागील दोन दिवसांपासून होता. रात्री झोपल्यानंतर सकाळी कसे उठले नाहीत ते पाहण्यासाठी पत्नी त्यांच्या खोलीत गेली. यावेळी चोरमले हे निपचित पडलेले दिसून आले. त्यांना तात्काळ स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. प्रकाश यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबावर ओढवलेले संकट दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीची मदत द्यावी अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. या प्रकरणी स्वाराती रुग्णालय परिसरातील पोलीस चौकीत नोंद झाली असून प्रकरण पुढील तपासासाठी बर्दापूर ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील शेतकरी प्रकाश चोरमले यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. उत्तरीय तपासणी केली असता त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचा प्राथमिक अहवाल आला आहे. व्हिसेरा नमुना प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहे. अंतिम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.- डॉ. विश्वजित पवार, न्यायवैद्यकशास्त्र विभाग, स्वाराती, अंबाजोगाई

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूRainपाऊसBeedबीडagricultureशेती